२००६-०७ ची गोष्ट आहे. आमच्या अमळनेरमध्ये मिश्रा नावाचा एक कुणीतरी प्रसिद्ध बाबा आला होता. त्याने डोक्यावरून हात फिरवला व काही भस्म वगैरे लावले तर आपले सर्व दुःख, वेदना नष्ट होतात, इच्छा पूर्ण होतात, अशी जाहिरात करण्यात आली होती. तेव्हा व्हाट्सअप, फेसबुक नसतानादेखील त्याची
Read MoreCategory: Uncategorized
रिफ्रेशर कोर्स के अंतिम दिन पर मेरे विचार
HRDC पटियाला पंजाबी यूनिवर्सिटी की ओर से लैंग्वेज विषय पर आयोजित रिफ्रेशर कोर्स के इस समारोह सत्र में मुझे मेरा मनोगत व्यक्त करने का जो मौका प्रदान किया उसके लिए में सबसे पहले इस रिफ्रेशर कोर्स के डायरेक्टर आदरणीय शिवानी मैडम, हमारे दोस्त आदरणीय डॉ. सुमित गर्ग और सभी पदाधिकारीयो का और सहभागी सभी दोस्तोंका तहे दिल से आभार व्यक्त करता हूं ।
यह रिफ्रेशर कोर्स 8 जनवरी 2025 को शुरू हुआ था. पहले दिन उद्घाटन सत्र हुआ और उसके बाद ३ लेक्चर हुए। हर रोज सुबह 9:00 बजे से
ब्लॉग लेखन
एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, विविध समाजमाध्यमे यांचा वापर वाढलेला असून ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. आजच्या काळात ज्ञान, माहिती, मनोरंजन, जाहिरात आणि प्रबोधन हे घटक विशिष्ट लोकांपुरते, विशिष्ट प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, त्यावर फक्त त्यांचीच मक्तेदारी न राहता सामान्य माणसंही त्यांचा वापर करू लागले आहेत. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची ओळख निर्माण करण्याची, स्वतःची नाममुद्रा उमटवण्याची संधी प्राप्त झाली आहे. स्वतःचे संकेतस्थळ, Facebook account/ page, Twitter, Instagram यांच्या वापरातून अनेकांनी स्वतःचा एक अनुयायी वर्ग (Followers) निर्माण केला आहे. यांसारखेच ‘ब्लॉग’ हे एक सामाजिक माध्यम आहे. त्याला ‘अनुदिनी’, ‘जालपत्रिका’ किंवा ‘जालनिशी’ ही नावेही वापरली Read More
व्यायामाला १ वर्ष पूर्ण (१७ मार्च २०२६)
*मला हा कोर्स जॉईन करून एक वर्ष पूर्ण झाले.* फिटनेसच्या बाबतीत माझ्या आयुष्याचे टप्पे करायला गेलो तर दोन टप्पे करता येऊ शकतात. एक म्हणजे हा कोर्स जॉईन करायच्या आधीचा व त्यानंतरचा.
✓ गेल्या १ वर्षांपासून मी सातत्याने व्यायाम करत आहे.
✓ डाएट अगदी सहजपणे पाळत आहे. एक वर्ष झाला added साखर, तेलकट पदार्थ खाणे
मुंबईच्या काही आठवणी
माझ्या वडिलांची ३५ वर्षे मुंबईच्या कांदिवलीतील लक्ष्मीनगर, हनुमान नगरमधील झोपडपट्टीत गेली आहेत. मला त्या जीवनाचा चांगला अनुभव आहे. मला नोकरी लागल्यावर व पगार चालू झाल्यावर २०१३मध्ये त्यांनी मुंबई सोडले. माझ्या वडिलांना
Read Moreचांगल्या आरोग्यासाठी
समाजाला डॉक्टरांइतकीच #आहारतज्ज्ञ व #फिटनेस_कोच यांची गरज आहे. आपल्या आजूबाजूला आरोग्याच्या बाबतीत जागरूक नसलेले लोक आढळतात. प्रत्येकाचं काही ना काही दुखत असतं. कुणाला #ऍसिडिटी असते तर कुणाला कोणता न कोणता त्रास असतो. आपल्याला असं वाटतं की जगणं असंच असतं. नेहमी काही ना काही दुखत असतं. पण खरंतर तसं नाहीये. जर आपण व्यवस्थित #व्यायाम केला, आहार व्यवस्थित ठेवला, पुरेशी झोप/ विश्रांती घेतली तर अशा तक्रारी खूप
Read Moreलोकशाहीपुढील आव्हाने
औरंगजेब याचे स्टेट्स ठेवणे चुकीचेच होते. पण असे केल्याने कुणाचाही अपमान होत नाही. मात्र इथे खालील घटना घडताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाचाही अपमान होत नाही. उदा.
● गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळीबार
Read Moreमराठी विभाग – जव्हार महाविद्यालय – विविध उपक्रमांची यादी – २०१७-१८ ते २०२३-२४
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,
जव्हार, जि. पालघर – ४०१ ६०३
मराठी विभाग
विविध उपक्रमांची यादी
‘सर ए राह’ अतिशय सुंदर पाकिस्तानी स्त्रीवादी मालिका
‘सर-ए-राह’ ही एक पाकिस्तानी मालिका आहे. इतकी छान मालिका मी अलीकडच्या काळात भारतात नाही बघितली. या मालिकेचे एकूण ६ एपिसोड आहेत. पाकिस्तानमधील पुरुषप्रधान संस्कृती, मानसिकता या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या चार तरुण मुली/
Read Moreमीही सुवर्णपदक परत करणार होतो!
मी बीए व एम.ए.ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (जळगाव) प्रथम आलेलो असल्याने मला दोनदा सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच मी २००७ साली एम.ए. झाल्या झाल्या नेट परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. पुढच्याच वर्षी नेट-जेआरएफ पण उत्तीर्ण झालो. तरीही मुलाखतींना जायचो तेव्हा भरमसाठ डोनेशनची मागणी व्हायची. चार-साडेचार वर्ष झाले तरी मला नोकरी मिळत नव्हती. ज्या महाविद्यालयात मराठीची एक जागा
Read Moreनव मानवसमाज निर्माण होण्यासाठी उपाय
- आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत. (पुढे वाचा…)
नवा मानव समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न
- आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत. (पुढे वाचा…)
अनिल काकोडकर यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे-
३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी, २०१८ असे दोन दिवस जव्हारमध्ये मराठी विज्ञान परिषद व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूलच्या वतीने जव्हारमध्ये दोन दिवसीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी थोर अणुशास्त्रज्ञ पद्मश्री, पद्मभुषण, पद्मविभुषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण उपस्थित होते. या प्रसंगी काकोडकर सरांचे व्याख्यान झाले. यानंतर त्यांचे जव्हार परिसरातील शिक्षक प्राध्यापकांसोबत
Read Moreप्राध्यापक व्हायचंय? मग हे करा-
नेट/ सेट उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो, प्राध्यापक व्हायचंय?
नेट/ सेट उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
पण खरा संघर्ष आता सुरू होईल. कारण स्पर्धा खूप
प्राध्यापकांचे शोषण
प्राध्यापकांचे सर्वात जास्त व भयंकर असे शोषण हे संस्थाचालकांकडून होते. आजच्या घडीला सहाय्यक प्राध्यापक बनण्यासाठी ४० ते ६० लाख रुपये रेट
Read Moreनेट उत्तीर्ण
प्रिय मित्रांनो,
आपल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट सेट)’ या ग्रुपमधील/ माझ्या संपर्कातील/ माझ्या YouTube channelवरील व्हिडीओ बघणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी
दि. ०५/०९/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यापासून आपल्यालाही प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांची नावे पुढे देत आहे.
