शिक्षण क्षेत्रात अपेक्षित बदल…

शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदलाची गरज आहे.

१) सर्वांना सर्व प्रकारचे गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण २) शिक्षक व प्राध्यापकांच्या १०० टक्के रिक्त जागा भरती.

३) शिक्षक व प्राध्यापकांची डोनेशन व वशिलामुक्त

Read More

जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना मारहाण

जे व्हिडिओ बघायला मिळत आहेत त्यावरून स्पष्ट कळत आहे की, दिल्ली पोलीस गुंडागर्दी करत आहे. निष्पाप विद्यार्थ्यांना काठीने फोडून काढत आहे.

व्हिडिओंवरून हे पण दिसून येत आहे की, अनेक जण साध्या कपड्यांमध्ये आहेत आणि ते पोलीस वाटत नाहीयेत. ते भाड्याने आणलेले गुंड असू शकतात किंवा एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते असू शकतात की ज्यांना मुद्दामहून मुलांना मारण्यासाठी

Read More

नाशिकमधील कार्पोरेट जिहाद!

नाशिकमध्ये खरात प्रकरण घडले, एका व्यावसायिकाने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ बनवले. या अगदी ताज्या घटना आहेत. पण यातील आरोपी हिंदू असल्याने खोटे धर्मप्रेमी तोंडात मुग गिळून गप्प बसले होते. पण नाशिकमध्येच TCS मध्ये जे तथाकथित धर्मांतर/ यांच्या भाषेत कार्पोरेट जिहादचे प्रकरण घडल्यावर आता मात्र उंदरासारखे घराबाहेर पडून कुत्र्यासारखे

Read More

चांगले लोकप्रतिनिधी निवडणे का गरजेचे असते?

आपण काय शिकावं, किती फी देऊन शिकावं, कोणती पुस्तके अभ्यासावीत, आपल्या गावातील शाळा चालू ठेवावी की बंद करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा की नाही, खते कीटकनाशके बियाणे यांचे भाव काय असावा, जनतेने भेसळयुक्त अन्न

Read More

सावधान! इतिहास पुसला जात आहे!

भारताने इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा हा भारताच्या व जगाच्या इतिहासातील एक अतिशय प्रेरणादायी व अभिमानास्पद असा अध्याय आहे. 
ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता अशा राज्यकर्त्यांविरुद्ध आपण शंभरहून अधिक वर्ष लढा दिला व  त्यात यशस्वी झालो. हा लढा अनोखा होता. जनमत संघटित करून, लोकांना शांततेच्या मार्गाने लढण्याचे वेगवेगळे प्रयोगशील मार्ग दाखवून, इंग्रजांशी वाटाघाटी करून तसेच अनेक क्रांतिकारकांनी प्रसंगी शस्त्र उचलून, आपल्या आयुष्याचे बलिदान देऊन आपले योगदान दिले. या लढ्याचे नेतृत्व दादाभाई नवरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, फिरोजशहा मेहता, साने गुरुजी, सेनापती बापट, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल… या उच्चशिक्षित नेत्यांनी तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर

Read More

भ्रष्टाचारामुळे निसर्गाचा ऱ्हास

रस्ते, महामार्ग, बोगदे, पूल बांधण्यासाठी खडी, सिमेंट, वाळू, लोखंड इत्यादी घटक लागतात. खडी तयार करण्यासाठी डोंगर नष्ट केले जातात. त्यासाठी झाडे, वनस्पती व तेथील प्राणीसृष्टी नष्ट होते. निसर्ग विद्रुप होतो. वाळू काढण्यासाठी नद्या उपसल्या जातात. त्यामुळे जमिनीत पाणी जिरण्याची क्षमता कमी होते. नद्यांना पूर येतात. नद्यांच्या काठावरची शेती योग्य जमीन, माती वाहून जाते. सिमेंट तयार

Read More