धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या पाकिस्तानचे (१९४७) २५ वर्षाच्या आत (१९७१) दोन तुकडे झाले. भारत धर्मनिरपेक्ष असल्याने तसेच बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना व
नेहरूंनी १९४७ ते १९६४ या १७ वर्षात देशाची केलेली भक्कम पायाभरणी यामुळे आज ७५ वर्षे झाली तरी अखंड राहिला.
गांधीजींनी भारतातील कोट्यवधी लोकांना ३३ वर्षे विविध आंदोलनांमध्ये सामील करून घेतले, त्यांना विविध उपक्रम दिले, लोकशाहीचे धडे दिले, लोकशाहीची मूल्ये इथे रुजविली. म्हणूनदेखील आजतागायत हा देश अखंड राहिला आहे.
आज मात्र काही राजकीय पक्ष, मनुवादी नेते व संघटना विभाजनाची बीजे पेरत आहेत. त्यांना रोखावे लागेल.