स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

           स्त्रियांचे शोषण करणार्‍या, त्यांना दुय्यम लेखणार्‍या, त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असंख्य प्रथा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. मात्र एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या प्रभावामुळे भारतीयांमध्ये काही प्रमाणात जागृती निर्माण होऊ लागली. पाश्चात्य शिक्षण, प्रबोधन यामुळे भारतातील

Read More

स्त्रियांच्या शोषणाची पार्श्वभूमी

    जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क 

Read More

‘संतसूर्य तुकाराम’ –  आनंद यादव (थोडक्यात परिचय)

                  
‘संतसूर्य तुकाराम’ ही  आनंद यादव यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर आघात करणारी, परंतु तुकारामांचे अवघे आयुष्य अगदी वास्तववादी व मानसशास्त्रीय, सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणारी एक उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांच्या बालपणापासून ते वैकुंठगमनापर्यंतच्या

Read More

राघववेळ (कादंबरी)- नामदेव कांबळे (थोडक्यात परिचय)

         ‘राघववेळ’ ही नामदेव कांबळे यांची पहिलीच कादंबरी. त्यांच्या या पहिल्याच साहित्यकृतीला १९९५ सालचे साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. या कादंबरीचे पुढे बंगाली भाषेत अनुवाद झालेला आहे. तर त्या अनुवादित कादंबरीलाही साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

         मांग समाजातील वालंबी व राघू या मायलेकांच्या संघर्षाची, कौशीच्या संसाराची कथा या कादंबरीत आलेली आहे. राघूचा समंजसपणा, शिक्षणासाठी त्याची चाललेली धडपड, त्याचा स्वाभिमानी स्वभाव, उंच Read More

हाल्या हाल्या दुधू दे (कादंबरी)- बाबाराव मुसळे – परिचय

          ‘हाल्या हाल्या दुधू दे’ ही बाबाराव मुसळे यांची पहिली कादंबरी. डाॅ. आनंद यादव आणि द. दि. पुंडे यांनी या कादंबरीची ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी’ म्हणून निवड करून तिची योग्यता मान्य केलेली आहे. ऑगस्ट १९८५ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने ही कादंबरी प्रकाशित केली.

         ग्रामीण भागातील न्यानबा या निम्नस्तरिय शेतकऱ्याची शोकांतिका या कादंबरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आनसा (पत्नी), सोबा (मुलगी), पर्कास (मुलगा), संबा (पुतण्या), वछिला (चूलत सून), शंकर पाटील,

Read More

रुबाब भाबी : काही आठवणी व इतर अनुभव

माझे आईवडील मुंबईत कांदिवलीतील लक्ष्मीनगर नावाच्या एका झोपडपट्टीत राहायचे. (माझे वडील तिथे ३५ वर्षे राहिले.) निसार माझ्याहून १३ दिवसांनी मोठा. मी लहान असताना त्याची आई रुबाब भाभी आमच्या दोघांची आंघोळ घालून द्यायची. तेलाने मस्त मालिश करून द्यायची. रुबाब भाबीचे सासरे माझ्या आई वडिलांना मुलामुलीसारखे मानायचे. त्यांची तिथे खूप जमीन होती. त्यापैकी एखाद दोन प्लॉट ते माझ्या

Read More

आर्थिक निकषावर आरक्षण : आक्षेप-


१) किती लोकं स्वत: ची खरी संपत्ती प्रामाणिकपणे जाहीर करतात?
२) कर भरणा-यांपेक्षा कर लपविणारे जास्त का आहेत?
३) अनेक जण त्यांच्याकडे भरपूर शेती असूनही ती कुटुंबातील अनेकांच्या नावावर करून स्वत: अल्पभुधारक असल्याचे दाखवितात.

Read More

अफू

लोकांना देवा-धर्माची एवढी अफू चारली गेलेली आहे आणि अलिकडे तिचे प्रमाण एवढे वाढविले जात आहे की, देवा-धर्माशिवाय आपलं काही खरं नाही, आपल्या आयुष्यातील संकटांवर आपण मात करू

Read More

हुस्न कि मलिका

तेरे हुस्न पे क्या लिखू
लब्ज डगमगा रहे हैं
तेरी हँसी सून के बागो में
कलियाँ खिल रही हैं.


चाँदसा मुखडा और
उसपे लहराते बाल
एे हुस्न की मलिका
तु है सच में कमाल.