१) संदीप पोपटराव भदाणे (साक्री, जि. धुळे)
२) सुरेश बापूराव पारवे
३) अमित आप्पा गवळे (रायगड)
४) मोहनसिंग बुधासिंग मुझालदा (इंदौर)
५) सोमनाथ गायकवाड (औरंगाबाद)
६) प्रतीक राऊत (अकोला, पुणे विद्यापीठ)
७) टेंगसे श्रेया मनोहर (गोवा)
८) बडगे उमेश रावसाहेब (बीड)
९) क्षितिजा अजय आगाशे
१०) गोंटलेवार गणेश पांडुरंग (ता. वाडा, जि. पालघर)
११) महेश घावट (मुरबाड, जि. ठाणे)
१२) दत्ता महाले (अमरावती विद्यापीठ)
१३) रुपेश मेटकर (अमरावती विद्यापीठ)
१४) गणेश पोकळे (अमरावती विद्यापीठ)
१५) अर्चना सोळंके (अमरावती विद्यापीठ)
१६) निकेत चंदिवाले (अमरावती विद्यापीठ)
१७) गायत्री मुळे (अमरावती विद्यापीठ)
१८) अडलिंगे सूर्यकांत श्रीधर (सोलापूर)
१९) संगीता जगन्नाथ शेळके (नाशिक)
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यासाठी शुभेच्छा! तसेच इतरांनाही पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा!✌️✌️
डॉ. राहूल भालेराव पाटील
आदिवासींचे आरक्षण धोक्यात!
आधी सोबतच्या कात्रणातील बातमी व्यवस्थित वाचा. त्यात भाजपच्या हिंदुत्ववादी केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमध्ये डोंगराळ भागात राहणाऱ्या मुस्लिम व इतर समूहातील लोकांचा ST संवर्गात समावेश करण्यात आला आहे.
RSSवाले आदिवासींना ‘आदिवासी’ न म्हणता ‘वनवासी’ म्हणतात. वनवासी म्हणजे वनात/ जंगलात राहणारे. ‘वनवासी’ या शब्दात जंगलात राहणाऱ्या सर्वांचा समावेश होतो.
अशा पद्धतीने आदिवासींना वनवासी म्हणण्याचा व ते खपवून घेण्याचा दुष्परिणाम असा होऊ शकतो की-
Read Moreबहुजनांचा उद्धार कुणामुळे झाला?
बहुजन समाजातील अनेक जण आज नोकरी, व्यवसाय करत आहेत, उच्चशिक्षित आहेत. आनंदाने जीवन व्यतित करत आहेत. अतिशय आनंदाची व समाधानाची बाब
Read Moreकुंकू, टिकली व भिडे
कुंकू व संस्कृतीचा, धर्माचा संबंध जोडणाऱ्यांनो, इकडे लक्ष द्या.
● धर्माच्या व संस्कृतीच्या नावानेच या देशामध्ये स्त्रियांना भावीण, जोगतीणी म्हणून सोडले जायचे व त्यांचा उपभोग, लैंगिक शोषण ज्यांना ज्यांना शक्य होईल, ते
Read Moreजात व धर्माचे कोष, त्याचे परिणाम
भारतीय समाजात प्रत्येक ‘जात’ हा एक कोष आहे व असे असंख्य कोष ‘धर्म’ या कोषात समाविष्ट आहेत.
काही जण थोड्या फार प्रमाणात पहिल्या कोषातून बाहेर पडले की दुसऱ्या मोठ्या कोषात अडकतात. परंतु या
Read Moreपंडित जवाहरलाल नेहरूजी कितने साल जेल में रहे थे?
पंडित जवाहरलाल नेहरूजी कितने साल जेल में रहे थे?
कुल 3258 दिन ÷365=8.92 याने ९ साल
पहली बार- 6 दिसंबर, 1921 से 3 मार्च, 1922 – 87 दिन
Read More‘ससा आणि सर्कस’(SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)
‘ससा आणि सर्कस’ ही कथा बाब्या नावाच्या एका पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या जीवनावर आधारलेली आहे. बाब्या पाच-सहा वर्षाचा असूनही त्याला ‘मा’ आणि ‘बा’ या दोन शब्दांशिवाय काहीच बोलता येत नाही. त्याच्या वेळेस त्याची आई गरोदर असताना तिच्याकडून काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी खाल्ली गेली होती. त्यामुळे बाब्या मंदबुद्धी म्हणून जन्माला आला. मोठा होऊनही त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला नाही.
बाब्यासोबत नेहमी एक ससा राहायचा. तो कुठेही गेला तरी सशाची साथ सोडायचा नाही. हा ससा त्याला एका वर्षापूर्वी Read More
हिंदू धर्म: विचार करण्याजोगे काही प्रश्न
विचार करण्याजाेगे प्रश्न
१) हिंदू धर्म भारत व नेपाळ या मोजक्या देशांबाहेर का वाढू शकला नाही?
