मी

कधीकधी माझ्याचकडे मी

तटस्थपणे बघतो 

माझ्यातच मला

कधीही न भेटलेला

दुसराच ‘मी’ गवसतो 

 

त्याच्याशीच गप्पा मारण्यात

वेळ माझा निघून जातो

Read More

‘द्ध’ की ‘ध्द’?

आपल्या मराठी व हिंदी भाषेत ‘द्ध’ हे जोडाक्षर
शुद्ध,
युद्ध,
विरुद्ध,
समृद्धी,
प्रसिद्ध,
प्रसिद्धी,
प्रतिबद्ध,
वृद्धी,
बुद्ध,
रिद्धी,
सिद्धी,
सिद्ध
अशा अनेक शब्दांमध्ये येते.

मात्र बरेच जण हे शब्द

Read More

माझे मत वाया गेले!

माझे मत वाया गेले!

            भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की, ‘तुमचे मत वाया गेले की सत्कारणी लागले’. म्हणजे तुम्ही ज्यांना मत दिले तो निवडून आला की नाही. यावरून त्यांना कळते की समोरच्याने कुणाला मतदान केले.

Read More

आठवणी

कुणीतरी आयुष्यात येतं

येतं आणि निघून जातं

आठवणींना का सोबत नेत नाही

त्या का मागे सोडून जातं?

 

माणसं त्रास देत नाहीत Read More

कोरोना आणि एकांत

कोरोना आणि एकांत


          मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाने सर्व जगभर थैमान घातलेले आहे. या विषाणूपासून होणाऱ्या आजारामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेले असून लाखोंना याची लागण झालेली आहे. या विषाणूवर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध सापडले नसल्याने याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला बाहेरच्या सर्वांशी प्रत्यक्ष संपर्क तोडून, सर्व कामधंदे सोडून घरात बसणे भाग आहे. अशा पद्धतीने रिकामे घरात बसणे अनेकांना असह्य होत असल्याने बरेच जण बाहेर पडणे चुकीचे आहे, हे माहित असताना देखील एखादा फेरफटका मारून येत आहेत. आज मात्र आपल्याला सक्तीचे घरात बसून राहावे लागणार आहे. एवढेच नाही तर पुढे कदाचित अनेक दिवस आपल्याला घरात बसून काढावे लागतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

          मित्रांनो, आपण सर्वच जण (आजच्या घडीला जगभरातील ४०० कोटींपेक्षा जास्त लोकं) या सक्तीच्या एकांताला

Read More

तौलनिक साहित्याभ्यास – १ (माझ्या पीएचडीच्या प्रबंधातून)

तुलना करणे ही मानवाची स्वाभाविक अशी प्रवृत्ती आहे. आपण नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, प्रकट वा अप्रकट तुलना करीत असतो. तुलना करताना एकापेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता असते. अशा एकापेक्षा अधिक गोष्टींमधून एकाची निवड करावयाची असेल तर तुलना ही आपोआपच आपल्याकडून होत असते. तर कधी-कधी ती आपण जाणिवपूर्वक करत असतो. आपण आपले विचार, मूल्य ठरवितानाही तुलना करूनच आपल्या स्वभावानुरूप ठरवित असतो.

साहित्याचा विचार करताना तुलनेला अत्यंत

Read More

कोजागिरीचा चंद्रमा

🌝कोजागिरीचा चंद्रमा🌝

 

कोजागिरीचा चंद्रमा

मला वेगळाच भासला

तोही एकटा, मीही एकटा

डोळे भरून मी त्याला पाहताना

तो मला खुणावताना दिसला.

कोजागिरीचा चंद्रमा…–१–

Read More

बस एवढंच…बाकी काही नाही

बस एवढंच…बाकी काही नाही

 

काही क्षण पकडून ठेवावेसे वाटतात चिमटीत

पण  जातात निसटून  क्षणार्धात…

आणि  शिरतो आपण दुसर्‍या  क्षणांमध्ये

आपल्याही नकळत…

Read More

माय (जात्यावरचे गाणे)

साधारणतः १४-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा माझी आई जात्यावर काम करत असताना अहिराणी बोलीत काही ओव्या गुणगुणत होती. त्या मी लिहून घेतल्या व त्यांच्या खाली काही ओव्या मी जुळवल्या होत्या.

