१३ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. साडेतीन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आमच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलो. पण दोन्ही वेळेस मी सत्यनारायण घातला नाही. भविष्यातही घालणार नाही.
१८५०पूर्वी भारतात सत्यनारायण घातल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. शिवाजी महाराजांनी
विद्यार्थिधर्म म्हणजे काय?
मित्रांनो,
मी बीए (विद्यापीठात प्रथम क्रमांक- सुवर्णपदक), एम.ए. (विद्यापीठात प्रथम क्रमांक-सुवर्णपदक), नेट, नेट-जेआरएफ, पीएचडी, योग्य मार्गाने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणे, NSS-District level best programme officer award (पालघर जिल्हा), दोन पुस्तकांचे संपादन, प्रसिद्ध ब्लॉगर, युट्युबर हे सर्व यश ग्रामीण भागात शिक्षण व आदिवासी भागात नोकरी करत
Read Moreशिक्षणातून माझी झालेली वैचारिक जडणघडण
माझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या
Read Moreमनुवाद्यांची बंदी संस्कृती
खरे संत समाजाला एकत्र आणणात. मनुवाद्यांची पिलावळ समाजाची गटातटांमध्ये विभागणी करतात.
रोटीबंदी,
बेटीबंदी,
शिक्षणबंदी,
चित्रपट, मालिका व प्रतिक्रांती
ऐतिहासिक मालिका अथवा चित्रपटांमधील डायलॉगबाजी, नजरांचे, चेहऱ्याचे हावभाव, ती नकली जाणवणारी वेशभूषा, धार्मिक विद्वेषाची फोडणी, ऐतिहासिक घटनांची सोयीनुसार मोडतोड, भडक असे पार्श्वसंगीत, एकूणच सर्वच पातळ्यांवरील भडकपणा या सर्व गोष्टी अतिशय किळसवाण्या वाटतात. ज्यांचा थोडाफार अभ्यास
Read Moreकर्नाटकमधील काँग्रेसचे यश – मनोगत
मंदिर निर्माण करून, हिंदू मुस्लिम द्वेष वाढवून, पत्रकार परिषदांना सामोरे न जाता ‘मंकी बात’मध्ये गोड-गोड बोलून बेरोजगारी, शेतमालाला भाव न देणे, खाजगीकरण, आरक्षण, सरकारी नोकऱ्या संपवणे, राज्यघटनेच्या विरुद्ध वागणे या गोष्टी
Read Moreअवांतर वाचन : संकल्पना, स्वरूप व फायदे
मित्रांनो,
अवांतर वाचन करावे म्हणजे नेमके काय करावे, कसे करावे, काय वाचावे, केव्हा वाचावे, त्याचे फायदे काय आहेत, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. तेव्हा हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
अवांतर वाचन म्हणजे विद्यार्थी म्हणून आपल्या त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, तर गृहस्थ म्हणून आपल्या दैनंदिन नोकरी-व्यवसायाच्या कामाव्यतिरिक्त वर्तमानपत्र, त्यातील महत्त्वाच्या
लव जिहाद व महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण
लव जिहादमध्ये अडकणाऱ्या (?) हिंदू मुलींसाठी आवाज उठवणाऱ्या, तो पिक्चर चालावा म्हणून डांग आपटणाऱ्या उपटसुंभांना साक्षी मलिक, विनेश फोगट व
Read Moreसंत, समाजसुधारक व बाबा, बुवा यांच्यातील फरक
महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक यांची जागा आजचे कोणतेही बाबा, बुवा व तथाकथित गुरू घेऊ शकणार नाहीत.
संत व समाजसुधारकांनी कर्मकांडांना विरोध केला. तर हे
Read Moreबहुजन समाजापुढील धोके व उपाय
(गावाकडे आलो आहे. लोकांवर माझ्या लहानपणी नव्हता इतका देवाधर्माचा, बाबाबुवांचा प्रभाव पडलेला दिसतो आहे. धर्मांध राजकारणी त्यांच्या या श्रद्धेचा निवडणुका जिंकण्यासाठी उपयोग करून घेत आहेत व त्यांचेच शोषण करत आहेत. म्हणून लिहावेसे वाटले. वाचा.)
लाखो लोकांनी बलिदान दिले, हजारो समाजसुधारकांनी आयुष्यभर प्रबोधनपर कार्य व लेखन केले, लढे दिले तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य व लोकशाही मिळाली. माणूस म्हणून आपल्याला
Read More‘प्रतिपश्चंद्र’ कादंबरीमध्ये चित्रित शिवाजी महाराजांचे चरित्र
‘प्रतिपश्चंद्र’ ही डॉ. प्रकाश सुर्यकांत कोयाडे यांची कादंबरी आहे. ही त्यांची पहिली कादंबरी असून या कादंबरीची पहिली आवृत्ती १ एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झाली. गेल्या तीन वर्षात या कादंबरीच्या दहा आवृत्त्या संपलेल्या असून आता अकरावी आवृत्ती सुरू आहे. ‘प्रतिपश्चंद्र’ या शीर्षकावरूनच ही कादंबरी शिवाजी महाराजांशी संबंधित असल्याचे लक्षात येते. ही एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी असून या कादंबरीत तेरावे, सतरावे व एकविसावे शतक अशा ८०० वर्षातील कालखंडाची सांगड घालून लेखकाने कथानक रचलेले
Read Moreउन्हाळ्याच्या सुट्ट्या- विद्यार्थ्यांसाठी हिताचे दोन शब्द
मित्रांनो,
आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. जवळपास दीड महिना महाविद्यालये, तासिका बंद राहतील. असे असले तरी या सर्व सुट्ट्या अशाच इकडे तिकडे भटकण्यात वाया घालवू नका. टाईमपास करू नका. हीच सवय लागेल. सवयी
Read Moreदेवाधर्माच्या व्यसनाचे दुष्परिणाम
देवाधर्मापेक्षा दारूचे व्यसन परवडले. व्यसनी ‘वाईट आहे पण सुटत नाही’ किमान असे तरी म्हणतो. ते सोडण्याची प्रतिज्ञा करतो, शपथा घेतो. सुटत नाही तो भाग वेगळा. आपल्या मुलांना हे व्यसन लागू नये,
Read Moreसंत, समाजसुधारक व बाबा-बुवा
दुष्काळात आपल्या सावकारी वह्या इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त करणारे संत तुकाराम कुठे व आता आपल्या अनुयायांच्या/ अंधभक्तांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन बंगले, गाड्या, पेट्रोलपंप,
Read Moreमुलाखत लेखन – श्री. रवी बुधर यांची यांची मुलाखत (विषय : आदिवासी समाज, संस्कृती : परिचय’)
मित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.
रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.
महात्मा फुले जयंती- माझे विचार
आज महात्मा फुले यांची जयंती आहे. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन!
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज, सार्वजनिक सत्यधर्म, शिवजयंती, सत्यशोधकी मंगलाष्टके या माध्यमातून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला, धर्मग्रंथांना
Read Moreदेवी (ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)
‘देवी’ हा ‘चर्चबेल’मधील चौथा लेख आहे. या लेखात देवी, देवींचे पती नारायणस्वामी, दीर दीनबंधू ह्या तीन व्यक्तिरेखा आहेत. देवींचे पती नारायणस्वामी यांचा गंगा नदीच्या काठावर वाडा असून ते गंगा नदीचे निस्सीम भक्त आहेत. “ते गंगाभक्त होते. गंगेशिवाय त्यांना वेगळे आयुष्यच नव्हते. गंगास्तोत्राचे अहोरात्र पठण आणि गंगोदकाचे (गंगेच्या पाण्याचे) सिंचन याच स्वामींच्या आयुष्याच्या प्रबळ प्रेरणा होत्या”, असे त्यांचे वर्णन लेखकाने केलेले आहे. ते दररोज संध्याकाळी पोथी वाचायचे. त्यांच्या Read More
सावरकरांबद्दलचा माझ्या मनातील आदर कमी का झाला?
