प्रश्न अनेक- उत्तर एक
१ कोणतेही कर्तृत्त्व नसताना मानसन्मान, आदर मिळवून देणारा व्यवसाय कोणता?
Read Moreप्रश्न अनेक- उत्तर एक
१ कोणतेही कर्तृत्त्व नसताना मानसन्मान, आदर मिळवून देणारा व्यवसाय कोणता?
Read Moreग्रामीण साहित्याचे स्वरूप
माझ्या ब्लॉगवरील या आधीच्या ‘ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा’ या लेखामध्ये ग्रामीण साहित्याच्या विविध प्रेरणांचे विवेचन केलेले आहे, त्या प्रेरणांमधून ग्रामीण साहित्य निर्माण झालेले आहे. ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाचा विचार करता, कालखंडानुसार ग्रामीण साहित्याच्या स्वरूपात फरक दिसून येतो.
१९२० च्या आधीच्या ग्रामीण साहित्यावर आपल्याला महात्मा फुले व त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव दिसून येतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे वैचारिक ग्रंथ व ‘अखंडा’मधून (कविता) ग्रामीण भागातील शेतकरी व इतर शूद्र वर्गाच्या शोषणाची मीमांसा केली. खेड्यापाड्यातील काबाडकष्ट करणाऱ्या Read More
आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन
प्रस्तावना-
भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असा देश आहे. भारतात आजही काही मोजक्या भाषांमधूनच लेखन केले जाते. तर १६०० पेक्षा जास्त बोली या फक्त बोलल्या जातात. म्हणजे त्या लिपीबद्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्यात लिखित साहित्य हे खूप कमी आहे किंवा जे आहे ते अगदी अलीकडे म्हणजे २५-३० वर्षांत या समूहातील नवशिक्षित वर्गाकडून लिहिले गेलेले आहे. परंतु आज त्या बोलींमध्ये जे मौखिक साहित्य उपलब्ध होते ते अतिशय मुबलक असे आहे. हे मौखिक साहित्य नेमके केव्हा निर्माण झाले हे आज कुणीही सांगू शकत नाही. परंतु पिढ्यानपिढ्यांपासून ते चालत आलेले आहे. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत.
महाराष्ट्रातील आधीच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका आहे. या तालुक्यात ‘क’ ठाकूर, ‘म’ ठाकूर, Read More
कोणत्याही प्रकारच्या साहित्याच्या निर्मितीमागे काही ना काही प्रेरणा या असतातच. त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही. मम्मटाने सांगितलेल्या प्रेरणा आपल्याला सर्वांनाच माहित आहेत. तशाच ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागेही काही प्रेरणा आहेत. त्या पुढील प्रमाणे –
१) ‘ग्रामीणते’चा शोध घेणे –
ग्रामीण साहित्याचे वेगळेपण हे त्याच्या ‘ग्रामीणते’त आहे. ग्रामीणतेची ही जी जाणीव आहे, तिचा शोध घेणे व ती व्यक्त करणे ही ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागील एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रचार प्रसारामुळे शिकलेली पहिली पिढी निर्माण झाली. या पिढीच्या असे लक्षात आले की, आतापर्यंत ग्रामीण म्हणून जे साहित्य लिहिले गेलेले आहे किंवा एकूणच जे मराठी साहित्य आहे, यात ग्रामीण भागाचे, तेथील लोकांच्या जगण्याचे त्यांच्या सुख-दुखांचे वास्तव चित्रण आलेले नाही. ग्रामीण Read More
(मी माझ्या लग्नानंतर आतापर्यंत जव्हार, जळगाव व नाशिकला मिळून ९ भाड्याच्या घरांमध्ये राहिलो. त्यापैकी जव्हार व नाशिकला मी हा नमुना वापरला. जो मला माझ्या एका ज्येष्ठ सहकार्यांकडून मिळालेला होता. सरकारी करारनाम्यांमध्ये प्रमाण लेखनाच्या किती चुका असतात, हे आपणास ठाऊक आहे. यात मी त्या दुरुस्त केलेल्या आहेत. हा नमुना सर्वांसाठी इथे देत आहे.)
लिव्ह अँड लायसेन्स करारनामा
(अकरा महिन्याच्या तत्वावर)
लिव्ह ऍन्ड लायसेन्स करारनामा आज दि………………… रोजी, ………………… या दिवशी नाशिक मुक्कामी लिहून देतो की,
श्री. घर मालकाचे नाव,
वय वर्षे ………….., धंदा-…………., लिहून घेणार
भाड्याने द्यायच्या घराचा पत्ता (लायसेन्सॉर)
…………………………………………….
……………………………………………
यांसी
श्री. भाडेकरुचे नाव,
उ. व. 34, धंदा – नोकरी, लिहून देणार
भाडेकरुचा पत्ता (लायसेन्सी)
……………………………………………..
…………………………………………….
कारणे लिव्ह अँड लायसेन्स करारनामा लिहून देतो ऐसा जे की:
1) मिळकतीचे वर्णन :
……………………………………………………………………………………………….... सदर मिळकतीमधील लाईट व नळ कनेक्शनसह.
2) वर कलम 1 मध्ये वर्णन केलेली मिळकत ही तुमच्या नावे व मालकीची असून ती तुम्ही मला 11 महिन्यांसाठी राहण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स करारनाम्याने द्यावी, अशी मी तुम्हास विनंती केल्याने व माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही मला सदर मिळकत खालील अटी व शर्तीवर देत आहात.
अटी व शर्ती:
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.
इतिहास- पार्श्वभूमी-
आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.
भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More
चालून चालून पाय थकले
किती चाललो कळलेच नाही
तुझ्यासोबत online असता
खूप-खूप अभ्यास कर,
मोठा हो. आत्मविश्वासाने
स्वाभिमानी जीवनाची
पायाभरणी कर.
कठोर ज्ञानसाधना कर,
ज्ञानवंत, बुद्धिवंत हो!
संकटांतून तावून-सुलाखून निघशील Read More
२००५ पर्यंत मीही धार्मिक, आध्यात्मिक लोकांच्या प्रभावाखाली होतो. स्वाध्यायात जायचो. व्रती म्हणून काम करायचो. व्रती म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन स्वाध्याय केंद्र चालविणारी व्यक्ती. स्वाध्यायात असताना धार्मिक विषयावरची अनेक पुस्तकं वाचली. नोट्स काढल्या. प्रचार-प्रसाराचे कार्य केले. एकदा ५-६ दिवसांसाठी माउंट अबूला ‘ओम शांती’ वाल्यांच्या केंद्रात राहूनही आलो होतो. माझ्याकडे तेथील फोटोही आहेत. त्या काळात मी चिकित्सा करणाऱ्या, चर्चा घडवू पाहणाऱ्या पुरोगामी विचारांच्या लोकांच्या कार्यक्रमांना प्रताप महाविद्यालयात (अमळनेर, जि. जळगाव) हाणून पाडले होते. त्यासाठी प्रसंगी आक्रमक झालो होतो. हळूहळू काही गोष्टी कळत गेल्या. त्यासाठी मला
Read Moreभवितव्य काहीच नव्हतं
नात्याला आमचं
तरी तिने मला
तिच्या मनात जपलं।
डोह
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
काम ही मानवी जीवनातील अतिशय प्रबळ अशी प्रेरणा आहे. तिच्यावर मानवी मनाचे नियंत्रण राहिले तर ठीक. अन्यथा तिने मानवी मन, मेंदू व शरीराचा ताबा घेतला तर ती माणसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ‘डोह’ ही कथा याच आशयसूत्रावर आधारलेली आहे.
‘डोह’ या कथेत मदारी हे एकमेव महत्त्वाचे पात्र आहे. त्याची आई, अम्मा, पुढे जिचे निधन झालेले आहे अशी एक सुंदर स्त्री या दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा असून त्या गौण आहेत. या कथेतील मदारी हा नाग व नागिणीचा खेळ दाखवून त्याचा व त्याच्या अम्माचा उदरनिर्वाह भागवतो. तो अतिशय आडदांड व राकट शरीराचा तरुण आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन हा खेळ दाखवायचा. पुंगी वाजवून तो नाग व नागिनीचे मैथुन घडवून आणायचा. लोकं व तो स्वतः ते मैथुन बघायचे. ते मैथुन बघून त्याची वासनेची अतृप्त व सूप्त भूक उफाळून यायची. परंतु तिचा निचरा करणे शक्य नसल्याने तो ती दडपून टाकायचा. नुकत्याच मैथुन क्रीडा संपवलेल्या नागाचा वास त्याच्या देहातील सुप्त वासनेवर जाऊन आदळला की, त्याच्या संवेदना सळसळू लागायच्या. नागाच्या डोळ्यात त्याला पौरुषत्व जाणवायचे.
झूल
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
‘झूल’ ही कथा भाऊराव मास्तरसारखी काही स्वार्थी व बेरकी लोकं ग्रामीण भागातील अडाणी, धार्मिक, देवभोळ्या लोकांच्या मानसिकतेचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेतात, यावर आधारलेली आहे.
या कथेत गौतमबुवा म्हणून एक व्यक्तिरेखा आहे. गौतमबुवाला लग्नाच्या आधीपासून देवधर्माचे वेड होते. तो फक्त जेवायला घरी यायचा. दिवस उगवला की गावाच्या बाजूला असलेल्या नागझिरीच्या टेकडीवर जाऊन मारुतीच्या देवळासमोर जाऊन दिवसभर बसून राहायचा. लग्नाआधी तो आठ-आठ दिवस घरी यायचा नाही. शेवटी त्याला संसारात/ ऐहिक जीवनात रमविण्यासाठी त्याचे आई-वडील त्याचे लग्न लावून देतात. पण तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही. लग्नाला तीन वर्षे होतात तरीही तो बायकोला कोणतेही सुख देत नाही. दिवसभर मंदिरासमोर बसून राहतो. रात्री घरी आल्यावर जेवून शांतपणे झोपून जातो. ती कधी त्याच्या जवळ आली व त्याला झोपेतून जागे केले तर थंडपणे स्वतः ला तिच्यापासून सोडवून घेतो. पुढे तो दाढी-मिशा वाढवतो. भगवे कपडे घालू लागतो. पायात वाहना न वापरता अनवाणी पायांनी हिंडू लागतो. लोक त्याला गौतमबुवा म्हणू लागतात. तो देखील निस्वार्थीपणाने लोकांचे पडेल ते काम करू लागतो. दरवर्षी पायी पंढरपूरला जात राहतो. त्याला संसारात रस नसतोच. कुठल्याही बंधनात त्याला अडकायचे नसते.
एक हिरवे पान
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
‘एक हिरवे पान’ ही कथा प्रत्येक माणसाला जगताना कुणाच्यातरी आधाराची गरज असते, या विषयावर आधारलेली आहे. या कथेमध्ये दुल्लू मियाँ, बिसमिल्ला, वैदा या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या तिघांचेही वैवाहिक जीवन या ना त्या कारणाने उद्ध्वस्त झालेले असल्याने ते कुणाचा ना कुणाचा आधार शोधत राहतात.
