भारत अखंड का आहे?

धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या पाकिस्तानचे (१९४७) २५ वर्षाच्या आत (१९७१) दोन तुकडे झाले. भारत धर्मनिरपेक्ष असल्याने तसेच बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना व

Read More

१९६ कोटी रुपयांची देणगी

गांधीजींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले म्हणून नथ्या गोडसेने त्यांची हत्या केली होती, असे नथ्या व त्याचे नीच समर्थक म्हणतात.

मग नेहरूंनी १९४७ मध्ये १९६ कोटी रुपये संपत्ती

Read More

‘चिमण्या’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेखाचा आशय

        ‘चिमण्या’ हा ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील अतिशय लहानसा असा लेख आहे. या लेखातून लेखकाने चिमण्यांचे भावविश्वदेखील रेखाटलेले आहे. एखाद्याचे घर उद्ध्वस्त केल्यावर ते कायमस्वरूपी आपला राग धरतात, हे चिमण्यांच्या माध्यमातून लेखकाने स्वानुभवातून या ठिकाणी मांडलेले आहे. चिमण्यांचा स्वभाव हा या बाबतीत माणसांच्या स्वभावाशी मिळता-जुळता असतो, हे आपल्याला हा लेख वाचल्यावर लक्षात येते.

         लेखकाच्या घरात नेहमी चिमण्या यायच्या. पण लेखक आतापर्यंत त्यांना वैतागलेला नव्हता. या आधी त्या त्यांची घरटी Read More

मुलांशी प्रबोधनाच्या विषयांवर गप्पा

            माझ्या दहा वर्षाच्या व सात वर्षाच्या मुलाला मी आत्ताच (दि. ०७/०४/२०२३, सकाळी) जवळ घेऊन युरोपातील प्रबोधन युग समजावून सांगत होतो. ज्याची सुरुवात गॅलिलिओ यांनी ‘पृथ्वी सूर्याभोवती

Read More

आम्ही तेव्हा हिंदू नव्हतो का?

         ज्या काळात सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी इथल्या उच्चवर्णीय मनूवाद्यांना निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज नव्हती, तेव्हा हजारो जाती निर्माण

Read More

बाहुलीचा मृत्यू –

बाहुलीचा मृत्यू

         ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील ‘बाहुलीचा मृत्यू’ हा लेख एका बत्तीस वर्षाच्या कुमारी मातेच्या मृत्यूनंतर लेखकाच्या झालेल्या मानसिक अवस्थेवर, तिच्याबद्दलच्या आठवणींवर आधारलेला आहे. लेखकाने तिचे नाव दिलेले नाही. तो फक्त ‘ती’ अशा सर्वनामाने तिचा उल्लेख करतो. लेखक तिच्यावर अंत्यसंस्कार करून परतलेला आहे आणि तेव्हा त्याच्या तिच्याबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या लेखकाने या लेखात मांडल्या आहेत.

            गेल्या १२ वर्षांपासून लेखकाची व तिची भेट झालेली नव्हती. तिचा काही निरोप पण लेखकाला मिळालेला Read More

नवीन शैक्षणिक धोरण : काही बदल व परिणाम


आधी पदवी ही तीन वर्षांची असायची. म्हणजे एकदा प्रवेश घेतल्यावर तीन वर्ष पूर्ण करावेच लागायचे. मध्येच सोडले तर फक्त १२ वी शिक्षण गृहीत धरले जायचे. म्हणून मुलं किमान पदवी तरी पूर्ण करायचे. आता प्रत्येक वर्षी प्रमाणपत्र

Read More

मराठी व्याकरण – नमुना स्वरुपात १२० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

मराठी व्याकरण – नमुना स्वरुपात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मराठी व्याकरणावर नमुना स्वरुपात १२० प्रश्न खाली दिलेले आहेत. प्रश्न व पर्याय काळजीपूर्वक वाचा. मग योग्य  उत्तरे निवडा. तरीही लक्षात येत नसेल तर संकल्पना नीट समजून घ्या. मदतीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून व्याकरणावरील व्हिडीओ बघा.

– मराठी व्याकरण: https://www.youtube.com/playlist?list=PLkOQhRd-rhyNZdTRkdMwGRR4n1jsKKUJL

Read More

भाजप कशामुळे जिंकू शकते?