सावरकरांबद्दल मलासुद्धा खूप आदर होता. पण तोपर्यंत त्यांच्याबद्दलची कागदपत्रे समोर आलेली नव्हती. निरंजन टकले यांनी २२००० कागदपत्रांचा अभ्यास करून पूर्ण खात्रीशीर पुराव्यांनिशी जी
कंदील (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील एक लेख)
‘कंदील’ हा कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललित गद्य संग्रहातील एक लेख आहे. या लेखामध्ये मनी सुखिया व राजम्मा या दोन व्यक्तिरेखा आहेत. मनी सुखिया हे नाव ग्रेस यांना आवडलेले होते. हे नाव ऐकून ‘ज्ञानेश्वरी’च्या पसायदानातील अर्थ त्यांना जाणवला. मनी सुखिया ही दहा-बारा वर्षांची लहान मुलगी होती. ती अतिशय बारीक होती. ‘वठलेल्या
नूरजहान आणि रिल्के (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)
नूरजहान आणि रिल्के हे ग्रेस यांचे अतिशय आवडते कलावंत होते. नूरजहान ही गायिका व अभिनेत्री होती. तर रिल्के हा कवी होता. या दोघांनी लेखकाला अक्षरशः झपाटून टाकलेले आहे, असे आपल्याला त्यांच्या या लेखातील वर्णनावरून दिसून येते.
नूरजहान ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील व स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेली गायिका. तिने किमान एक हजार गाणी गायलेली आहेत. तिने ‘मिर्झासाहिबा’ व इतर चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केलेला आहे. लेखकाने तिला पहिल्यांदा Read More
पल्लवीचे पक्षी – कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख
ग्रेस हे कोणत्याही लेखात एखादी व्यक्ती, प्रसंग, घटना याबद्दल सविस्तर, सलग असे काहीच सांगत नाहीत. त्या व्यक्ती, घटना, प्रसंग याबद्दल थोडे सांगून त्याचा संबंध, धागा निसर्ग, ख्रिस्त, समुद्र अशा विविध गोष्टींशी जोडून कधीकधी असंबद्ध वाटावे, असे व्यक्त होतात. एखादे गूढ असे काहीतरी अनुभव मांडतात. त्या व्यक्ती, घटनेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला त्यांच्या लेखनामधून मिळत नाही. काळाचे अंतर पटकन कापून ते त्या-त्या व्यक्तीच्या खूप आधीच्या आठवणी, मधल्या काळातील काही Read More
मनुवाद्यांचा लोकशाहीला धोका
वाचा, समजून घ्या, निर्णय घ्या, त्यावर ठाम रहा.
अन्यथा भावी पिढ्या गुलामीत खितपत पडतील.
भारतावर
● इंग्रजांची सत्ता – १५० वर्षे,
● मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता – ५००-६०० वर्षे,
● मनुवाद्यांची सत्ता किमान ३००० वर्षे
अस्तित्वात होती.
लक्षात घ्या-
सगळ्यात घातक सत्ता मनुवाद्यांची असते. कारण यात
भाजप व मोदी यांच्याकडून माझा भ्रमनिरास का झाला?
नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी
आपणच आपल्या मुलांचे नुकसान कसे करतो?
वयाच्या १६व्या वर्षांपर्यंत मुलांची जी जडणघडण होते, ती त्याला आयुष्यभर पुरते. याच वयात शहरी मध्यमवर्गीय, स्वतःला सुशिक्षित म्हणविणारे लोकं मुलांना घडवण्यासाठी महागड्या शाळांमध्ये टाकतात. त्यांना शिकवण्या लावतात. त्यांच्यासाठी
Read Moreसत्यनारायण विधी करणे गरजेचे आहे का?
प्रिय मित्रांनो,
शिवाजी महाराजांनी बांधलेल्या व डागडुजी केलेल्या १६० किल्ल्यांचा तसेच एकूण ३७०च्या आसपास किल्ल्यांचा उल्लेख आढळतो. पण त्यांच्यामध्ये प्रवेश करताना एकदाही सत्यनारायण केल्याचा उल्लेख आढळत नाही.
