https://m.facebook.com/story.php?story_fbid=1753475321512027&id=100005487283430 या लिंकमधील पोस्टवरील माझी प्रतिक्रिया खाली दिली आहे.
Read MoreMonth: June 2021
Ph. D. साठी दरमहा ३१०००/- फेलोशिप
https://youtu.be/jGgo1tfQOr8
ह्या लिंकवर क्लिक करून माहिती मिळवा.
ह्या फेलोशिपबद्दल पीएच.डी. करणारे विद्यार्थी किंवा तुमच्या मित्रांना माहिती द्या. या फेलोशिपमुळे त्यांचे आयुष्य बदलू शकते.
तसेच इतर विद्यार्थ्यांनीही या फेलोशिपबद्दल जाणून घ्या. भविष्यात तुम्हाला उपयुक्त ठरेल. आपण गरिबीतही आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो, हे माहिती झाल्यामुळे तुमच्या मनातील न्यूनगंड, भीती, असुरक्षितता, नैराश्य कमी होईल व तुमचा आत्मविश्वास, उत्साह वाढेल. तसेच त्यामुळे तुम्हाला आता अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल.
- डॉ. राहुल पाटील
‘बारोमास’ कादंबरीतील व्यक्तिरेखा
मराठी साहित्यात वास्तववादी अशा ग्रामीण कादंबर्यांची अतिशय दीर्घ अशी परंपरा आहे. ‘बारोमास’ ही या परंपरेतील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते.
‘बारोमास’ ही सदानंद देशमुख यांची ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण वेध घेणारी कादंबरी २००२ साली प्रकाशित झाली. या कादंबरीला २००४ साली भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.
‘बारोमास’ कादंबरीतील व्यक्तिरेखा
‘बारोमास’ या कादंबरीत एकनाथ, अलका, शेवंता माय, मधू या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. या व्यतिरिक्त नरूभाऊ, तेजराव खपके, समाधान चांदणे, एकनाथचे वडील सुभानराव इ. पात्र आहेत. या कादंबरीतील महत्त्वाच्या पात्रांविषयी माहिती पुढीलप्रमाणे-
एकनाथ-
एकनाथ ही या कादंबरीतील महत्वाची व्यक्तिरेखा आहे. त्याचे शिक्षण एम. ए., बी.एड. इतके झालेले असून त्याने अगदी गरिबीच्या परिस्थितीत ते पूर्ण केलेले आहे. विद्यार्थीदशेत त्याच्या कविता व लेख नियतकालिकांमध्ये छापून यायचे. शिकून Read More
नेट/ सेट पास झाल्यावर डोनेशन द्यावे लागते का?
खालील व्हाट्सअप चर्चा पूर्ण वाचा.
[25/06, 1:06 PM] +91 93701 57488: सर नेट पास झाल्यावर एकनाथ सारखी आम्हालाही डोनेशन द्यावे लागेल का?
[25/06, 1:07 PM] डॉ. राहुल पाटील: आधी फोकस नेट सेटवर करा. ते पास झाल्यावर बोलू. अनेक संधी असतात.
[25/06, 1:13 PM] डॉ. राहुल पाटील: एकनाथने अनेक शक्यतांचा शोध घ्यायला हवा होता. नंतर तो तसे काही शोधताना दिसत नाही.
मंडल आयोग व परिणाम
१३ ऑगस्ट १९९० – तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू करून हिंदू, मुस्लिम व इतर धर्मातील ३७४३ जातींना (भारतातील ५२℅ लोकसंख्या) ओबीसी सवर्गांतर्गत आरक्षण देऊन
विद्यार्थ्यांसाठी २४ टिप्स
ह्या सूचना मी नेट/ सेटच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेल्या आहेत. त्यांचे संकलन इथे केलेले आहे. ज्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशाच आहेत. म्हणून काळजीपूर्वक वाचा. त्यावर चिंतन, मनन करा व अंमलात आणा.
१) फार वेळ सोशल मीडियावर राहिल्यानेही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यात अडचणी येतात.
२) परीक्षेतील यशाचे पहिले सूत्र- त्या-त्या परीक्षेचा
मराठी विषयातील करियरच्या विविध संधी –
मित्रांनो, पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषय घेऊन भाषा, साहित्य यांचा अभ्यास करून लेखन, भाषण, श्रवण व इतर कौशल्ये आत्मसात करून खरे तर करियरच्या असंख्य संधी आहेत. त्यापैकी काहींची माहिती मी या ब्लॉगमधून आपल्याला देणार आहे.
१) स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विषय –
पीएसआय, एसटीआय या पदांसाठीच्या मुख्य परीक्षेत एकूण २५ टक्के अभ्यासक्रम हा मराठी व्याकरणाचा असतो. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, क्लार्क, मंत्रालय सहाय्यक या व इतर अनेक पदांसाठी जी परीक्षा होते, त्या प्रत्येक परीक्षेत मराठी विषय असतो. एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांमध्ये मराठी विषय असतो. यूपीएससीला तुम्ही मराठी विषय निवडून त्याचे २ पेपर देऊ शकतात. त्याला बीए, एमए या स्तरावरचा अभ्यास असतो. म्हणून मराठी विषय हा अतिशय उपयुक्त आहे.
२) भाषांतरकार म्हणून संधी – Read More
भगवद्गीता : थोडं चिंतन (एका पोस्टवरील प्रतिक्रिया…)
गीता ही मूळ महाभारताचा भाग नाहीये. असे अभ्यासक मानतात. ती खूप नंतर लिहून महाभारतात युद्धाच्या प्रसंगाच्या आधी जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिच्यातील तत्त्वज्ञान हे महाभारताचा जो कोणता काळ असेल, त्या काळाचे तत्त्वज्ञान नसावे. गीतेत कर्मयोग, सांख्य, ज्ञानयोग असे ज्याला जे हवे आहे असे Read More