२) हिंदू धर्मातून जैन, बौद्ध, शिख, लिंगायत हे धर्म
मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢
मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢
या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ६ तारखेला माझे आजोबा (आईचे वडील) वारले. आज माझी आजी (आईची आई) त्यांच्या पाठोपाठ गेली. साधारणतः ८६ वय होते. माझ्या आजीचे संपूर्ण आयुष्य हे गरिबी, कर्जबाजारीपणात व
खरा आत्मनिर्भर कोण आहे?
जो देवाधर्माच्या पलीकडे गेलेला असतो, तोच खऱ्या अर्थाने ‘आत्म’निर्भर असतो.
कारण तो
१) त्याच्या आयुष्यातील लहान-मोठ्या समस्या, प्रश्न,
नरेंद मोदी व मी…
नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी तसा फार प्रयत्नही केला नाही. कारण
Read Moreआमचा राम, त्यांचा श्रीराम
आमचा राम राम।
त्यांचा जय श्रीराम।।
आमची लोकशाही।
मानवाची आधुनिक काळातील वाटचाल
मानवाचा आधुनिक काळापासूनचा सुधारणेचा इतिहास हा धर्मसत्तेविरूद्धच्या संघर्षाचा व धर्मसुधारणेचा इतिहास आहे. युरोपात या प्रक्रियेला चौदाव्या – पंधराव्या शतकापासून तर आपल्याकडे
Read Moreविवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांबद्दल…
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1753475321512027&id=100005487283430 या लिंकमधील पोस्टवरील माझी प्रतिक्रिया खाली दिली आहे.
Read Moreमी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी-
मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी – मी धर्माला नव्हे तर धर्माच्या नावाने चाललेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, राजकारण,
Read More
१००० Subscriber पूर्ण झाल्याबद्दल आभार…!
आज माझ्या youtube channel चे १००० Subscriber झाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक, नातेवाईक मित्र-मैत्रिणींचे त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, इतिहास, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मला अभ्यासांती,
‘संतसूर्य तुकाराम’ – आनंद यादव (थोडक्यात परिचय)
‘संतसूर्य तुकाराम’ ही आनंद यादव यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर आघात करणारी, परंतु तुकारामांचे अवघे आयुष्य अगदी वास्तववादी व मानसशास्त्रीय, सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणारी एक उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांच्या बालपणापासून ते वैकुंठगमनापर्यंतच्या
रुबाब भाबी : काही आठवणी व इतर अनुभव
माझे आईवडील मुंबईत कांदिवलीतील लक्ष्मीनगर नावाच्या एका झोपडपट्टीत राहायचे. (माझे वडील तिथे ३५ वर्षे राहिले.) निसार माझ्याहून १३ दिवसांनी मोठा. मी लहान असताना त्याची आई रुबाब भाभी आमच्या दोघांची आंघोळ घालून द्यायची. तेलाने मस्त मालिश करून द्यायची. रुबाब भाबीचे सासरे माझ्या आई वडिलांना मुलामुलीसारखे मानायचे. त्यांची तिथे खूप जमीन होती. त्यापैकी एखाद दोन प्लॉट ते माझ्या
Read Moreआर्थिक निकषावर आरक्षण : आक्षेप-
१) किती लोकं स्वत: ची खरी संपत्ती प्रामाणिकपणे जाहीर करतात?
२) कर भरणा-यांपेक्षा कर लपविणारे जास्त का आहेत?
३) अनेक जण त्यांच्याकडे भरपूर शेती असूनही ती कुटुंबातील अनेकांच्या नावावर करून स्वत: अल्पभुधारक असल्याचे दाखवितात.
हुस्न कि मलिका
तेरे हुस्न पे क्या लिखू
लब्ज डगमगा रहे हैं
तेरी हँसी सून के बागो में
कलियाँ खिल रही हैं.
चाँदसा मुखडा और
उसपे लहराते बाल
एे हुस्न की मलिका
तु है सच में कमाल.
