शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यांना माझे उत्तर…

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे व त्यांच्या नावाच्या आधी कित्येक उपाध्या लावणारे व इतरांनाही

Read More

ग्रामीण साहित्याचे स्वरूप

ग्रामीण साहित्याचे स्वरूप

        माझ्या ब्लॉगवरील या आधीच्या ‘ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा’ या लेखामध्ये ग्रामीण साहित्याच्या विविध प्रेरणांचे विवेचन केलेले आहे, त्या प्रेरणांमधून ग्रामीण साहित्य निर्माण झालेले आहे. ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाचा विचार करता, कालखंडानुसार ग्रामीण साहित्याच्या स्वरूपात फरक दिसून येतो. 

        १९२० च्या आधीच्या ग्रामीण साहित्यावर आपल्याला महात्मा फुले व त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव दिसून येतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे वैचारिक ग्रंथ व ‘अखंडा’मधून (कविता) ग्रामीण भागातील शेतकरी व इतर शूद्र वर्गाच्या शोषणाची मीमांसा केली. खेड्यापाड्यातील काबाडकष्ट करणाऱ्या Read More

आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन

आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन

 

प्रस्तावना-

          भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असा देश आहे. भारतात आजही काही मोजक्या भाषांमधूनच लेखन केले जाते. तर १६०० पेक्षा जास्त बोली या फक्त बोलल्या जातात. म्हणजे त्या लिपीबद्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्यात लिखित साहित्य हे खूप कमी आहे किंवा जे आहे ते अगदी अलीकडे म्हणजे २५-३० वर्षांत या समूहातील नवशिक्षित वर्गाकडून लिहिले गेलेले आहे. परंतु आज त्या बोलींमध्ये जे मौखिक साहित्य उपलब्ध होते ते अतिशय मुबलक असे आहे. हे मौखिक साहित्य नेमके केव्हा निर्माण झाले हे आज कुणीही सांगू शकत नाही. परंतु पिढ्यानपिढ्यांपासून ते चालत आलेले आहे. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत.

          महाराष्ट्रातील आधीच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका आहे. या तालुक्यात ‘क’ ठाकूर, ‘म’ ठाकूर, Read More

ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा

          कोणत्याही प्रकारच्या साहित्याच्या निर्मितीमागे काही ना काही प्रेरणा या असतातच. त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही. मम्मटाने सांगितलेल्या प्रेरणा आपल्याला सर्वांनाच माहित आहेत. तशाच ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागेही काही प्रेरणा आहेत. त्या पुढील प्रमाणे –

१) ‘ग्रामीणते’चा शोध घेणे –

          ग्रामीण साहित्याचे वेगळेपण हे त्याच्या ‘ग्रामीणते’त आहे. ग्रामीणतेची ही जी जाणीव आहे, तिचा शोध घेणे व ती व्यक्त करणे ही ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागील एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रचार प्रसारामुळे  शिकलेली पहिली पिढी निर्माण झाली.  या पिढीच्या असे लक्षात आले की, आतापर्यंत ग्रामीण म्हणून जे साहित्य लिहिले गेलेले आहे किंवा एकूणच जे मराठी साहित्य आहे, यात ग्रामीण भागाचे, तेथील लोकांच्या जगण्याचे त्यांच्या सुख-दुखांचे वास्तव चित्रण आलेले नाही. ग्रामीण Read More