एक लक्षात घ्या, लोकांच्या गरजा आणि अपेक्षा खेड्यापाड्यांमध्ये फार नाहीयेत. सरकारकडून जे मोफत धान्य, साड्या, अकाउंटवर वेगवेगळ्या निमित्ताने जमा होणारे पैसे या सर्व गोष्टींमुळे ते

Read More

मराठी विभाग – जव्हार महाविद्यालय – विविध उपक्रमांची यादी – २०१७-१८ ते २०२३-२४

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

जव्हार, जि. पालघर – ४०१ ६०३ 

मराठी विभाग

विविध उपक्रमांची यादी 

Read More

महिला दिन विशेष – भारताच्या संदर्भात

@ स्त्रिया विधवा झाल्यावर त्यांना जिवंत जाळले जायचे. हा प्रकार थांबावा म्हणून राजा राम मोहन राय यांनी प्रयत्न केले. तेव्हा आजपासून २०० वर्षांपूर्वी सतीबंदीचा कायदा

Read More

महाशिवरात्री

शिवशंकर उर्फ महादेव हे या भारतातील वेदपूर्वकाळापासून जनमानसात रूढ असलेले दैवत आहे. शंकर हा इथल्या मातीतला सर्वसामान्यांचा मूळ देव. आदिवासी भागात आपल्याला राम, कृष्ण किंवा वैदिक देवीदेवतांची

Read More

निबंध किंवा वक्तृत्त्व स्पर्धेसाठीचे १०० विषय

       ज्यांनी ‘१२th फेल’ हा चित्रपट बघितला असेल त्यांनी त्या चित्रपटातील एक प्रसंग आठवा. ज्यात मनोज कुमार शर्मा याला एक आयएएस ऑफिसर ‘मनोज कुमार शर्मा’ या विषयावर निबंध लिहायला सांगतो. पण तो दिलेल्या वेळेत पुरेसे लिहू शकत नाही. त्यावरून ‘तू ये नही कर सकता’ असे तो आयएएस ऑफिसर त्याला सांगतो. सांगायचे तात्पर्य आपल्याला जर एखाद्या विषयावर निबंध किंवा २००-४०० शब्दांमध्ये अभ्यासपूर्ण लिहिता येत नसेल किंवा अभ्यासपूर्ण बोलता येत नसेल तर अनेक परीक्षांमध्ये आपण मागे राहून जातो. ते जमावं म्हणून मी अशा काही विषयांची यादी दिली आहे. जर आपण या विषयांबद्दल वाचले, लिहिण्याचा प्रयत्न केला, तर आपणास करिअरमध्ये नक्की फायदा होईल.

निबंध व वक्तृत्त्व स्पर्धेसाठीचे १०० विषय पुढीलप्रमाणे- 

Read More

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन 

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन

                                                                                  – डॉ. राहुल भा. पाटील

           राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित Read More

बायोडेटा – डॉ. राहुल पाटील

वैयक्तिक माहिती

नाव                       :      डॉ. राहुल भालेराव पाटील,

                                     मराठी विभाग प्रमुख,

                                     गोखले एज्युकेशन सोसायटीचे

                                     कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर

जन्म दिनांक          :     १४/०१/१९८५

लिंग                      :      पुरुष

जात                      :         

धर्म                       :         

संपर्कासाठी पत्ता  :     गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर

मोबाईल                :    ९६२३०९२११३

ईमेल आयडी         :   patilrahulb14@gmail.com

भाषिक ज्ञान          :   अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी  

शैक्षणिक पात्रता

Read More

ब्लॉगलेखन

एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, विविध समाजमाध्यमे यांचा वापर वाढलेला असून ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. आजच्या काळात ज्ञान, माहिती, मनोरंजन, जाहिरात आणि प्रबोधन हे घटक विशिष्ट लोकांपुरते, विशिष्ट प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, त्यावर फक्त त्यांचीच Read More

भोंग्यांचा आवाज : कुणाचा किती

मी हिंदू आहे. पण मूर्ख हिंदू नाही.
चला थोडा हिशोब करू.
दिवसभरात ठरलेल्या ५ वेळेस अजान.
म्हणजे ३६५×५=१८२५ वेळेस.
एक अजान २-३ मिनिटांची. (नंतर आवाज