शिवाजी महाराजांचे एकूण ८ विवाह झालेले होते. त्यांच्या
नवीन देवदेवता व श्रद्धांची निर्मिती व त्याचे दुष्परिणाम
प्रिय बहुजन बंधू- भगिनींनो,
परंपरांच्या नावाखाली तुम्ही सत्यनारायण वगैरे जरूर घाला. पण आज सुरू असलेल्या सण-उत्सवांची, विधींची व तुमच्या देव्हाऱ्यातील देवांची यादी करून ठेवा. कारण याच धर्माच्या व परंपरेच्या नावाखाली पुढील ५० वर्षात
खाजगीकरण – सरकारी तिजोरीवर दरोडा
● खाजगीकरण जर इतके फायद्याचे आहे. तर मागील ८ वर्षात मोजक्या खाजगी कंपन्यांचे १० लाख कोटी रुपये कर्ज माफ का करावे लागले?
● हे पैसे सर्वसामान्य माणसाने भरलेल्या टॅक्समधून जमा झाले होते ना? मग ते असे उधळण्याचा अधिकार
काश्मिरी पंडितांची समस्या – कारणे
- वास्तविक जेव्हा काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले, तेव्हा त्या राज्यात जगमोहन हे भाजपचे राज्यपाल होते. (त्यानंतर त्यांना अनेकदा मंत्रिपद देण्यात आले.)
- त्या राज्यात राष्ट्रपती राजवट होती.
- केंद्रात भाजप समर्थक व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते.
- अडवाणी रथयात्रेत व्यस्त होते.
- तेव्हाही यांनी काश्मीरी पंडितांना मदत, उपाययोजना केली नाही.
- त्यानंतर ६ वर्ष वाजपेयी व आता ८ वर्ष मोदींची सत्ता (एकूण १४ वर्षे) असूनही एकही पंडित कुटुंबीयांना पुन्हा त्यांच्या मूळ गावी नेले गेले नाही.
- ‘काश्मीर फाईल’ चित्रपट टॅक्स फ्री करून मात्र दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्याचा २०२४च्या निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी उपयोग करून घेत आहेत.
- म्हणजे काश्मिरी पंडितांना तेथून बाहेर काढणारेही तेच.
- त्यांना मदत न करणारेही तेच.
- त्यांचे पुनर्वसन न करणारेही तेच.
- चित्रपट बघायचे आवाहन करणारेही तेच.
- त्यासाठी प्रधानमंत्री, गृहमंत्री पदाच्या प्रतिमेचा वापर करणारेही तेच.
- चित्रपट टॅक्स फ्री करणारेही तेच.
- याचा राजकीय फायदा करून घेणारेही तेच.
भविष्यात भारतीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी इतके कट कारस्थानी, निर्लज्ज, क्रूर, नीच व पाताळयंत्री बनावे लागेल! (खरं तर असे कुणीही करू नये.)
भारतीयांनो, नव्या भारतात तुमचे स्वागत आहे!💐💐
१८/०३/२०२२
(हे सत्य असेल तर लोकांपर्यंत पोहचू द्या. शेयर करा.)
डॉ. राहुल पाटील
खाजगी कंपन्यांचा फायदा, सर्वसामान्यांचे भविष्य धोक्यात
● जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन सुरू – भारतातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा नवीन पेन्शनचा लाखो कोटी रुपये पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. – खाजगी कंपन्यांचा फायदा.
● खाजगी कंपन्यांचे लाखो कोटी रुपये कर्ज बुडीत खात्यात टाकले – खाजगी कंपन्यांचा फायदा.
हा संप म्हणजे सामाजिक न्यायाचा लढा आहे!
शेतकरी, कामगार, एसटी, एससी, ओबीसी, एनटी तसेच सर्व घटकांतील सुजाण नागरिकांनो,
● सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन देणे आजही सुरू आहे व २०३०-३२ पर्यंत चालूच राहणार आहे.
● तरीही सर्व भारतात मोफत रेशन सुरू आहे. इतर वेळेस
जुनी पेन्शन योजना का आवश्यक आहे?
सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी जो संप सुरू केलेला आहे, त्याबद्दल वेगवेगळी मते मांडणाऱ्या बंधू-भगिनींनो,
सरकारी कर्मचारी हे काही आपण परदेशांतून आयात केलेले नाहीत. ते आपल्याच देशातील लोकं आहेत. शिक्षणाचा प्रचार प्रसार खेड्यापाड्यांमध्ये झाल्यानंतर
बहुजनांनो, वैचारिक बैठक ठरवा व ती पक्की करा.
एससी,
एसटी,
ओबीसी,
एनटी,
ओबीसी,
मराठा व इतर बहुजन जाती व
संवर्गातील शिक्षित/ उच्चशिक्षित खाजगी/ सरकारी नोकरदार, वेगवेगळे व्यावसायिक बंधूंनो,
नोकरीसाठीची मुलाखत – काही सूचना (माझे अनुभव)
मी आज ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदासाठीच्या मुलाखतीमध्ये मला ‘साधना’ नियतकालिक कोणी सुरू केले होते? सध्या ‘साधना’चे संपादक कोण आहेत?, असे प्रश्न विचारले होते. अनेक प्रश्नांसोबत मी या प्रश्नांची देखील बरोबर उत्तरे दिली होती. “तुम्ही हे नियतकालिक वाचता का? वाचलेले आहे
Read Moreहोळी, धुलिवंदन, रंगपंचमी- आनंददायी शुभेच्छा
सण आनंदाने, उत्साहाने साजरे करायचे असतात. होळीच्या अग्नीत निराशा, दारिद्र्य, आळस व दुष्ट गोष्टींचे दहन होते, असे म्हणतात. पण
होळीच्या अग्नीत फक्त शेकडो टन लाकडे, गोवऱ्या, पोळ्या, काही ठिकाणी कोंबडीची छोटी पिल्ले निष्कारण
कोरोना व आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्था
कोरोना काळात आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्था पूर्णतः ठप्प झालेली होती. जवळपास सर्व विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले दिसून आले. ऑनलाईन शिक्षण घेणे हे आदिवासी भागातील
बहुजनांची विनाशकाले विपरीत बुद्धी!
तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, पण जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंतच तुम्हाला माणूस म्हणून अधिकार मिळतील. कोणत्याही धर्मावर आधारित समाज निर्माण केला म्हणजे तुमचे माणूस म्हणून
Read More‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख
‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ या लेखात पी. जी. चंद्रम नावाच्या एका उच्चशिक्षित, उच्च पदावरील नोकरदार व्यक्तीच्या विक्षिप्तपणामुळे त्याच्या दोन मुली व पत्नीचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झालेले आहे, याचे चित्रण ग्रेस यांनी केलेले आहे. पी. जी. चंद्रम हा एका सरकारी कार्यालयात मोठा ऑफिसर असतो. मद्रासहून बदली होऊन तो लेखकाच्या शहरात नोकरीच्या निमित्ताने आलेला असतो व लेखकाच्या चाळीत भाड्याने राहत असतो. त्याला सात-आठ वर्षांच्या दोन जुळ्या मुली असतात. सुभद्रा व
शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न, समस्या कशा संपतील?
कापसाला भाव नसल्याने फेब्रुवारी महिना संपला तरी ७५% शेतकऱ्यांचा कापूस घरातच दाबून पडलेला आहे. घरात पिसवे, चिलटे, किडे झाल्याने ते चावत आहेत. त्वचारोग होत आहेत. घरात बसायला जागा नाहीये.
कापूस हे नगदी पीक आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे ते वर्षभराचे एकमेव उत्पन्न असते. आता पुढील एक महिन्यात गुढीपाडव्यापासून नवीन कृषिवर्ष सुरू होईल. तरीही शेतकरी आंदोलन करत नाहीयेत.
गेल्या २५ वर्षात ५-६ लाख शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, उपासमार, अपमान, अपराधीपणाची जाणीव इ. गोष्टींना कंटाळून Read More
‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख
‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ हा ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील पहिला लेख आहे. नेपाली नावाच्या एका सात वर्षांच्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूवर आधारलेला हा ललित लेख आहे. ही तिची शोकांत कथा आहे. नेपाली ही एक अनाथ मुलगी होती. ती फादर ग्रीन यांना दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या एका छोट्याशा गावात ती दोन वर्षांची
गरिबांची मुलं प्राध्यापक कशी बनतील?
गरिबांची मुलं प्राध्यापक व्हायला हवीत. निवड प्रक्रियेतील डोनेशन स्वरूपातला भ्रष्टाचार थांबायला हवा. आज ९९% संस्थाचालक ४०-५० लाख रुपये डोनेशन घेत आहेत. गरिबांची मुले एवढे पैसे देऊच
Read Moreमराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान -महत्त्वाच्या app व संकेतस्थळांची माहिती (भाग १)
कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक्य होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स,
Read Moreशिक्षणातून स्किल लेबर्सची निर्मिती
बहुतांश श्रीमंत नोकरदार, उच्चशिक्षित पालकांचे एकच उद्दिष्ट आहे- आपल्या मुलांना भरपूर पैसा कमविता यावा यासाठी त्यांना नोकरदार किंवा मग
Read Moreपुरोहितांची रोजगार हमी योजना
आपण जो विधी, जी पूजा करणार आहोत, त्याचा समोरच्याला काहीच उपयोग व फायदा होणार नाही, हे माहीत असूनही केवळ दक्षिणेसाठी तो विधी, पूजा
Read Moreशाळा-महाविद्यालयांमधील धर्मांधता
दक्षिणेत शाळा व महाविद्यालयांमध्ये हिजाब व भगवे वस्त्र यावरून वाद निर्माण झाला होता. यावरून माझे मत-
भारतात कदाचित पुढील काही दिवसांत अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये एकमेकांविरुद्ध ‘जय श्रीराम’ व ‘अल्ला हुं अकबर’ अशा घोषणा देण्याचे
Read Moreअनिल काकोडकर यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे-
३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी, २०१८ असे दोन दिवस जव्हारमध्ये मराठी विज्ञान परिषद व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूलच्या वतीने जव्हारमध्ये दोन दिवसीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी थोर अणुशास्त्रज्ञ पद्मश्री, पद्मभुषण, पद्मविभुषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण उपस्थित होते. या प्रसंगी काकोडकर सरांचे व्याख्यान झाले. यानंतर त्यांचे जव्हार परिसरातील शिक्षक प्राध्यापकांसोबत
Read Moreबहुजनांनी मोक्याच्या जागा का मिळवाव्यात? भविष्यात काय करावे?
गोविंदराव पानसरे यांच्या ‘जात, धर्म…’ नावाच्या एका पुस्तकात त्यांनी शेतमजूर कुटुंबातून आलेला न्यायाधीश व जमीनदाराच्या कुटुंबातून आलेला न्यायाधीश यांनी एकाच गुन्ह्यातल्या आरोपींना
Read Moreप्राध्यापक व्हायचंय? मग हे करा-
नेट/ सेट उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो, प्राध्यापक व्हायचंय?
नेट/ सेट उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
पण खरा संघर्ष आता सुरू होईल. कारण स्पर्धा खूप
नवीन वर्ष, ईश्वर, विज्ञान व असेच काहीतरी…
मित्रांनो,
अव्याहतपणे वाहत असलेल्या अमर्याद काळातून/ निसर्गाने निर्माण केलेल्या दिवस-रात्रींतून माणसाने स्वतःच्या सोयीसाठी सेकंद, मिनिटे, तास, दिनांक,
‘तुम्ही मुस्लिम धर्मावर बोलत नाहीत’ मला विचारतात.
हिंदू धर्मातील अपप्रवृत्तींवर बोलायला गेलो की, आपल्याच हिंदू धर्मातील लोकं ‘तुम्ही मुस्लिम धर्मावर बोलत नाहीत’, असे बोलून मुस्लिमांना मध्ये कसे काय
Read More