महानुभाव पंथातील लोकांच्या मृत्यूनंतर दफनविधी केला जातो. माझ्या आजोबा व आजीचे याच वर्षी फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात मृत्यूनंतर त्यांच्या शेतात
दफन केले गेले. त्यामुळे लाकडे, तूप व इतर पदार्थ जाळून प्रदूषण झाले नाही. तसेच त्या अस्थी वगैरे घेऊन नद्या वगैरे शोधत फिरावे लागले नाही. याउलट त्या दफनाच्या जागेबद्दल आमच्या भावविश्वात एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. आमच्या आजी-आजोबांचे अस्तित्व आम्हाला तिथे जाणवत राहते. आम्ही गावी गेलो की क्षणभर तिथे थांबतो. माझ्या मृत्यूनंतर माझेही माझ्या शेतात दफन केले जावे, हीच माझी इच्छा आहे. मात्र त्याप्रसंगी कोणतेही धार्मिक विधी करता कामा नयेत. तसेच ज्या ज्या अवयवांचे दान करणे शक्य आहे ते केले जावे अशी इच्छा आहे.
(मी महानुभाव पंथाचा नाहीये. पण पर्यावरणाचा विचार करता तसेच ज्या मातीत मी थोडाफार राबलो, जिच्यात आपले पूर्वज राबले तिच्यातच सामावून जावे असे वाटते.)
कोरोना व झोपडपट्ट्यांमधील लोकांचा प्रश्न (सदर लेख लिहितेवेळी एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ४४४७ इतकी आहे. तसेच हा लेख लिहिताना मी अनेकांशी फोनवर बोललोय व तज्ज्ञांची मते विचारात घेतलीत, कृपया याची नोंद घ्यावी.) माझे वडील ३५ वर्षे मुंबईत कांदिवली येथील लक्ष्मीनगर, हनुमाननगर या झोपडपट्टी परिसरात राहिलेले आहेत. माझे…
मित्रांनो, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यवसायाला सुरुवात करत असतो. आपल्यापैकी काही लगेच तर काही अनेक वर्ष संघर्ष करून का असेना पण नोकरी मिळवतात व इमाने-इतबारे (!) आपली नोकरी करत राहतात. आपापले काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांकडून, मित्रांकडून गाव, शहर व परिसरातील लोकांकडून…
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर…