आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर दुसरा कुणीतरी आपल्याला कायमचा सुखी करेल, ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. सुख हे एक भ्रम आहे. तुम्ही जितके त्याच्या मागे पळाल, तितके दुःख पदरात पडेल. सुख तुमच्या आत आहे. तुमच्या मनात. ते तिथेच शोधा. तुम्हाला ते एकदाचे सापडले म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी सुखी झालात असेही नव्हे. त्याला तुम्ही चिमटीत पकडून ठेवू शकत नाही. ते निसटल्यावर तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा शोधत राहावे लागेल. पण त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.
आज मी एका मोबाईलच्या दुकानावर माझ्या आयडियाच्या कार्डची पोर्टेबिलिटी करायला गेलो होतो. तिथे एक बुवा त्या दुकानदाराला एका गोष्टीच्या आधारे आईचे महत्त्व समजावून सांगत होता. (दोन-तीन दिवसांपूर्वी याच दुकानावर तो बुवा याच मोबाईलवाल्याला 'माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ युट्युबवर टाकायचे आहेत. तुम्हाला टाकता येतील का?' असे विचारत होता). मी तिथे पोहचलो, तेव्हा…
विद्यार्थी मित्रांनो,जी मुलं लेक्चरला येत नाहीयेत त्यांनी व इतरांनीही लक्षात ठेवा.१) यावर्षी तुमची परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन होईल.२) सर्व पेपर तुम्हाला लिहावे लागतील. ऑब्जेक्टिव्ह काहीही असणार नाही.३) प्रश्नपत्रिका मुंबई विद्यापीठाकडून येतील. तसेच पेपर तपासायला मुंबई विद्यापीठाकडेच जातील. तिथे तपासताना कोणत्या कॉलेजची मुलं आहेत, ते काहीच कळणार नाही.४) अभ्यासक्रमात वाचून…
मला विद्यार्थीदशेत पुस्तकं वाचताना त्यातील महत्त्वाचे परिच्छेद, वाक्ये, संवाद, सुभाषिते, कवितांच्या ओळी इत्यादी लिहून ठेवण्याची सवय होती. अशा कित्येक वह्या माझ्याकडे भरून पडलेल्या आहेत. आजही ते वाचलं तरी त्यातील बरचसं मी कुठे बसून वाचलं (म्हणजे धाब्यावर, शेतात, गावाबाहेरच्या शाळेत, बसस्टँडवर, बसमध्ये, लायब्ररीत की अजून कुठे), मी कोणत्या पोझिशनमध्ये बसलेलो होतो …
Nice
बरोबर आहे.एखाद्या व्यक्तीविषयी किंवा घटनेविषयी आपल्या मनातील गैरसमज दूर झाला तर आपल्याला सुख मिळू शकेल.
अतिशय सुंदर सर..
खरंच आहे..
सुख आपल्याच जवळ असते आणि आपण ते दुसरीकडे शोधत असतो…