१) किती लोकं स्वत: ची खरी संपत्ती प्रामाणिकपणे जाहीर करतात? २) कर भरणा-यांपेक्षा कर लपविणारे जास्त का आहेत? ३) अनेक जण त्यांच्याकडे भरपूर शेती असूनही ती कुटुंबातील अनेकांच्या नावावर करून स्वत: अल्पभुधारक असल्याचे दाखवितात.
४) आर्थिक प्रगती झाली म्हणून आरक्षण सोडा, असे म्हणणा-यांनी gas cylinder ची सबसिडी तरी सोडली आहे का? मग त्यांनी दुस-याकडून अशी अपेक्षा का ठेवावी. ५) पैसा हा आज आहे तर उद्या नाही, मग किती वर्षांतून लोकांच्या आर्थिक स्थितीगतीचा सर्वे करायचा आणि तो कुणी करायचा? ६) इथे शेतीचे, पिकाचे झालेले नुकसान पाहण्यासाठी (पंचनामा) करण्यासाठी आलेले कर्मचारी गावाच्या चावडीवर बसून तोंडं पाहून सर्वे पंचनामे करतात, तिथे अचूक माहिती व त्यावरून अचूक धोरण आखता येईल का? ७) मागे नियोजन आयोगाने दारिद्र्यरेषा शहरी व ग्रामीण ४० रु. पेक्षा कमी आखून दिली होती, याच्यापेक्षा कमी उत्पन्न तर खूप कमी लोकांचे असते, म्हणजे मग आरक्षणाचा प्रश्नच मिटतो. दिवसाला ५० रु. कमवणारा व ५००० पेक्षा जास्त कमविणा-याला एकाच निकषात बसविणार का?
८) पुरोहितांचे उत्पन्न कसे मोजणार?
ही झाली आर्थिक कारणे. सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक परिस्थितीविषयी काय?
मित्रांनो, मी वर्गात अनेकदा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो असतो की, तुम्ही किती वेळ अभ्यास करतात? विद्यार्थी बऱ्याचदा स्वतःहून काहीच उत्तर देत नाहीत. मग मी स्वतःहून विचारतो की, दररोज न चुकता दिवसातून ३ तास किती जण अभ्यास करतात? कोणीच हात वर करत नाही. मग मी २ तास, १ तास, अर्धा तास,…
दरवर्षी असंख्य विद्यार्थी विविध परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना अपयश येत असते. तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले यश मिळत नाही. याचा अर्थ त्यांना परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा फॉर्म्युला माहित नसतो, असे म्हणावे लागेल. तेव्हा या यशाचा फॉर्म्युला मी आज आपणासमोर मांडणार आहे. जगातील कोणत्याही परीक्षेला सामोरे जायचे असेल…
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर…