पुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा
सहभाग हे सर्व बघून वैतागून काही उपाय योजना सुचवाव्याशा वाटतात. –
१) धर्मव्यवस्थेनुसार सर्वप्रथम स्त्रियांचा व सर्व ओबीसी, एस.सी., एस. टी. वर्गाचा शिक्षणाचा अधिकार बंद करावा/ काढून घ्यावा. २) सहा महिने-वर्ष दोन वर्षांच्या मुलींच्या लग्नाची (बालविवाह) प्रथा, जरठकुमारी विवाह प्रथा पुन्हा सुरू करावी. ३) सतीप्रथा, केशवपन (विधवा झाल्यावर स्त्रियांची टकली करणे), विधवाविवाह बंदी, घटस्फोटाला बंदी इ. प्रथा पुन्हा सुरू कराव्यात. ४) वडील, पती यांच्या संपत्तीतील स्त्रियांचा अधिकार, संपत्ती धारण करण्याचा अधिकार काढून घ्यावा. ५) ओबीसी, एस.सी., एस. टी. आरक्षण १००% बंद करावे. ६) चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनरुज्जीवित करावी. ७) राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, म. फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मद्रोही व म्हणून देशद्रोही म्हणून घोषित करावे. ८) संविधान रद्द करून मनुस्मृतीचा कायदा पुन्हा सुरू करावा. ९) धर्मराष्ट्राची घोषणा करून टाकावी. १०) हे सर्व हळूहळू न करता ताबडतोब करावे.
स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न स्त्रियांचे शोषण करणार्या, त्यांना दुय्यम लेखणार्या, त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असंख्य प्रथा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. मात्र एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या प्रभावामुळे भारतीयांमध्ये काही प्रमाणात जागृती निर्माण होऊ लागली. पाश्चात्य शिक्षण, प्रबोधन यामुळे भारतातील सुशिक्षित वर्गाचे आपल्याकडील अनिष्ट प्रथा, परंपरा, स्त्रियांचे प्रश्न…
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क डावललेले आहेत. हजारो वर्षे स्त्रियांनी हे दुय्यम स्थान, त्यामुळे होणारे शोषण निमूटपणे सहन केले. पण विसाव्या शतकात…
नवा मानव समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत. होमो…