कोऱ्या पानांपासून वह्या
आपण काय करू शकतो? – आम्ही दरवर्षी को-या कागदांपासून जवळपास ४०० पेक्षा जास्त वह्या शिवून त्या NSS साठी दत्तक घेतलेल्या गावातील शाळेत वाटत असतो. कोरी पानं कुठून उपलब्ध होतात? तर आपल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये जवळपास प्रत्येक विषयाचे प्रकल्प व इतर कामाच्या हजारो वह्या जमा झालेल्या असतात. ज्या एक किंवा दोन वर्षांनी रद्दी म्हणून विकल्या
Read Moreश्रद्धा-अंधश्रद्धा
मंदिर डोंगराएवढं उंच असलं काय किंवा गुडघ्याएवढं असलं काय, भक्ती व श्रद्धेत काहीच फरक पडत नाही. तसंच दोन मिनिटे डोळे बंद करून देवाचे नाव घेतले काय किंवा सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत नाव घेत
Read More
कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर
कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर
(‘गिरणांगण’ या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वार्षिकांकात वर्ष २००९-२०१० मध्ये प्रकाशित झालेला लेख)
मराठी साहित्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखनाने वैश्विक पातळीवर नेणाऱ्या आणि मराठीला तिसरे मानाचे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणाऱ्या विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे दि. १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. अवघ्या महाराष्ट्राने हे अटळ दुःख ‘माझ्या मन बन दगड…’ असे म्हणून सहन केले. त्यांच्या निधनाने मराठी काव्य क्षेत्रातील / साहित्यक्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला.
विंदांनी कविता, बालकविता या प्रकारांव्यतिरिक्त लघुनिबंध, समीक्षा, अनुवाद या प्रकारांतही लेखन करून मोलाची भर घातली. आपल्या ‘बहुपेडी’ व्यक्तिमत्वाने त्यांनी या साहित्यप्रकारांवर अमीट ठसा उमटविला. मात्र कवी म्हणूनच त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या आशयातील विविधता, नाविण्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा चेहरा – मोहरा बदलून टाकला. बालकवितांच्या माध्यमातून ते अवघ्या महाराष्ट्राच्या मुलांचे ‘आजोबा’ बनले. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना ‘संन्यासी कवी’, ‘ध्रुवताऱ्यासारखा अढळ प्रकाश देणारा’, ‘मराठी Read More
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यांना माझे उत्तर…
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे व त्यांच्या नावाच्या आधी कित्येक उपाध्या लावणारे व इतरांनाही
Read Moreफसवणुकीवर आधारलेला व्यवसाय
प्रश्न अनेक- उत्तर एक
१ कोणतेही कर्तृत्त्व नसताना मानसन्मान, आदर मिळवून देणारा व्यवसाय कोणता?
Read More‘डोह’ कथेचा परिचय
डोह
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
काम ही मानवी जीवनातील अतिशय प्रबळ अशी प्रेरणा आहे. तिच्यावर मानवी मनाचे नियंत्रण राहिले तर ठीक. अन्यथा तिने मानवी मन, मेंदू व शरीराचा ताबा घेतला तर ती माणसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ‘डोह’ ही कथा याच आशयसूत्रावर आधारलेली आहे.
‘डोह’ या कथेत मदारी हे एकमेव महत्त्वाचे पात्र आहे. त्याची आई, अम्मा, पुढे जिचे निधन झालेले आहे अशी एक सुंदर स्त्री या दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा असून त्या गौण आहेत. या कथेतील मदारी हा नाग व नागिणीचा खेळ दाखवून त्याचा व त्याच्या अम्माचा उदरनिर्वाह भागवतो. तो अतिशय आडदांड व राकट शरीराचा तरुण आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन हा खेळ दाखवायचा. पुंगी वाजवून तो नाग व नागिनीचे मैथुन घडवून आणायचा. लोकं व तो स्वतः ते मैथुन बघायचे. ते मैथुन बघून त्याची वासनेची अतृप्त व सूप्त भूक उफाळून यायची. परंतु तिचा निचरा करणे शक्य नसल्याने तो ती दडपून टाकायचा. नुकत्याच मैथुन क्रीडा संपवलेल्या नागाचा वास त्याच्या देहातील सुप्त वासनेवर जाऊन आदळला की, त्याच्या संवेदना सळसळू लागायच्या. नागाच्या डोळ्यात त्याला पौरुषत्व जाणवायचे.
