नवीन शैक्षणिक धोरण

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर वाचा, ऐका. कारण हे तुमच्या व तुमच्या पुढील पिढ्यांच्या तसेच देशाच्या भवितव्याशी निगडित आहे. सरकार हे धोरण इतक्या घाईत आणण्याचा प्रयत्न करत आहे की,

Read More

साहित्य, कला, संस्कृती

साहित्य, कला, संस्कृती इ. विषयांसंबंधी अभ्यासपूर्ण लेख, पुस्तके, व्याख्यानांचे व्हिडिओ, कविता अथवा इतर माहिती जिज्ञासूंना मिळावी, या उद्देशाने हा telegram ग्रुप तयार केला आहे. इच्छुकांनी जॉईन व्हावे. आपले विद्यार्थी, मित्र व तुमच्या संपर्कातील इतर जिज्ञासू, अभ्यासू, रसिक, वाचक यांनाही तुम्ही जॉईन व्हायला सांगू शकतात. या ग्रुपची दोन लाख सदस्यांची क्षमता आहे.

लिंक खाली दिली आहे.  Read More

एक तप पूर्ण!

दि. १८ जुलै रोजी मला अध्यापनाच्या क्षेत्रात येऊन १२ वर्षे पूर्ण झाली. कालच्याच दिवशी २००८ साली मी जळगावच्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात रुजू झालो होतो. त्यानंतर मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ज्युनियर रिसर्च फेलो व नंतर सिनियर रिसर्च फेलो म्हणून काम केले. गेल्या साडे आठ वर्षांपासून जव्हार येथे अध्यापन करीत आहे. Read More

लहान मुलांच्या मराठी भाषेच्या अभ्यासासाठी…

भाषा हे ज्ञान आत्मसात करण्याचे सर्वात महत्वाचे साधन, माध्यम आहे. त्यामुळे हे साधन चांगल्या पद्धतीने वापरता येणे, या माध्यमावर आपले प्रभुत्व असणे हे खूप गरजेचे असते. कोणतीही भाषा लहानपणी जेवढ्या सहज व लवकर शिकता येते. तेवढी नंतर जमत नाही. मोठं झाल्यावर भाषाशिक्षणासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात. 
अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण शहरांपासून तर अगदी खेड्यापाड्यांपर्यंत  पोहोचलेले आहे. मात्र इंग्रजी 

Read More

मेडिकलमधील ओबीसींचे आरक्षण रद्द

केंद्राच्या १५℅ कोट्यातील मेडिकलच्या एकूण जागांमधील ओबीसींसाठी असलेले २७% आरक्षण बंद करून टाकले गेलेले आहे. त्यामुळे यापुढे दरवर्षी जवळपास ३००० पेक्षा जास्त OBC च्या जागा कायमस्वरूपी संपून गेलेल्या आहेत.

गेल्या २ वर्षात OBC च्या मेडिकलमधील ५५०० पेक्षा जास्त जागा OBC ना न देता त्या general

Read More

बौद्धिक दबावगट

लोकशाही राज्यात दबावगट नावाची एक संकल्पना असते. आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक असे विविध क्षेत्रातील दबावगट असतात. औद्योगिक क्षेत्रातील लोकं असेच दबाव टाकून त्यांना योग्य व अनुकूल निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडतात. बौद्धिक क्षेत्रातील लोकांचाही दबावगट असतो. पण राज्यकर्ती मंडळी वैचारिकदृष्ट्या कमकुवत असली

Read More

विद्यार्थ्यांना उद्देशून..।

विद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्राध्यापकांनी लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस वाया न घालवता अनेक वेबिनार अटेंड केले, अनेकांनी वेबिनार आयोजित केले. ७ किंवा १४ दिवसांचे online कोर्स केले, व्हिडिओ, PPT कसे बनवावेत, ते एडिट कसे करावेत, Google form वगैरेसारख्या कित्येक गोष्टी शिकून घेतल्या. Youtube, zoom वरून भरपूर ऐकलं, पुस्तकं वाचली, तुमच्यासाठी नोट्स तयार केल्या, अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार केले. Facebook live, zoom, google meet च्या माध्यमातून तुम्हाला, समाजाला संबोधित केले. Online अनेक उपक्रम राबविले.

अनेकांनी आपले पीएचडी, एमफिलचे अपूर्ण राहिलेले काम पुढे नेले. ज्यांनी आपले प्रबंध आधीच विद्यापीठाला सादर केले होते, त्यापैकी काहींनी ऑनलाइन पद्धतीने मौखिक परीक्षा (Viva) देऊन पीएचडी पदवी संपादित केली.

Youtube वरून खूप सारे tutorial बघून अनेक कौशल्ये आत्मसात केली.


आम्ही जेव्हा-जेव्हा फोनवर बोललो तेव्हा जास्त तुमच्याविषयीच बोललो, तुमचीच काळजी आम्हाला वाटत राहिली. स्वतःचा हा विकास आम्ही फक्त तुमच्यासाठीच करत राहतो. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाचा व देशाचा फायदाच होतो.

तुम्ही काय केले? आत्मपरीक्षण करा.

मित्रांनो, आयुष्यात पुढे जायचे असेल तर स्वस्थ बसून कसे चालणार बरं? तुम्हीच सांगा व तुम्हीच ठरवा.

आयुष्यात जिथून जे मिळेल, ते आत्मसात करत नवीन शिकत राहायला हवे. कालपेक्षा आज आपली थोडी का असेना समज, आकलन, बौद्धिक उंची वाढलेली असायला हवी. थांबून चालणारे कसे?

