आमच्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान होते. आमची संस्कृती सर्वात श्रेष्ठ होती व आहे. आम्ही सर्वांना समान समजतो. आमच्याकडे अद्वैती तत्त्वज्ञान आहे. असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न-
● ही एवढी सर्व जाणीव भारताला होती मग या ज्ञानावर समाजाची रचना का झाली नाही?
● भारताचा परकीयांसमोर पुन्हा पुन्हा पराभव का झाला?
● सती प्रथा, केशवपन अशा घातक प्रथा का निर्माण झाल्या?
● ९०टक्के वर्गाला शिक्षणाची, वेदांच्या ज्ञानाची परवानगी का नाकारली गेली? त्यांना अज्ञानात का ठेवले गेले?
● ज्या ज्या गोष्टींमुळे या इहलोकात चांगले आयुष्य जगता येते, त्या सर्व संधी त्यांना का नाकारल्या गेल्या?
● एकीकडे अद्वैत मानायचे व दुसरीकडे समाज कधीही एकत्र येणार नाही अशी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था निर्माण करायची, असे का केले गेले?
● हे तत्त्वज्ञान सर्व जगामध्ये का पसरले नाही?
● सिंधूबंदी किंवा समुद्रगमन अशी बंधने का लादली गेली?