विठ्ठलाशी संवाद -आषाढीच्या निमित्ताने…

बा विठ्ठला,
तू वेदांमध्ये नाहीस, उपनिषदांमध्ये नाहीस, रामायण महाभारतामध्ये नाहीस. तू कुठलाही पुराणांमध्ये नाहीस. पण तू इथल्या मातीत रुजलेला आहेस! इथल्या मेघांमधून वर्षत आहेस! इथल्या फुलांमध्ये तुझाच सुगंध दरवळत असतो आणि इथल्या संगीतातून, तालासुरातून, माणसांच्या मुखातून तुझेच ध्वनी बाहेर पडतात!

इथल्या मातीत जीवनरस तूच ओतलेला आहेस!
तूच इथे संतांची मांदियाळी निर्माण केलीस. त्यांची माय व बापही झालास. तुला समोर ठेवून ज्ञानोबा, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई

Read More

‘सर ए राह’ अतिशय सुंदर पाकिस्तानी स्त्रीवादी मालिका

‘सर-ए-राह’ ही एक पाकिस्तानी मालिका आहे. इतकी छान मालिका मी अलीकडच्या काळात भारतात नाही बघितली. या मालिकेचे एकूण ६ एपिसोड आहेत. पाकिस्तानमधील पुरुषप्रधान संस्कृती, मानसिकता या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या चार तरुण मुली/

Read More

मीही सुवर्णपदक परत करणार होतो!

मी बीए व एम.ए.ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (जळगाव) प्रथम आलेलो असल्याने मला दोनदा सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच मी २००७ साली एम.ए. झाल्या झाल्या नेट परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. पुढच्याच वर्षी नेट-जेआरएफ पण उत्तीर्ण झालो. तरीही मुलाखतींना जायचो तेव्हा भरमसाठ डोनेशनची मागणी व्हायची. चार-साडेचार वर्ष झाले तरी मला नोकरी मिळत नव्हती. ज्या महाविद्यालयात मराठीची एक जागा

Read More

निराश, हतबल, वृद्ध कृष्ण

यादवीनंतर निराश झालेला कृष्ण जंगलात निघून गेला व अंगठ्याला बाण लागून मरण पावला. तिथेच त्याचे पार्थिव पडून राहिले. कृष्णाच्या वंशातील स्त्रियांना अभिर वंशातील लोकं उचलून, पळवून घेऊन गेले.

त्याआधी कित्येक लढाया जिंकलेला व त्याच्या काळातील महान योद्ध्यांवर प्रभाव गाजवणारा पण आता

Read More

भारत-पाक फाळणी व सद्यपरिस्थिती

१९३७पर्यंत मोहम्मद अली जिना व इतर यांच्या अजेंड्यावर भारत-पाक फाळणी, पाकिस्ताननिर्मिती इत्यादी मुद्दे नव्हते. पण पुढील ७-८ वर्षात त्यांनी व इथल्या धर्मांध संघटनांनी एवढा धार्मिक उन्माद माजवला की दहा वर्षात देशाचे तुकडे झाले. दोन्ही-तिन्ही धर्मांची मिळून ४०-५०लाख लोकं दंगलीत मारली गेली. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. लहान मुले, म्हातारे, स्त्रिया व

Read More

गणितज्ज्ञ रामानुजन

प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रामानुजन (१८८७-१९२०) यांच्यावर धर्माचा प्रचंड पगडा होता. ते युरोपात असताना त्यांना क्षयरोग संबंधित आजार झाला. तेथील थंडीमध्ये टिकून राहण्यासाठी व बरे होण्यासाठी डॉक्टरांनी मांसाहार करायला सांगितले. त्यांनी नाही केला. शेवटी त्याच

