पुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा
Read Moreबहुजनांच्या सण-उत्सवांचे बदलते स्वरूप-
या ऑगस्ट महिन्यातील २६ तारखेला पोळा हा सण साजरा करण्यात आला. पोळा हा ग्रामीण भागातील लोकांचा अतिशय जुना व महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या बैलांच्या सहाय्याने शेतकरी शेती कसतो, ज्यांच्या मदतीशिवाय शेतात राबणे, शेतातील सर्व कामे करणे शक्य नव्हते, हजारो वर्षे आपल्या शेकडो पिढ्या ज्याच्यामुळे जगल्या, अशा बैलांबद्दल
Read Moreपंडित जवाहरलाल नेहरूजी कितने साल जेल में रहे थे?
पंडित जवाहरलाल नेहरूजी कितने साल जेल में रहे थे?
कुल 3258 दिन ÷365=8.92 याने ९ साल
पहली बार- 6 दिसंबर, 1921 से 3 मार्च, 1922 – 87 दिन
Read Moreवर्गात नियमित न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थी मित्रांनो,
जी मुलं लेक्चरला येत नाहीयेत त्यांनी व इतरांनीही लक्षात ठेवा.
१) यावर्षी तुमची परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन होईल.
२) सर्व पेपर तुम्हाला लिहावे लागतील. ऑब्जेक्टिव्ह
नवीन शैक्षणिक धोरण
माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-
भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला
गेल्या २०० वर्षातील भारतीय समाजाची वाटचाल व मानसिकता
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते.
आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.
● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण
‘रोजगारी’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)
‘रोजगारी’ ही कथा गावगाड्यातील एका शेतमजूर कुटुंबातील एक १४ वर्षाचा मुलगा आपल्या आई व वडिलांप्रमाणे शेतमजुरी न करता व्यवसायाला सुरुवात करतो आणि आत्मविश्वास व स्वाभिमानाने जगायला लागतो, या विषयावर आधारलेली आहे.
मारत्या ही या कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तो १४ वर्षाचा आहे. त्याची आई पाटलाकडे शेतमजुरी करायला जाते व त्यावर तिचा व मारत्याचा उदरनिर्वाह भागवते. तिची अशी इच्छा असते की, मुलाने सुद्धा आता आपल्यासोबत पाटलाकडे Read More
‘ससा आणि सर्कस’(SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)
‘ससा आणि सर्कस’ ही कथा बाब्या नावाच्या एका पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या जीवनावर आधारलेली आहे. बाब्या पाच-सहा वर्षाचा असूनही त्याला ‘मा’ आणि ‘बा’ या दोन शब्दांशिवाय काहीच बोलता येत नाही. त्याच्या वेळेस त्याची आई गरोदर असताना तिच्याकडून काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी खाल्ली गेली होती. त्यामुळे बाब्या मंदबुद्धी म्हणून जन्माला आला. मोठा होऊनही त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला नाही.
बाब्यासोबत नेहमी एक ससा राहायचा. तो कुठेही गेला तरी सशाची साथ सोडायचा नाही. हा ससा त्याला एका वर्षापूर्वी Read More
‘मोर्चा’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)
‘मोर्चा’ ही कथा शिवराम व त्याची आठ वर्षाची मुलगी सुशी यांच्यातील प्रेमळ नाते व सुशी मोर्च्यात हरवल्यामुळे कथेच्या शेवटी त्यांची झालेली ताटातूट, त्यामुळे शिवरामची झालेली सैरभैर अवस्था यावर आधारलेली आहे.
शिवरामची बायको त्याच्यासोबत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष नांदते. त्या दरम्यान त्यांना एक मुलगी होते. ती म्हणजे सुशी. सुशी एक वर्षाची असताना शिवरामची बायको एका ठेकेदारासोबत पळून जाते, त्याच्यापासून तिला पुढे तीन अपत्ये होतात, असे Read More
‘घोर’- (दाही दिशा) रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कथा)
‘घोर’ ही कथा एका खेड्यातील आबा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकर्याला त्याच्या मुलीच्या लग्नाची लागून राहिलेली काळजी (घोर) आणि त्याने त्यातून काढलेला मार्ग या विषयावर आधारलेली आहे.
आबा हा ‘घोर’ या कथेतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला एक मुलगी आहे. या मुलीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी पैसे हवेत म्हणून त्याने आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवून एक शेत विकत घेतलेले असते. हे शेत विकून तो हुंड्याचे Read More
बहुजन समाजाचा निर्बुद्धपणा
बहुजन समाजातील काही बधिरांना ज्यांनी आपल्याला हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त करून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली असे आपले महापुरुष फक्त तोंडी लावायला हवे असतात. या महापुरुषांचे विचार, कार्य समजून घेण्यासाठी Read More
जपान व आपण
जपानने एका पिढीत संपूर्ण देशात परिवर्तन घडवून आणले होते. म्हणून जपान गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. आपल्याकडे २-३ पिढ्या उलटून
सनातन्यांची कारस्थाने
नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या
हिंदू धर्म: विचार करण्याजोगे काही प्रश्न
विचार करण्याजाेगे प्रश्न
१) हिंदू धर्म भारत व नेपाळ या मोजक्या देशांबाहेर का वाढू शकला नाही?
२) हिंदू धर्मातून जैन, बौद्ध, शिख, लिंगायत हे धर्म
माझ्या हळदीचा कार्यक्रम
२०१० साली माझे लग्न झाले. हळदीच्या वेळेस मी व माझ्या घरच्यांनी भटजींना बोलावले नव्हते. तरी ते आले व न सांगता हळदीची तयारी करू लागले. आम्ही त्यांना सांगितलं की, “आम्ही दुसऱ्या
माझ्या महाविद्यालयाचा मराठी विभागाचा अहवाल (२०२१-२२)
मराठी विभाग अहवाल २०२१-२२
महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरुवात १४/०६/२०२१ रोजी झाली. पहिल्या आठवड्यापासूनच महाविद्यालयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे सुरू झाल्या.
निकाल
| एकूण परीक्षार्थी | २९ |
| उत्तीर्ण | २४ |
| अनुत्तीर्ण | ०५ |
| निकालाची टक्केवारी | ८२.७५% |
|
श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या |
|
| ओ श्रेणी |
०१ |
| ए + श्रेणी | ०६ |
| ए श्रेणी | ०८ |
| ब+ श्रेणी | ०३ |
| ब श्रेणी | ०४ |
| कश्रेणी | ०० |
| ड श्रेणी | ०२ |
गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी
| अ. क्र. | नाव | गुण |
| १ | कांचन परशुराम महाले |
५५७+५०६=१०६३ |
| २ | निवृत्ती वळे | ४८५+४६८=९६३ |
| ३ | दिलीप थेतले | ४२९+४७५=९०४ |
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व चांगल्या निकालासाठी मराठी विभागातील प्राध्यापक नेहमीच प्रयत्नशील असतात. या वर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने टाळेबंदी घोषित केल्याने महाविद्यालय नियमित सुरू होऊ शकले नाही. म्हणून या वर्षीदेखील Read More
ज्ञानाधिष्ठित समाजाची वाटचाल
शांतपणे वाचा।
समजून घ्या।
पटल्यास शेयर करा।
★ वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत हे सर्व संस्कृत भाषेत आहेत.
★ परंपरेने भारतातील बहुजनांना वाचन- लेखनाचा अर्थात शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.
★ त्यात संस्कृत भाषा ही पुन्हा ‘देववाणी’. म्हणजे
‘वाफ’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकातील कथा)
ग्रामीण भागात बर्याचदा माणसांतील नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे एकमेकांमध्ये चढाओढ, स्पर्धा, एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती असते. यातून मग संघर्ष निर्माण होतो. ‘वाफ’ ही कथा गावातील संघर्ष, मारामारी, खून यावर आधारलेली आहे.
‘वाफ’ कथेची सुरुवात वामन पैलवानाचा मृत्यू व त्याची बातमी गावभर पसरल्यानंतर गावात जी खळबळ माजते, त्यापासून होते. वामन पैलवान हा एकाच वेळी दहा माणसांना पुरून उरला असता, अशा ताकदीचा गडी होता. तो अविवाहित होता. त्याची भाऊरावशी मैत्री होती. तो अनेकदा दिवसा व रात्रीसुद्धा भाऊरावकडेच राहायचा. त्यांचे जेवणही बऱ्याचदा त्याच्याकडेच असायचे. भाऊरावच्या बायकोने त्याला धर्माचा भाऊ मानलेले होते. भाऊरावचा देखील त्याच्यावर खूप विश्वास होता. म्हणून भाऊराव घरी Read More
‘सांड’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकातील कथा)
कथानक –
‘सांड’ ही ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय केंद्रस्थानी असतो आणि शेतीसाठी गाय, बैल यांची खूप आवश्यकता असते. सांड म्हणजे गायीचा गोर्हा. देवाच्या किंवा धर्माच्या नावाने मोकळा सोडलेला बैल किंवा गायींना गाभण करण्यासाठी एखादागोर्हा शेतकामासाठी वापरला न जाता, त्याला न ठेचता तसेच ठेवले जाते, त्यांला ‘सांड’ असे म्हणतात. त्यांच्यापासून शेतकर्यांच्या घरी गायींपासून नवीन वासरू व गोर्हे जन्माला येणारे असतात. ते ताकदीचे Read More
मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢
मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢
या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ६ तारखेला माझे आजोबा (आईचे वडील) वारले. आज माझी आजी (आईची आई) त्यांच्या पाठोपाठ गेली. साधारणतः ८६ वय होते. माझ्या आजीचे संपूर्ण आयुष्य हे गरिबी, कर्जबाजारीपणात व
धर्म (कथा)- रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट)
ग्रामीण भागामध्ये राजकीय पक्ष, विविध देवदेवतांचे भक्त यामुळे गटतट निर्माण झालेले असतात. यांच्यात अनेकदा संघर्ष, मारामार्या, वादविवाद निर्माण होतात. त्याचा फटका गावातील इतर सामान्य लोकांनाही बसत असतो. ‘धर्म’ ही कथा एका गावातील दोन गटांमध्ये धार्मिक वादातून जो संघर्ष निर्माण होतो व त्यात तुकाराम लोहार नावाच्या व्यक्तीची लहान मुलगी बळी Read More
खरा आत्मनिर्भर कोण आहे?
जो देवाधर्माच्या पलीकडे गेलेला असतो, तोच खऱ्या अर्थाने ‘आत्म’निर्भर असतो.
कारण तो
१) त्याच्या आयुष्यातील लहान-मोठ्या समस्या, प्रश्न,
बहुजनांचे व भारताचे खरे कल्याण केव्हा होईल?
प्रिय बंधू-भगिनींनो,
हिंदू धर्मातील शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, स्त्रिया अशा जवळपास ८५-९०% घटकांच्या गेल्या २००० वर्षातील आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा, संपत्ती संचय करण्याचा, राज्य मिळवण्याचा अधिकार मुस्लिमांनी नाकारलेला
एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?
एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?
तुम्ही ‘काकस्पर्श’ हा चित्रपट पाहिलेला आहे का? एका बालविधवेचे दुःख, वेदना या चित्रपटामधून मांडलेल्या आहेत. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित
नेट/ नेट-जेआरएफ उत्तीर्ण विद्यार्थी
मी सुरू केलेल्या ग्रुपमधील (मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा, नेट/सेट)/ माझ्या संपर्कातील खालील विद्यार्थी १९/०२/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. ४ जण JRFसह
गं. बा. सरदार – परिचय
गंगाधर बाळकृष्ण सरदार (०२ ऑक्टो. १९०८ – ०१ डिसें.१९८८)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व विचारवंत म्हणून सर्वपरिचित. शिक्षण- एम.ए., पीएच.डी. (मराठी). जन्म व प्राथमिक शिक्षण जव्हार, जि. पालघर. स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व तुरुंगवास. एसएनडीटी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्य. १९८० सालच्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
गं. बा. सरदार यांनी लिहिलेले ग्रंथ :
- अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका (१९३७)
- जोतीराव फुले (१९४४)
- संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती (१९५०)
माझ्या आजोबांचे निधन
आज माझे आजोबा (आईचे वडील) आम्हाला सोडून गेले. अनंतात विलीन झाले. ९० वर्षांचे होते. त्यांना सर्वजण ‘जिभाऊ’ म्हणायचे. ते महानुभाव संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांच्यासोबत गोष्टींचा खूप मोठा खजिना गेला. एकच गोष्टीचा मी व्हिडीओ बनवून ठेवू शकलो होतो.
१५-१६ वर्षांपूर्वी एकदा मी व माझे आजोबा सुरतहून अमळनेरला रात्रीच्या रेल्वेने येत होतो. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होती. आम्ही दरवाज्याच्या बाजूला उठबस करत रात्रभर प्रवास केला. झोपणे शक्य नव्हते. माझ्या आजोबांनी रात्रभर गोष्टी सांगून लोकांचे Read More
सेट उत्तीर्ण विद्यार्थी
मी सुरू केलेल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट/ सेट)’ या ग्रुपमध्ये असलेल्या व सराव परीक्षा देणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी/ विद्यार्थिनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. (अजून काही जणांनी निकाल बघितलेला नाही. संख्या वाढू शकते.)
आपल्या ग्रुपमधील आतापर्यंत १९ जण सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निरोप आलेला आहे. अजून या ग्रुपमधील कुणी निकाल बघितला नसेल तर बघावा व तसे कळवावे.
१) प्रमोदिनी देशमुख (मुंबई)
२) तनुजा ढेरे (मुंबई)
३) गितल बच्छाव (सटाणा)
४) राजेंद्र घाटाळ (जव्हार)
सूत्रसंचालन (एक नमुना)
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०१८-१९
सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम!
