भारताने इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा हा भारताच्या व जगाच्या इतिहासातील एक अतिशय प्रेरणादायी व अभिमानास्पद असा अध्याय आहे.
ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता अशा राज्यकर्त्यांविरुद्ध आपण शंभरहून अधिक वर्ष लढा दिला व त्यात यशस्वी झालो. हा लढा अनोखा होता. जनमत संघटित करून, लोकांना शांततेच्या मार्गाने लढण्याचे वेगवेगळे प्रयोगशील मार्ग दाखवून, इंग्रजांशी वाटाघाटी करून तसेच अनेक क्रांतिकारकांनी प्रसंगी शस्त्र उचलून, आपल्या आयुष्याचे बलिदान देऊन आपले योगदान दिले. या लढ्याचे नेतृत्व दादाभाई नवरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, फिरोजशहा मेहता, साने गुरुजी, सेनापती बापट, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल… या उच्चशिक्षित नेत्यांनी तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर
Month: July 2026
भ्रष्टाचारामुळे निसर्गाचा ऱ्हास
रस्ते, महामार्ग, बोगदे, पूल बांधण्यासाठी खडी, सिमेंट, वाळू, लोखंड इत्यादी घटक लागतात. खडी तयार करण्यासाठी डोंगर नष्ट केले जातात. त्यासाठी झाडे, वनस्पती व तेथील प्राणीसृष्टी नष्ट होते. निसर्ग विद्रुप होतो. वाळू काढण्यासाठी नद्या उपसल्या जातात. त्यामुळे जमिनीत पाणी जिरण्याची क्षमता कमी होते. नद्यांना पूर येतात. नद्यांच्या काठावरची शेती योग्य जमीन, माती वाहून जाते. सिमेंट तयार
Read More