Read More

नव मानवसमाज निर्माण होण्यासाठी उपाय

नवा मानव समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न

  • आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत.
  • होमो सेपियन्सना आपल्या बुद्धिमत्तेने धर्माची निवड करण्याचा आधिकार असायला हवा.
  • Man is a rational animal. जगातील सर्वच धर्मांनी बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या होमोसेपियन प्रजातीच्या व्यक्तींना, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्गदत्त गुणांचा उपयोग करून, उपलब्ध असलेल्या धर्मातील एका धर्माची निवड करण्याचा अधिकार नाकारला आहे.
  • होमोसेपियन व्यक्तीच्या सारासारबुद्धीची दखल घेऊन, प्रत्येक व्यक्तीला सज्ञान वयाची झाल्यावर आपल्या पसंतीचा धर्म निश्चित केल्यावरच, त्या व्यक्तीस धर्माची दीक्षा देण्याची प्रथा, खरं तर सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सुरू करायला हवी होती.
  • त्याऐवजी सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सरसकटपणे व्यक्तीच्या मातापित्याचा धर्म तोच व्यक्तीचा धर्म अशी मान्यता देऊन, तशी प्रथा व परंपरा सुरू करून, व्यक्तीच्या आपल्या इच्छेने धर्म नाकारण्याचा किंवा उपलब्ध धर्मातील एक धर्म निवडायच्या अधिकारावर गदा आणली आहे.
  • बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या मानवी व्यक्तींनी, आपल्या व इतर प्रजातींच्या भविष्यकालीन परस्पर संबंधांना मानवी रूप देण्यासाठी भूतकाळातील सर्वच धर्म व पंथ संस्थापकांकडून झालेला हा प्रमाद नाकारून, त्यात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
  • जगातील सर्वच धर्म आपसात केवळ स्पर्धाच नव्हे तर काही प्रमाणात द्वेषही करताहेत, त्यामुळे आतापर्यंत जगभरात प्रचंड हिंसाचार घडून आलेला आहे.
  • ह्यातील कुणा एका धर्मातील वा वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती एकत्र येऊन धर्मसंस्थापकांनी केलेली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करणे, अशक्यच आहे.
  • त्यामुळे मानव प्रजातीचा विकास करण्यासाठी ईश्वर ह्या संकल्पनेच्या जालात अडकलेल्या मानव प्रजातीतील व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी अनिश्वरवाद्यांना व संयुक्त राष्ट्र संघटनेलाच स्विकारावी लागणार आहे.
  • ह्यासाठी जगातील समस्त नास्तिकांनो, सुजाण नागरिकांनो, जगातील असे देश, ज्यांनी आपले राष्ट्र एका विशिष्ट धर्माचे असल्याचे नाकारले आहे, अशा रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड आणि इतर अशा सर्व देशांनी, ह्या दिशेनं वाटचाल करावी म्हणून, त्यांना योग्य लॉजिकल कृती करण्यास, पुढचे पाऊल टाकण्यास उद्युक्त करूया.
  • ह्या देशाच्या शासनसंस्था आपापल्या देशातील धर्मसंस्थांना अशा प्रकारे सज्ञान झालेल्या व्यक्तीनांच, व्यक्तींच्या इच्छेप्रमाणे, त्यांनी निवडलेल्या धर्माची दीक्षा देण्याचा विधी विकसित करावा आणि अशा विधी झालेल्या, दीक्षाप्राप्त व्यक्तीसच आपल्या धर्मामध्ये प्रवेश देण्याची प्रथा सुरू करावी व त्याप्रमाणे योग्य नियम बनवावेत म्हणूून योग्य कायदे करतील.
  • आपल्या देशाच्या नागरिकांना नागरिकत्वाचा हक्क देताना त्यांनी, एक तर स्वत़ःला अनिश्वरवादी घोषित करायला हवे किंवा सज्ञान झाल्यावर आपल्या इच्छेने निवडलेल्या धर्माचा विधीपूर्वक स्विकार करायला हवा, अशा रीतीचे कायदे सर्वच देश करतील, असे प्रयत्न करावेत.
  • त्याचबरोबर युनोच्या सभागृहातही युनोच्या सर्व सदस्य देशांनी आपापल्या देशाच्या धर्मविषयक कायद्यांत योग्य बदल करून धर्मसंस्थांना ह्या उद्देशास सहाय्यक अशा प्रकारचे नियम, विधी, माहिती विकसित करण्यास उत्तेजन द्यावे.
  • युनोचे सदस्य असलेल्या सर्वच देशांनी युनोच्या आमसभेत, मानव ही सर्व प्रजातीतील एक बुद्धिवान आणि सारासारविवेकबुद्धी असलेली प्रजाती आहे, म्हणून निसर्गाने बहाल केलेल्या, आपल्या वैशिष्ट्यांचा, आपल्या वेगळेपणाचा विकास करणे ही मानवाचीच जबाबदारी आहे, अशा आशयाच्या भूमिकेला मान्यता देऊन, मानवाच्या विकासाला मर्यादित करणाऱ्या सर्व धर्मांमध्ये योग्य बदल करून, मानवाला मानव्याच्या दिशेने प्रवास करण्यास पूरक असे नियम करण्याविषयक आवाहन करणारा एक ठराव पारित करावा.
  • भविष्यातील मानवाने एक तर त्याचा धर्म हा तो सज्ञान झाल्यावर विचारपूर्वक निवडलेला असायला हवा किंवा निधर्मी राहण्याचा, एकापेक्षा अधिक धर्मातील चांगल्या गोष्टींचे पालन करण्याचा त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार त्याला मिळायला हवा.
  • म्हणून कुणाच्याही दाखल्यावर तो सज्ञान झाल्यावर स्वतःहून कायद्याप्रमाणे कोणताही एक धर्म स्वीकारेपर्यंत कोणत्याही धर्माचा उल्लेख करता कामा नये.
  • शाळा, महाविद्यालये यात कोणत्याही धर्माचे कार्यक्रम होणार नाहीत, यासाठी नियम, कायदे बनवायला हवेत व जर असे कुठे घडत असेल तर एका तक्रारीवर चौकशी व दोषी आढळल्यास कारवाई करायला हवी.
  • धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसा, दंगे इत्यादी गोष्टींवर कठोरातली कठोर कारवाई करून वरील गोष्टींना प्रोत्साहन मिळणार नाही असे कायदे निर्माण करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी करायला हवी.
  • धर्माचा ठेका घेतलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती यांचा कायदे करून बिमोड करायला हवा.

(दीनानाथ मनोहर यांची पोस्ट काही बदलांसह…)

  • डॉ. राहुल पाटील

लोकशाहीपुढील आव्हाने

औरंगजेब याचे स्टेट्स ठेवणे चुकीचेच होते. पण असे केल्याने कुणाचाही अपमान होत नाही. मात्र इथे खालील घटना घडताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाचाही अपमान होत नाही. उदा.

● गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळीबार

Read More