Read More

‘माझं घर’ या नाटकातील दुय्यम व्यक्तिरेखा

               विभा, आई, उर्मिला यांच्या व्यतिरिक्त या नाटकात विभाची मुलगी राणी, नंदिता मुर्डेश्वर व विभाची आई मालती साळवी या स्त्री व्यक्तिरेखा आहेत. राणी ही आठ-दहा वर्षाची लहान मुलगी आहे. ती शाळेत जाते. आई व वडिलांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाचा फटका तिला बसलेला आहे. ती आईकडे राहते, परंतु नंतर वडिलांचा सहवासदेखील तिला हवाहवासा वाटतो. त्यासाठी ती वडिलांचा पत्ता तिच्या शाळेतील मुलाच्या माध्यमातून  Read More

उर्मिला ‘माझं घर’ या नाटकातील व्यक्तिरेखा

           उर्मिला ही दिनेशची बहीण व विभाची नणंद आहे. ती एम. एस्सी झालेली असून कोल्हापूरला नोकरी करते. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली आहे. शिकून मुंबई सोडून लांब कोल्हापूरला नोकरीसाठी जाण्याच्या तिच्या निर्णयाला तिची आई व भावाचाही विरोध असतो. पण ती ठाम असते व तिच्या वहिनीचा म्हणजे विभाचा मात्र तिला पाठिंबा असतो. उर्मिलाचे विभाशी अतिशय घनिष्ठ संबंध असतात. ती विभाची नणंद असूनही तिच्याशी बहिणीप्रमाणे किंवा एखाद्या चांगल्या मैत्रिणीप्रमाणे वागत असते. तिचा भाऊ Read More

आई – ‘माझं घर’ या नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा

         आई म्हणजे विभाची सासू व दिनेशची आई. ही एक वृद्ध विधवा स्त्री आहे. आधी ती गोरेगाव येथे राहायची. पण नंतर मुलगा व सून यांनी अंधेरीमध्ये फ्लॅट घेतल्यावर ती त्यांच्यासोबत तिथे राहू लागते. पण तरीही अनेकदा ती गोरेगावला जुन्या घरी जाते व तिथल्या बायकांमध्ये मिसळते. विभा ही त्यांची सून असली तरी दोघांमधील नाते हे आई व मुलीसारखेच आहे. विभा त्यांना आईच म्हणते. विभा त्यांची तब्येत, औषध, पथ्ये यांची खूप काळजी घेत असल्यामुळे त्या विभावर अवलंबून आहेत. विभा आधी दिनेश येईपर्यंत जेवणासाठी थांबायची, तेव्हा आईच तिला Read More

जयंत पवार यांच्या ‘माझं घर’ या नाटकातील विभाची व्यक्तिरेखा

            विभा ही ‘माझं घर’ या नाटकातील केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आहे. संपूर्ण नाटक हे तिच्याभोवती फिरते. ती दिनेशची पत्नी आहे. ती मुंबईतील अंधेरी या उपनगरात एका उच्चभ्रू लोकांच्या भागात एका चांगल्या फर्निचर केलेल्या टू बेडरूम किचनच्या फ्लॅटमध्ये दिनेश, मुलगी व सासुसोबत राहते. त्या आधी ते गोरेगावात राहायचे. ती चर्चगेटला नोकरी करते. ती साधारणतः ३४-३५ वर्षांची असून तिच्या माहेरी पुरोगामी वातावरण होते. तिचे वडील नाना हे पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्य केले व ते भेदभाव मानत नसत. अशा वातावरणात तिचे बालपण व तारुण्य गेले. ती उच्चशिक्षित आहे. तिने कॉलेजचे शिक्षण घेतलेले आहे. कॉलेजमध्ये असताना तिला सतार खूप छान वाजवता यायची. ती गाणेही शिकलेली होती. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ती Read More

जयंत पवार – परिचय

            जयंत पवार हे मराठीतील प्रसिद्ध कथालेखक, पत्रकार, नाटककार आणि नाट्यसमीक्षक म्हणून परिचित आहेत. १९८०पासून त्यांनी नाट्यलेखनास सुरुवात केली. जयंत पवार यांची ‘वंश/ पाऊलखुणा’ (अभिनव प्रकाशन), ‘अधांतर’ (पॉप्युलर प्रकाशन), ‘काय डेंजर वारा सुटलाय’ (पॉप्युलर प्रकाशन), ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ (शब्द पब्लिकेशन), ‘लिअरने जगावंकी मरावं?’ (पंडित पब्लिकेशन) ‘माझं घर’ शब्दालय प्रकाशन) इ. नाटके प्रकाशित आहेत. त्यांनी एकांकिका लेखनही केलेले असून ‘नाद’ Read More

‘माझं घर’ नाटक : काही दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे

‘माझं घर’ नाटक : काही दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे

(४ पाने उत्तरे लिहिणे अपेक्षित)

प्रश्न : ‘माझं घर’ या नाटकातील दिनेश व विभा यांचे नातेसंबंधांचा सविस्तर आढावा घ्या.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘माझं घर’ या नाटकाबद्दल, जयंत पवार यांच्याबद्दल ५-७ ओळींमध्ये थोडक्यात माहिती लिहायची.
  • प्रस्तावनेनंतर

Read More

देवबाभळी नाटक- काही प्रश्न व उत्तरे

प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकातील स्त्रियांची व्यक्तिचित्रे तुमच्या भाषेत सविस्तर लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘देवबाभळी’ या नाटकाबद्दल, लेखकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर ‘देवबाभळी’ या नाटकातील आवली व लखुबाई यांची व्यक्तिचित्रे लिहायची आहेत. पहिल्या दोन ओळींमध्ये ‘या नाटकात दोन स्त्री व्यक्तिरेखा आहेत. त्यापैकी एक आवली व दुसरी लखुबाई. त्यांच्याबद्दल आपण आता या ठिकाणी बघणार आहोत’, असे लिहून आधी पहिली व तिच्याबद्दल सविस्तर लिहून झाल्यावर दुसऱ्याबद्दल लिहायचे. प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल किमान दीड-दीड पाने लिहायला हवीत.
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

अभ्यासासाठी पुस्तक – Read More

नाटक: स्वरूप, घटक, प्रकार, वाटचाल (दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे)

वर्ग – प्रथम वर्ष कला

अभ्यासक्रम – नाटक: स्वरूप, घटक, प्रकार, वाटचाल

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न – नाटकाच्या घटकांचा सविस्तर परामर्श घ्या.

उत्तर –

  • प्रस्तावना : नाटकाबद्दल प्रास्ताविकेत ५-६ ओळी लिहा.
  • नंतर नाटकाचे घटक

सुरुवातीला नाटकाचे सर्व घटक खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायचे. नंतर जेवढे घटक विचारलेले आहेत तेवढे साडे तीन पानांमध्ये सविस्तर लिहायचे. एक एक घटक घ्यायचे व Read More

रोहित शर्मा याच्याकडे संघनायक म्हणून असलेले गुण

भारतीय संघाने या विश्वचषकात सलग १० विजय मिळवून आज न्युझीलंडला पराभूत करत अगदी थाटामाटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोणत्याही यशात कप्तानची भूमिका खूप महत्त्वाची असते. या विश्वचषकात सर्व खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण एक कप्तान म्हणून रोहित शर्मा याची भूमिका मला अतिशय महत्त्वाची वाटते. मागच्या विश्वचषकात त्याने ५ शतक केले होते. IPLमध्येही त्याने

Read More

द्वेष : लक्षणे, परिणाम व उपचार

द्वेष हा असा मानसिक विकार आहे जो माणसाचा विवेक, सारासार विचार करण्याची, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, जवळचा-लांबचा हे ओळखण्याची क्षमता नष्ट करून टाकतो. तो माणसाच्या मनाची अंतर्गत मोडतोड करून टाकतो. अशी व्यक्ती

Read More

SYBA, पेपर नं. ३ भाषा आणि बोलीअभ्यास (दीर्घोत्तरी प्रश्न, त्यात अपेक्षित मुद्दे)

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न- भाषा म्हणजे काय ते सांगून मानवी भाषेची कोणतीही सहा लक्षणे सोदाहरण (म्हणजे उदाहरणासह) लिहा.

उत्तर- Read More

रोमान याकबसन यांनी सांगितलेली भाषेची कार्ये

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (३-४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित

रोमान याकबसन यांनी सांगितलेली भाषेची कार्ये-

खालील प्रमाणे उत्तर लिहायचे – 

Read More

भाषेच्या व्याख्या व लक्षणे (दीर्घोत्तरी प्रश्न व नमुना उत्तर)

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (३-४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न- भाषा म्हणजे काय ते सांगून मानवी भाषेची कोणतीही सहा लक्षणे सोदाहरण (म्हणजे उदाहरणासह) लिहा.

  • प्रस्तावना : मानवी जीवनात भाषेचे महत्त्व, आवश्यकता याबद्दल ५-६ ओळी लिहा.
  • नंतर भाषा म्हणजे काय? – यात भाषेच्या ५-६ व्याख्या लिहा व त्या समजावून सांगा. म्हणजे एक व्याख्या लिहिली की तिच्याखाली तिचे स्पष्टीकरण, दुसरी व्याख्या व तिचे स्पष्टीकरण असे सविस्तर लिहा. (किमान दीड पाने)
  • नंतर भाषेची लक्षणे (लक्षणे व वैशिष्ट्ये एकच आहेत. लक्षणे म्हणजेच वैशिष्ट्ये)

सुरुवातीला भाषेची खालील सर्व लक्षणे खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायची. नंतर जेवढी लक्षणे विचारलेली आहेत तेवढी खालीलपैकी कोणतीही दीड पानांमध्ये सविस्तर लिहायची. एक एक लक्षण घ्यायचे व त्याच्याबद्दल लिहायचे.

  • ध्वन्यात्मकता/ चिन्हात्मकता
  • द्विस्तरीय रचना
  • यादृच्छिक 
  • अदलाबदल/ भूमिकांतर
  • प्रत्यक्षातीतता/ स्थलकालातीतता
  • सामाजिकता
  • सर्जनशीलता/ निर्मितीशीलता
  • परिवर्तनशीलता
  • सांस्कृतिक संक्रमण
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व लक्षणे म्हणजे नेमके काय ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

 

डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख 

रूपिका, रूपिकांतर व रूपिम

दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

प्रश्न- रूपिका, रूपिकांतर व रूपिम या संकल्पना स्पष्ट करून रूपिमांचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर – Read More

स्वन, स्वनिम, स्वनांतर – दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

प्रश्न- स्वन, स्वनिम, स्वनांतर या संकल्पना स्पष्ट करून उच्चारण स्थानावर आधारलेले स्वनांचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर –

Read More

खाजगीकरण, कंत्राटीकरण का?

बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर शिकून सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरू लागला, स्वतःची व समाजाची प्रगती साधू लागला. हळूहळू तो IAS, IPS, न्यायाधीश अशा महत्त्वाच्या पदांवर जाऊन निर्णय प्रक्रियेत गेला असता. मग त्यांना या विकासाच्या मार्गापासून दूर कसे न्यायचे? तर आधी रथयात्रा, मग बाबरी मशीदपतन, मग ‘बनायेंगे मंदिर’ची चिथावणी, मग २००५नंतर पेन्शन बंद, मग पदभरती बंद, शाळांचे खाजगीकरण, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, त्यात आरक्षण नाही, नवीन शैक्षणिक धोरण, यामुळे

Read More

मनुवाद्यांचे ध्येय व त्यांच्या यशाचे रहस्य

मनुवाद्यांचे कायम एक ध्येय राहिले आहे. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत राज्यसत्ता, धर्मसत्ता, सांस्कृतिक सत्ता, अर्थव्यवस्थेच्या नाड्या स्वतःच्या ताब्यात ठेवणे व बहुजन समाजाला आपल्या स्वार्थासाठी गुलाम बनवणे.

या गोष्टी साध्य करण्यासाठी ते
● विविध धर्मग्रंथ, पोथ्या, विविध ग्रंथांची रचना करतात.
● असंख्य जाती निर्माण करून अखंड समाजाला

Read More

अमेरिकेची व भारताची राज्यघटना

अमेरिकेचे संविधान १७८७ साली म्हणजे आजपासून २३६ वर्षांपूर्वी लागू झाले. त्यात निग्रो (काळ्या) लोकांना व स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो अनुक्रमे साधारणतः १०० व १५० वर्षांनंतर देण्यात आला. पण तरीही ती राज्यघटना

Read More

आमच्या देशात आधीपासूनच सर्व होते?

आमच्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान होते. आमची संस्कृती सर्वात श्रेष्ठ होती व आहे. आम्ही सर्वांना समान समजतो. आमच्याकडे अद्वैती तत्त्वज्ञान आहे. असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न-

ही एवढी सर्व जाणीव भारताला होती मग या ज्ञानावर समाजाची रचना का झाली नाही?

भारताचा परकीयांसमोर पुन्हा पुन्हा पराभव का झाला?

Read More

आजचे युग कशाचे आहे?

आजचे युग हे तलवारींना धार लावून ‘धारकरी’ बनण्याचे नसून विविध आधुनिक शास्त्रांचा अभ्यास करून मेंदूला धार लावून बुद्धी कमावून रक्ताचा एक थेंब न सांडता जगावर राज्य करण्याचे आहे. आज अमेरिकेतल्या २-३ कंपन्या मिळून अख्ख्या भारताचे शेअरमार्केट विकत घेऊ शकतात. हे सामर्थ्य त्यांनी

Read More

‘ॲ व ऑ’ स्वरांचा वर्णमालेत समावेश का?

महाराष्ट्र शासनाने दि. १०/११/२०२२ रोजी ‘शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इ.साठी स्वीकारलेली देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत करण्याबाबत’ अशा आशयाचे एक परिपत्रक काढून मराठी वर्णमाला अद्ययावत केली आहे. यानुसार ‘ॲ

Read More

मनोहर भिडेच्या वादग्रस्त बोलण्याचा अन्वयार्थ

बंधू-भगिनींनो,

भिडेसारख्या किड्यांची ही समस्या आहे की, यांचे वैचारिक पूर्वज ना स्वातंत्र्य चळवळीत होते ना सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत. उलट वेळोवेळी यांनी याविरोधात भूमिका घेतली. स्वातंत्र्यामुळे राजकीय सत्ता यांच्या हातून गेली व समाजसुधारकांनी प्रबोधन केल्यामुळे व संविधानाची निर्मिती तसेच अंमलबजावणीमुळे उच्चवर्णीय म्हणून असलेले हजारो वर्षांपासूनचे विशेष अधिकार पण यांच्या हातून गेले.

स्वातंत्र्यानंतर ४०-४५ वर्षे त्या शहाण्या पिढ्यांनी यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. हे लोकांच्या मनातून उतरून गेले होते. पण आता इतिहास

Read More

आस्तिक-नास्तिक असणे ही समस्या नाही. मग कोणती आहे?

आपण आस्तिक आहोत की नास्तिक हे महत्त्वाचे नाहीये.
● आपण एससी, एसटी, ओबीसी, मराठा आहोत व या देशातील बहुतांश आयएएस, आयपीएस, न्यायाधीश, महत्त्वाचे निर्णय घेणारे सत्ताधारी हे आपल्या जातींमधील स्त्रिया व पुरुष नाहीयेत, ही आपल्यापुढील समस्या आहे.

Read More

विठ्ठलाशी संवाद -आषाढीच्या निमित्ताने…

बा विठ्ठला,
तू वेदांमध्ये नाहीस, उपनिषदांमध्ये नाहीस, रामायण महाभारतामध्ये नाहीस. तू कुठलाही पुराणांमध्ये नाहीस. पण तू इथल्या मातीत रुजलेला आहेस! इथल्या मेघांमधून वर्षत आहेस! इथल्या फुलांमध्ये तुझाच सुगंध दरवळत असतो आणि इथल्या संगीतातून, तालासुरातून, माणसांच्या मुखातून तुझेच ध्वनी बाहेर पडतात!

इथल्या मातीत जीवनरस तूच ओतलेला आहेस!
तूच इथे संतांची मांदियाळी निर्माण केलीस. त्यांची माय व बापही झालास. तुला समोर ठेवून ज्ञानोबा, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई

Read More

‘सर ए राह’ अतिशय सुंदर पाकिस्तानी स्त्रीवादी मालिका

‘सर-ए-राह’ ही एक पाकिस्तानी मालिका आहे. इतकी छान मालिका मी अलीकडच्या काळात भारतात नाही बघितली. या मालिकेचे एकूण ६ एपिसोड आहेत. पाकिस्तानमधील पुरुषप्रधान संस्कृती, मानसिकता या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या चार तरुण मुली/

Read More

मीही सुवर्णपदक परत करणार होतो!

मी बीए व एम.ए.ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (जळगाव) प्रथम आलेलो असल्याने मला दोनदा सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच मी २००७ साली एम.ए. झाल्या झाल्या नेट परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. पुढच्याच वर्षी नेट-जेआरएफ पण उत्तीर्ण झालो. तरीही मुलाखतींना जायचो तेव्हा भरमसाठ डोनेशनची मागणी व्हायची. चार-साडेचार वर्ष झाले तरी मला नोकरी मिळत नव्हती. ज्या महाविद्यालयात मराठीची एक जागा

Read More

निराश, हतबल, वृद्ध कृष्ण

यादवीनंतर निराश झालेला कृष्ण जंगलात निघून गेला व अंगठ्याला बाण लागून मरण पावला. तिथेच त्याचे पार्थिव पडून राहिले. कृष्णाच्या वंशातील स्त्रियांना अभिर वंशातील लोकं उचलून, पळवून घेऊन गेले.