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. आजच्या या समारंभात गेल्या वर्षभरात
माणसंच जेव्हा……
जेव्हा उगारतो आम्ही
आमच्याच माणसांवर हत्यार Read More
आनंदाचे डोही, आनंद तरंग – बुद्धविचारांच्या संग
माझे एक वैशिष्ट्य राहिलेले आहे की, मला एखाद्या गोष्टीचा जेवढा त्रास होतो किंवा कुणीतरी मला त्रास देतं, माझे जेव्हा काहीतरी नुकसान होते, माझ्यासाठी परिस्थिती प्रतिकूल बनत जाते तेव्हा मला त्या गोष्टींचा उलट खूप फायदा होतो. कारण त्या गोष्टींनी
गुंता (कविता)
गुंता (कविता)
कितीही टाळा
विचार येतातच डोक्यात
सतत एक रंधा फिरत असतो
डोकं दुखू लागतं
एक विचार काढण्यासाठी Read More
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार कसा थांबणार?
छत्तीसगड व इतर काही राज्यांमध्ये त्या त्या राज्याच्या लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक प्राध्यापकांची सर्वच्या सर्व पदे भरली जातात. म्हणून तिथे
हर शख्स (गजल)
घुटनभरी जिंदगी जी रहा है हर शख्स
अजब सी कश्मकश में, उलझा है हर शख्स।
बातें तो करनी है जी भर के किसी से
विद्यार्थ्यांच्या हिताचे दोन शब्द
विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला शिकवणे, एखादा मुद्दा, घटक, संकल्पना समजत नसेल तर समजावून सांगणे, गृहपाठ देणे,
नरेंद मोदी व मी…
नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी तसा फार प्रयत्नही केला नाही. कारण
Read Moreआमचा राम, त्यांचा श्रीराम
आमचा राम राम।
त्यांचा जय श्रीराम।।
आमची लोकशाही।
नवीन शैक्षणिक धोरण घातक आहे
(२६ जुलै, २०१९ रोजी लिहिले आहे.)
माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-
भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर
Read Moreदलित साहित्य : संकल्पना व स्वरूप
दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप
दलित साहित्याच्या निर्मितीच्या मुळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार व तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध लढे दिले, ज्यात महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, धर्मांतराची घोषणा व प्रत्यक्ष धर्मांतर, ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’मधील लिखाण, राज्यघटनेचे लेखन, गोलमेज परिषदेतील सहभाग व राखीव जागांची तरतूद यामुळे दलित समाजामध्ये आत्मभान, नवचैतन्य, लढवय्येपणा निर्माण झाला. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा बदलल्या. ते आपल्या
हक्कांप्रती जागृत झाले. आपल्यावर हजारो वर्ष होत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली. या अन्यायाविरुद्ध स्वाभाविक चीड, संताप त्यांच्यात निर्माण होऊ लागला. आधी तो व्यक्त करणे शक्य नव्हते, आता ते प्रत्यक्ष जगण्यातून व साहित्याच्या माध्यमातून ते व्यक्त करू लागले. म्हणून दलित साहित्यात आपल्याला चीड, संताप, विद्रोह, नकार, वेदना, इ. गोष्टी दिसून येतात. दुसर्या कोणत्याही साहित्यप्रवाहात आपल्याला या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत.
समकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना
समकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना
समकालीन हा कालवाचक शब्द आहे. ‘सम’ म्हणजे समान, समांतर, सोबत. जे साहित्य आपल्या काळाबरोबर, काळासोबत असते, त्या काळाच्या समांतर असते. ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळातील समाजाचे
मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य
मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य
मराठीमध्ये स्त्रियांनी तसे विपुल प्रमाणात साहित्यलेखन केलेले असले तरी ते सर्व स्त्रीवादी साहित्यात मोडत नाही. त्यापैकी बरेचसे साहित्य हे पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांवर देखील प्रभाव असल्यामुळे किंवा त्यांची एकूणच जडणघडण पुरुषप्रधान संस्कृतीतच झालेली असल्यामुळे पती किंवा प्रियकराविषयी प्रेम, पुरुषशरणता, स्वत:कडे
स्त्रीवाद, स्त्रीवादी साहित्य : संकल्पना
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क
मानवाची आधुनिक काळातील वाटचाल
मानवाचा आधुनिक काळापासूनचा सुधारणेचा इतिहास हा धर्मसत्तेविरूद्धच्या संघर्षाचा व धर्मसुधारणेचा इतिहास आहे. युरोपात या प्रक्रियेला चौदाव्या – पंधराव्या शतकापासून तर आपल्याकडे
Read More