आज SYBA च्या वर्गात फळ्यावर’ संसद, लोकसभा / राज्यसभा, विधानसभा / विधानपरिषद असे शब्द लिहिले. भारतीय संसदेत काय येतं, असे विचारले. ३०-३५ मुलांपैकी कुणालाच सांगता आलं नाही. त्यानंतर तुम्ही ज्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून देतात ते वरीलपैकी कोणत्या सभागृहात जाऊन बसतात , असे विचारले. नाही सांगता आले. नाही सांगता आले.
मागच्या वर्षी NSS मधील प्रवेशासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काेणत्याही ५
राजकीय नेत्यांची नावे विचारली. ९५ टक्के मुलांना सांगता आली नाहीत. हेच नवीन मतदार आहेत. राज्यव्यवस्था, लोकशाही, राज्यघटना, राजकीय पक्ष, त्यांचा इतिहास, ध्येयधोरणे, तत्त्वज्ञान, त्यांच्या जनकसंस्था याविषयी कुठलीही माहिती नसलेले मतदार! मग हे काय बघून मतदान करतील. तर एकतर पैसे घेऊन किंवा ‘गर्व से कहो…’ यासारख्या घोषणांना बळी पडून. माझ्या मते, हे सर्व अंध मतदार आहेत. ज्यांना लोक्षाहीव्यवस्थेवद्दल फार काहीही माहित नाही. ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल आहे!’ बघून प्रचंड अस्वस्थ वाटतं.
जे आदिवासी नाहीत, ज्यांचा काही अभ्यास नाही तेसुद्धा 'आदिवासी हे हिंदू आहेत' असे म्हणत आहेत. कायदा काय म्हणतो, न्यायालय काय म्हणते, इतिहास काय म्हणतो ते तर बघा. आदिवासी हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कोणत्या वर्णात होते? हिंदू विवाह कायदा त्यांना लागू होत नाही. यावरून हेच सिद्ध होते की ते हिंदू नाहीत. त्यांच्या…
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर…
आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक जीवनात छोट्या छोट्या असंख्य समस्या निर्माण होतात. समाजात एक खोटा इतिहास बिंबवला जातो. जसे ह्या रंगांचे महत्त्व अमुक-तमुक धर्मग्रंथात…