त्याआधी कित्येक लढाया जिंकलेला व त्याच्या काळातील महान योद्ध्यांवर प्रभाव गाजवणारा पण आता

Read More

भारत-पाक फाळणी व सद्यपरिस्थिती

१९३७पर्यंत मोहम्मद अली जिना व इतर यांच्या अजेंड्यावर भारत-पाक फाळणी, पाकिस्ताननिर्मिती इत्यादी मुद्दे नव्हते. पण पुढील ७-८ वर्षात त्यांनी व इथल्या धर्मांध संघटनांनी एवढा धार्मिक उन्माद माजवला की दहा वर्षात देशाचे तुकडे झाले. दोन्ही-तिन्ही धर्मांची मिळून ४०-५०लाख लोकं दंगलीत मारली गेली. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. लहान मुले, म्हातारे, स्त्रिया व

Read More

गणितज्ज्ञ रामानुजन

प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रामानुजन (१८८७-१९२०) यांच्यावर धर्माचा प्रचंड पगडा होता. ते युरोपात असताना त्यांना क्षयरोग संबंधित आजार झाला. तेथील थंडीमध्ये टिकून राहण्यासाठी व बरे होण्यासाठी डॉक्टरांनी मांसाहार करायला सांगितले. त्यांनी नाही केला. शेवटी त्याच

Read More

नव मानवसमाज निर्माण होण्यासाठी उपाय

नवा मानव समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न

  • आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत.
  • होमो सेपियन्सना आपल्या बुद्धिमत्तेने धर्माची निवड करण्याचा आधिकार असायला हवा.
  • Man is a rational animal. जगातील सर्वच धर्मांनी बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या होमोसेपियन प्रजातीच्या व्यक्तींना, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्गदत्त गुणांचा उपयोग करून, उपलब्ध असलेल्या धर्मातील एका धर्माची निवड करण्याचा अधिकार नाकारला आहे.
  • होमोसेपियन व्यक्तीच्या सारासारबुद्धीची दखल घेऊन, प्रत्येक व्यक्तीला सज्ञान वयाची झाल्यावर आपल्या पसंतीचा धर्म निश्चित केल्यावरच, त्या व्यक्तीस धर्माची दीक्षा देण्याची प्रथा, खरं तर सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सुरू करायला हवी होती.
  • त्याऐवजी सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सरसकटपणे व्यक्तीच्या मातापित्याचा धर्म तोच व्यक्तीचा धर्म अशी मान्यता देऊन, तशी प्रथा व परंपरा सुरू करून, व्यक्तीच्या आपल्या इच्छेने धर्म नाकारण्याचा किंवा उपलब्ध धर्मातील एक धर्म निवडायच्या अधिकारावर गदा आणली आहे.
  • बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या मानवी व्यक्तींनी, आपल्या व इतर प्रजातींच्या भविष्यकालीन परस्पर संबंधांना मानवी रूप देण्यासाठी भूतकाळातील सर्वच धर्म व पंथ संस्थापकांकडून झालेला हा प्रमाद नाकारून, त्यात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
  • जगातील सर्वच धर्म आपसात केवळ स्पर्धाच नव्हे तर काही प्रमाणात द्वेषही करताहेत, त्यामुळे आतापर्यंत जगभरात प्रचंड हिंसाचार घडून आलेला आहे.
  • ह्यातील कुणा एका धर्मातील वा वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती एकत्र येऊन धर्मसंस्थापकांनी केलेली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करणे, अशक्यच आहे.
  • त्यामुळे मानव प्रजातीचा विकास करण्यासाठी ईश्वर ह्या संकल्पनेच्या जालात अडकलेल्या मानव प्रजातीतील व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी अनिश्वरवाद्यांना व संयुक्त राष्ट्र संघटनेलाच स्विकारावी लागणार आहे.
  • ह्यासाठी जगातील समस्त नास्तिकांनो, सुजाण नागरिकांनो, जगातील असे देश, ज्यांनी आपले राष्ट्र एका विशिष्ट धर्माचे असल्याचे नाकारले आहे, अशा रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड आणि इतर अशा सर्व देशांनी, ह्या दिशेनं वाटचाल करावी म्हणून, त्यांना योग्य लॉजिकल कृती करण्यास, पुढचे पाऊल टाकण्यास उद्युक्त करूया.
  • ह्या देशाच्या शासनसंस्था आपापल्या देशातील धर्मसंस्थांना अशा प्रकारे सज्ञान झालेल्या व्यक्तीनांच, व्यक्तींच्या इच्छेप्रमाणे, त्यांनी निवडलेल्या धर्माची दीक्षा देण्याचा विधी विकसित करावा आणि अशा विधी झालेल्या, दीक्षाप्राप्त व्यक्तीसच आपल्या धर्मामध्ये प्रवेश देण्याची प्रथा सुरू करावी व त्याप्रमाणे योग्य नियम बनवावेत म्हणूून योग्य कायदे करतील.
  • आपल्या देशाच्या नागरिकांना नागरिकत्वाचा हक्क देताना त्यांनी, एक तर स्वत़ःला अनिश्वरवादी घोषित करायला हवे किंवा सज्ञान झाल्यावर आपल्या इच्छेने निवडलेल्या धर्माचा विधीपूर्वक स्विकार करायला हवा, अशा रीतीचे कायदे सर्वच देश करतील, असे प्रयत्न करावेत.
  • त्याचबरोबर युनोच्या सभागृहातही युनोच्या सर्व सदस्य देशांनी आपापल्या देशाच्या धर्मविषयक कायद्यांत योग्य बदल करून धर्मसंस्थांना ह्या उद्देशास सहाय्यक अशा प्रकारचे नियम, विधी, माहिती विकसित करण्यास उत्तेजन द्यावे.
  • युनोचे सदस्य असलेल्या सर्वच देशांनी युनोच्या आमसभेत, मानव ही सर्व प्रजातीतील एक बुद्धिवान आणि सारासारविवेकबुद्धी असलेली प्रजाती आहे, म्हणून निसर्गाने बहाल केलेल्या, आपल्या वैशिष्ट्यांचा, आपल्या वेगळेपणाचा विकास करणे ही मानवाचीच जबाबदारी आहे, अशा आशयाच्या भूमिकेला मान्यता देऊन, मानवाच्या विकासाला मर्यादित करणाऱ्या सर्व धर्मांमध्ये योग्य बदल करून, मानवाला मानव्याच्या दिशेने प्रवास करण्यास पूरक असे नियम करण्याविषयक आवाहन करणारा एक ठराव पारित करावा.
  • भविष्यातील मानवाने एक तर त्याचा धर्म हा तो सज्ञान झाल्यावर विचारपूर्वक निवडलेला असायला हवा किंवा निधर्मी राहण्याचा, एकापेक्षा अधिक धर्मातील चांगल्या गोष्टींचे पालन करण्याचा त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार त्याला मिळायला हवा.
  • म्हणून कुणाच्याही दाखल्यावर तो सज्ञान झाल्यावर स्वतःहून कायद्याप्रमाणे कोणताही एक धर्म स्वीकारेपर्यंत कोणत्याही धर्माचा उल्लेख करता कामा नये.
  • शाळा, महाविद्यालये यात कोणत्याही धर्माचे कार्यक्रम होणार नाहीत, यासाठी नियम, कायदे बनवायला हवेत व जर असे कुठे घडत असेल तर एका तक्रारीवर चौकशी व दोषी आढळल्यास कारवाई करायला हवी.
  • धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसा, दंगे इत्यादी गोष्टींवर कठोरातली कठोर कारवाई करून वरील गोष्टींना प्रोत्साहन मिळणार नाही असे कायदे निर्माण करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी करायला हवी.
  • धर्माचा ठेका घेतलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती यांचा कायदे करून बिमोड करायला हवा.

(दीनानाथ मनोहर यांची पोस्ट काही बदलांसह…)

  • डॉ. राहुल पाटील

लोकशाहीपुढील आव्हाने

औरंगजेब याचे स्टेट्स ठेवणे चुकीचेच होते. पण असे केल्याने कुणाचाही अपमान होत नाही. मात्र इथे खालील घटना घडताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाचाही अपमान होत नाही. उदा.

● गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळीबार

Read More

सत्यनारायण : एक व्यवसाय

१३ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. साडेतीन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आमच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलो. पण दोन्ही वेळेस मी सत्यनारायण घातला नाही. भविष्यातही घालणार नाही.
१८५०पूर्वी भारतात सत्यनारायण घातल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. शिवाजी महाराजांनी

Read More