Read More

कोऱ्या पानांपासून वह्या

आपण काय करू शकतो? – आम्ही दरवर्षी को-या कागदांपासून जवळपास ४०० पेक्षा जास्त वह्या शिवून त्या NSS साठी दत्तक घेतलेल्या गावातील शाळेत वाटत असतो. कोरी पानं कुठून उपलब्ध होतात? तर आपल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये जवळपास प्रत्येक विषयाचे प्रकल्प व इतर कामाच्या हजारो वह्या जमा झालेल्या असतात. ज्या एक किंवा दोन वर्षांनी रद्दी म्हणून विकल्या

Read More

श्रद्धा-अंधश्रद्धा

मंदिर डोंगराएवढं उंच असलं काय किंवा गुडघ्याएवढं असलं काय, भक्ती व श्रद्धेत काहीच फरक पडत नाही. तसंच दोन मिनिटे डोळे बंद करून देवाचे नाव घेतले काय किंवा सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत नाव घेत

Read More

आत्ता (कविता)- नामदेव ढसाळ

नामदेव ढसाळ हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव आहे. त्यांनी मराठी कवितेमध्ये मोलाची भर घातलेली आहे. अस्पृश्यांचे दारिद्र्य, दैन्य, शोषण, त्यांच्यातील जाणीव-जागृती, विद्रोह, नवसमाजाच्या निर्मितीसाठीचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या सर्वच कवितांमधून मांडलेले दिसून येते. 
नामदेव ढसाळ यांची ‘आत्ता’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी लावलेल्या ‘काव्यबंध’ या कसितासंग्रहात समाविष्ट आहे. ती अशी-

Read More

कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर

कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर

(‘गिरणांगण’ या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वार्षिकांकात वर्ष २००९-२०१० मध्ये प्रकाशित झालेला लेख)

मराठी साहित्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखनाने वैश्विक पातळीवर नेणाऱ्या आणि मराठीला तिसरे मानाचे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणाऱ्या विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे दि. १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. अवघ्या महाराष्ट्राने हे अटळ दुःख ‘माझ्या मन बन दगड…’ असे म्हणून सहन केले. त्यांच्या निधनाने मराठी काव्य क्षेत्रातील / साहित्यक्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला.

 

विंदांनी कविता, बालकविता या प्रकारांव्यतिरिक्त लघुनिबंध, समीक्षा, अनुवाद या प्रकारांतही लेखन करून मोलाची भर घातली. आपल्या ‘बहुपेडी’ व्यक्तिमत्वाने त्यांनी या साहित्यप्रकारांवर अमीट ठसा उमटविला. मात्र कवी म्हणूनच त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या आशयातील विविधता, नाविण्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा चेहरा – मोहरा बदलून टाकला. बालकवितांच्या माध्यमातून ते अवघ्या महाराष्ट्राच्या मुलांचे ‘आजोबा’ बनले. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना ‘संन्यासी कवी’, ‘ध्रुवताऱ्यासारखा अढळ प्रकाश देणारा’, ‘मराठी Read More

मराठी ग्रामीण कादंबर्‍यामधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती: एक अभ्यास (१९६० ते १९७५ या कालखंडातील)

मराठी ग्रामीण कादंबर्‍यामधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती: एक अभ्यास

(१९६० ते १९७५ या कालखंडातील)

        शेतमजूर हा ग्रामीण भागातील वेगळा असा वर्ग नसून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब, अल्पभूधारक, भूमिहीन, बलुतेदार वर्ग हे शेतकरी व जमीनदारांकडे सालगडी, कुळं, शेतमजूर म्हणून काम करताना दिसून येतात. शेतीशी संबंधित नांगरणी, वखरणी, कोळपणी, पेरणी, निंदणी, मशागत, कापणी, मळणी व इतर कामे हा वर्ग करत असतो. शेतमजुरांशिवाय शेतकरी व जमीनदार यांना शेती करणे शक्य झाले नसते. या वर्गाकडे शारीरिक श्रमाशिवाय उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन नसते. तसेच त्या कालखंडात त्यांना त्यांच्या कष्टाचा पुरेसा मोबदला मिळत नव्हता. यामुळे या वर्गाची परिस्थिती अतिशय हलाखीची दिसून येते. त्यांच्याकडे स्थावर मालमत्तासुद्धा फार नसते, बलुतेदार व भूमिहीनांकडे तर राहत्या घराशिवाय दुसरी मालमत्ता नसते. शेतकरी व जमीनदार यांच्यावर हे शेतमजूर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असतात. १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये या वर्गाच्या आर्थिक परिस्थितीचे सविस्तर चित्रण आलेले दिसून येते.

        ‘धग’ या कादंबरीतील शेतमजूर या वर्गाचा विचार करता असे दिसून येते की, शेतमजुरी करणार्‍यांमध्ये बलुतेदार, लहान शेतकरी व अस्पृश्य जातीतील लोकं आहेत. सीता म्हालीन ही शेतकरी कुटुंबातील आहे. कौतिक, कौतिकचा नवरा व मुले, सकीना, Read More