भारतीय लोकशाहीचे भविष्य
आज SYBA च्या वर्गात फळ्यावर’ संसद, लोकसभा / राज्यसभा, विधानसभा / विधानपरिषद असे शब्द लिहिले. भारतीय संसदेत काय येतं, असे विचारले. ३०-३५ मुलांपैकी कुणालाच सांगता आलं नाही. त्यानंतर तुम्ही ज्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून देतात ते वरीलपैकी कोणत्या सभागृहात जाऊन बसतात , असे विचारले. नाही सांगता आले. नाही सांगता आले.
मागच्या वर्षी NSS मधील प्रवेशासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काेणत्याही ५
Read Moreभारतातल्या कोरोनावाढीला जबाबदार कोण होतं?
घटनाक्रमाकडे जरा लक्ष द्या-
३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.
फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखो लोकं एकत्र केले गेले.
१६ मार्चपर्यंत अख्या भारतातील शाळा, महाविद्यालये सुरू होती.
१९ मार्चला जनता कर्फ्युची घोषणा
२२ मार्चला जनता कर्फ्यूचा फार्स पार पडला.
२३ तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन सुरू होते.
२३ तारखेला मध्यप्रदेशात शपथ घेतली.
२४ तारखेला बहुमत सिद्ध केले.
महापुरुषांचे प्राक्तन!
गोपाळ गणेश आगरकर यांची त्यांच्या हयातीत प्रेतयात्रा काढली होती, म. फुलेंना मारण्यासाठी रामोशी धाडले होते, तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली होती, नंतर त्यांना सदेह वैकुंठीही पाठवले, म. गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्याच झाल्यात. आंबेडकरांचा कित्येक वेळेस अपमान झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. (अशी असंख्य उदाहरणे देता येतील). किती मन दुखवले असेल या महापुरुषांनी त्या काळातील लोकांचे! त्याशिवाय बिच्चाऱ्या लोकांनी असे केले असेल का?
Read Moreसहजीवनाची १० वर्षे
आज माझ्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. इतकी वर्षे कशी निघून गेली, फुलपाखरासारखी उडून गेली, ते कळलंही नाही. १० वर्षात खूप बदलले, माझ्या जगण्यातही खूप बदल झाले. हळूहळू प्रगतीची एक एक पायरी चढत गेलो. सुखी जीवनासाठी जे-जे हवे असते, ते सर्व मिळत गेले. यात अर्थातच माझ्या सर्व कुटुंबाची साथ मोलाची आहे.
१० वर्षांपूर्वी अतिशय गरिबीत माझ्या संसाराची सुरुवात झाली. लग्न झाले तेव्हा मी फेलोशिपवर (JRF) होतो. दीड वर्षानंतर नोकरी मिळाली. मग आम्ही जव्हारला म्हणजे नोकरीच्या ठिकाणी राहायला गेलो. नोकरी तर मिळाली परंतु एका तांत्रिक कारणामुळे पहिले पाऊणे तीन वर्षे पगार सुरू झाला नाही. नंतर मात्र सर्व सुरळीत सुरू झाले.
या सर्व संघर्षाच्या काळात गरिबीचा कोणताही अनुभव व सवय नसताना माझ्या पत्नीने- वैशूने मला मोलाची साथ दिली. म्हणून मीही मानसिकरित्या स्थिर राहू शकलो व माझ्या करियरमध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये प्रगती साधू शकलो. Read More
विद्यार्थ्यांसाठी
मला विद्यार्थीदशेत पुस्तकं वाचताना त्यातील महत्त्वाचे परिच्छेद, वाक्ये, संवाद, सुभाषिते, कवितांच्या ओळी इत्यादी लिहून ठेवण्याची सवय होती. अशा कित्येक वह्या माझ्याकडे भरून पडलेल्या आहेत. आजही ते वाचलं तरी त्यातील बरचसं मी कुठे बसून वाचलं (म्हणजे धाब्यावर, शेतात, गावाबाहेरच्या शाळेत, बसस्टँडवर, बसमध्ये, लायब्ररीत की अजून कुठे), मी कोणत्या पोझिशनमध्ये बसलेलो होतो हे सर्व आठवतं. स्वतःचे ते चित्र, image
Read More