आई म्हणत असलेल्या ओव्या खालीलप्रमाणे-

माय

माय माय करू माय नदीतली शाऊ

मायनी दिधा जन्म चार बहिणी दोन भाऊ ।।१।।

माय माय करू माय सोनानी परात

मायना बिगर चित लागेना घरात ।।२।।

ट्रॉयमधील तत्त्वज्ञान

प्रिय मित्रांनो,

   ‘ट्रॉय’ हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट आहे. तो होमरच्या ‘इलियड’ या महाकाव्यवर आधारलेला आहे. या चित्रपटाला ऑस्करसह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या चित्रपटातील अखिलिस या पात्राच्या तोंडी आलेली पुढील वाक्ये मला खूप आवडतात- Read More

परीक्षांना सामोरे जाताना… (विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त)

दरवर्षी असंख्य विद्यार्थी विविध परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना अपयश येत असते. तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले यश मिळत नाही. याचा अर्थ त्यांना परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा फॉर्म्युला माहित नसतो, असे म्हणावे लागेल. तेव्हा या यशाचा फॉर्म्युला मी आज आपणासमोर मांडणार आहे.

जगातील कोणत्याही परीक्षेला सामोरे जायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या पुढीलप्रमाणे-

Read More

पत्नी ही कुत्रीसारखी असते!- एक कीर्तनकार

आज मी एका मोबाईलच्या दुकानावर माझ्या आयडियाच्या कार्डची पोर्टेबिलिटी करायला गेलो होतो. तिथे एक बुवा त्या दुकानदाराला एका गोष्टीच्या आधारे आईचे महत्त्व समजावून सांगत होता. (दोन-तीन दिवसांपूर्वी याच दुकानावर तो बुवा याच मोबाईलवाल्याला ‘माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ युट्युबवर टाकायचे आहेत. तुम्हाला टाकता येतील का?’ असे विचारत होता). मी तिथे पोहचलो, तेव्हा ती गोष्ट अर्धी झाली होती. ती अशी-

माणूसपण

माणूसपण

 

माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. उदा. धर्म, जात, पंथ, संप्रदाय, पक्ष, लिंग, वय, वर्ण, रंग, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, देश, प्रांत, वंश, भाषा, वेशभूषा, संस्कृती, प्रथा-परंपरा, दैवते, विचारधारा, प्रस्थापित-विस्थापित इ. इ.

Read More

🚴🏾🚴🏾🚴🏾 ८० किमी – एक प्रवास 🚴🏾🚴🏾🚴🏾

 🚴🏾🚴🏾🚴🏾 ८० किमी – एक प्रवास 🚴🏾🚴🏾🚴🏾

(३०/१०/२०१७ च्या डायरीतील पान)

       परवा २८ ऑक्टो. (२०१७) ला मी नाशिकला गियरची सायकल घेतली. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून घ्यायचं चाललेलं होतं. परवा घेतली आणि काल नाशिक ते जव्हार (८० किमी अंतर) चालवत आणली. सकाळी ६.४५ ला निघालो. ३.४५ ला पोहचलो. म्हणजे ९ तास लागले. 

Read More

Adventure camp report

साहसी शिबिर अहवाल

(मुंबई विद्यापीठाला सादर केलेला अहवाल)

(Adventure camp report)

        दि. ०५ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१६ दरम्यान Atal Bihari Vajpayee Institute of mountaineering and Allied Sports, Regional Mountaineering Centre, धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे साहसी शिबिर (Adventure camp) घेण्यात आले. या शिबिरात मुंबई विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांचा (५ मुले व ५ मुली) संघ पाठविण्यात आला होता. या संघाचे नेतृत्व प्रा. राहूल पाटील (कार्यक्रम अधिकारी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर) यांनी केले.

Read More

चित्रपट कार्यशाळा

         दि. १२ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या दरम्यान मुर्टी,  ता. बारामती येथे चित्रपट निर्मिती कार्यशाळेत (निवासी) सहभागी झालो होतो. अक्षर मानव या संघटनेनेnही कार्यशाळा आयोजित केली होती. ७ दिवसांच्या कार्यशाळेसाठी सहभागी व्यक्तींकडून १०,०००/- रु. शुल्क घेण्यात आले होते. तर अक्षर मानव संघटनेच्या आजीव सदस्यांना ३०००/- सूट देण्यात आली होती. 

          चित्रपट या माध्यमाविषयी समज निर्माण व्हावी, पटकथा, चित्रिकरण, संपादन, दिग्दर्शन, गीतरचना इ. इ. गोष्टींची, विविध तंत्रांची माहिती व्हावी व माझ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काही संधी मिळू शकते का? याचा शोध घ्यावा, या उद्देशाने मी या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. या कार्यशाळेत Read More

देशद्रोही?

देश हा फक्त भौगोलिक सीमांनी मिळून बनलेला नसतो. तर भौगोलिक प्रदेश व त्या भुप्रदेशातील माणसांनी मिळून देश तयार होत असतो. जसे घर हे फक्त भिंतींनी बनलेले नसते, तसेच देशाचे आहे. Read More