एक शिक्षक
(सर्व शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी वरील मत व्यक्त केले.)

भारतीय लोकशाहीचे भविष्य

आज SYBA च्या वर्गात फळ्यावर’ संसद, लोकसभा / राज्यसभा, विधानसभा / विधानपरिषद असे शब्द लिहिले. भारतीय संसदेत काय येतं, असे विचारले. ३०-३५ मुलांपैकी कुणालाच सांगता आलं नाही. त्यानंतर तुम्ही ज्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून देतात ते वरीलपैकी कोणत्या सभागृहात जाऊन बसतात , असे विचारले. नाही सांगता आले. नाही सांगता आले.

मागच्या वर्षी NSS मधील प्रवेशासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काेणत्याही ५

Read More

नेट/ सेटच्या अभ्यासासाठी मी वापरलेली काही पुस्तके व माझे काही अनुभव

             मी जून २००७ मध्ये एम. ए. झालो. त्याच महिन्यात २९ जून रोजी झालेली नेट परीक्षा मी (नोव्हेंबरमध्ये निकाल) उत्तीर्ण झालो. त्यानंतर जून २००८ मध्ये झालेली नेट परीक्षा मी JRF सह उत्तीर्ण झालो. नंतर मी दोन वर्ष JRF व चार महिने SRF (फेलोशिप) घेतली. 

            डिसेंबर २०११ च्या आधी ही परीक्षा फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपाची नव्हती. पहिला व दुसरा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असायचा तर तिसरा पेपर लिहावा लागायचा. त्यात संकल्पना, दीर्घोत्तरी प्रश्न, ४० गुणांसाठी निबंध इ. स्वरूपाचे प्रश्न विचारले जायचे व २०० गुणांच्या पेपरसाठी फक्त अडीच तास वेळ दिलेली असायची. तेव्हा कमी वेळेत अतिशय अचूक उत्तरे लिहावी लागायची. Read More

भारतातल्या कोरोनावाढीला जबाबदार कोण होतं?

घटनाक्रमाकडे जरा लक्ष द्या-

३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.

फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखो लोकं एकत्र केले गेले.

१६ मार्चपर्यंत अख्या भारतातील शाळा, महाविद्यालये सुरू होती.

१९ मार्चला जनता कर्फ्युची घोषणा

२२ मार्चला जनता कर्फ्यूचा फार्स पार पडला.

२३ तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन सुरू होते.

२३ तारखेला मध्यप्रदेशात शपथ घेतली.
२४ तारखेला बहुमत सिद्ध केले.

Read More

‘बारोमास’ कादंबरीतील शेवंतामाय

            शेवंतामाय ही ‘बारोमास’ या कादंबरीतील एक महत्वाची स्त्री  व्यक्तिरेखा आहे. ती एक अशिक्षित ग्रामीण स्त्री आहे. शेतात काम करणे, नवर्‍यासोबत गरिबीच्या संसाराचा गाडा हाकणे, यातच तिचे आयुष्य जात राहते. ती मोठ्या आशेने कष्ट करून दोन्ही मुलांना शिकवते. एकनाथ एम. ए., बी. एड. तर मधू शेतकी होतो.  आपली मुले शिकून नोकरीला लागतील, या आशेने ती शिकणार्‍या मुलांचे वेळेवर डबे करून देणे, कपडे व्यवस्थित धुणे इ. कामे कित्येक वर्षे करत राहते. परंतु, एकही मुलगा नोकरीला न लागल्यामुळे शेवटी तिला अपयश येते.

            गरिबीमुळे तिला अंगावर नवीन साडीही मिळत नाही. म्हणून ती जुन्या साड्या एकमेकांना जोडून (त्यांचे दांडे भरून) ते वापरते. संसार चालवण्यासाठी, घरखर्च किंवा शेतीत खर्चासाठी तिच्या सोन्याचा पुतळ्या, पाटल्या विकले गेलेले असते. तरीही ती कधीही कुणाकडे तक्रार करत नाही. शेवंता माय ही जरी कष्टाळू व काही प्रमाणात समजूतदार, परिस्थितीशी जुळवून घेणारी असली तरी ती तोंडाळ आहे. सुनेला, एकनाथला ती नेहमी घालून-पाडून बोलते. एकनाथ एवढा शिकलेला व आज्ञाधारक असला तरी त्याचा बायकोबाबतचा काळजीपूर्ण व्यवहार पाहून ती एकनाथला ‘बाईलबुग्या, बायकोचा भाड्या’ असे शब्द अनेकदा वापरते. मधूपुढे मात्र तिचे काही चालत नाही. मधू नोकरीसाठी शेती कराराने लिहून देतो व तिच्याकडे एक लाख रुपये ठेवायला देतो. तेव्हा तिला रात्र रात्रभर झोप येत नाही. ते पैसे ती एका पेटीत ठेवते. त्या पेटीला कुलूप लावते व अतिशय काळजी घेते. घराबाहेरही कधी जात नाही. त्यानंतर ते पैसे घरात खड्डा खोदून त्यात पुरून टाकते. Read More

नवीन, आधुनिक व विधायक समाजनिर्मितीसाठी संशोधनाची गरज

             मेंदूत नवीन विचार व कल्पनाच येत नसतील, तर नवीन संशोधन कसे होणार? संशोधनच नाही झाले तर आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, शस्त्रास्त्रे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरण संरक्षण, शहर नियोजन इ. इ. क्षेत्रांमध्ये नवीन भर पडून त्यावर आधारित उद्योग, व्यवसाय कसे निर्माण होणार? असे काही घडले नाही तर अनेकांच्या हाताला काम कसे मिळणार?

Read More