दुल्लू हा साधारणतः पन्नाशीच्या पुढचा व्यक्ती आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्याला वैदा नावाची एक मुलगी आहे. ती लग्नाच्या वयाची आहे. त्याची आई लालबी ही खूप म्हातारी असते. मुलीचे लग्न व आईचे निधन झाल्यावर आपल्यासोबत कोण राहणार?, आपल्याला कुणाचा आधार उरणार? याची चिंता त्याला सतावत राहते. आपल्याला म्हातारपणात कुणाची तरी साथ राहावी, म्हणून तो बिसमिल्ला नावाच्या मुलीशी लग्न करून घेतो. ती त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असते. तिला आई-वडील नव्हते. तिचे लग्न झालेले असते. पण नवऱ्याचे निधन झाल्यानंतर तिचे सासू-सासरे तिला घरातून बाहेर काढतात. तेव्हा दुल्लू तिच्याशी पाट लावून घेतो व तिला आश्रय देतो. त्यांच्या लग्नाला सहा महिने होत नाहीत, तेवढ्यात ती एका मुलीला जन्म देते. दुल्लूला हे माहित असते की, ती मुलगी आपल्यापासून झालेली नाहीये. तरीही तो बिसमिल्लाला एक शब्दही बोलत नाही. उलट बाळंतपणात तिची खूप काळजी घेतो. तिचे सर्व आवरतो. तिच्यासाठी मेव्याचे लाडू बांधतो व दररोज स्वतः तिला एक-एक लाडू खाऊ घालतो. दोन महिने तिला पाण्यात हातही घालू देत नाही.
चुंभळ
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
‘चुंभळ’ ही कथा भिकी नावाच्या एका मांग जातीच्या विधवा स्त्रीची आपल्या मुलांची काळजी व त्यांच्याकडूनची अपेक्षा व शेवटी तिचा होणारा अपेक्षाभंग यावर आधारलेली आहे.
भिकी ही मांगवाड्यात राहणारी एक विधवा स्त्री आहे. तिला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव वच्छी व मुलाचे नाव कोसा असे आहे. वच्छी ही लग्नाच्या वयाची असून कोसा हा साधारणतः १५-१६ वर्षांचा असावा. तिच्या नवर्याचे नाव बिसन असे होते. तो लग्नसराईत वाजंत्री वाजवायला जायचा. त्याला सैनी हे वाद्य खूप सुंदर वाजता यायचे, हे भिकीच्या बिसनविषयीच्या आठवणींमधून आपल्या लक्षात येते. याव्यतिरिक्त तो म्हशी भादरायचे काम करायचा. हेच काम करताना पाटलाच्या म्हशीने पोटात शिंग खूपसल्यामुळे त्याचा मृत्यू घडून आलेला होता. एकदा तो पाटलाच्या म्हशी भादरायला गेलेला होता. म्हशी भादरत असताना एका म्हशीच्या मानेजवळ वस्तरा लागून ती जखमी होते. जखमेतून रक्त येऊ लागते. त्यामुळे म्हैस बिथरते व दावं तोडून शिंग उगारून बिसनवर धावून जाते. म्हशीला बिथरलेलं बघून पाटलाची माणसं पळून जातात. बिसनही पळून जाण्याच्या बेतात असतो. पण तो भिंतीवर आढळतो. म्हैस त्याला शिंगावर उचलून पुन्हा एकदा भिंतीवर फेकते. म्हशीचे एक शिंग त्याच्या पोटात घुसते आणि तिने त्याच्या छातीवर पाय ठेवल्याने त्याच्या छातीच्या बरगड्या मोडतात. त्याच्या पोटातला कोथळा बाहेर निघतो. त्यातच तो मरण पावतो.
मित्रांनो, एकाग्रता म्हणजे काय? ती कशी वाढवावी? याबद्दल मला अनेक जण विचारतात. त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, एकाच विषयावर, वस्तूवर किंवा कामावर आपले मन, चित्त, लक्ष किंवा अंतःकरण केंद्रित करण्याची किंवा स्थिर करण्याची जी क्षमता/ शक्ती असते, तिला एकाग्रता असे म्हणतात.
ही जी क्षमता असते ती काहींची अतिशय कमी असते, तर काहींची जास्त. काही जण तासनतास एकाच विषयावर, कामावर मन एकाग्र करू शकतात. तर बरेच जण काही मिनिटही करू शकत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाचे चित्रपट, क्रिकेट यावर लक्ष केंद्रित होते, पण अभ्यासावर होत नाही.
तुम्हाला जर एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर त्यामुळे आयुष्यात खूप नुकसान होते. वाचलेले, ऐकलेले समजत नाही. समजले तर लक्षात राहत नाही किंवा नंतर आठवत नाही. अभ्यासात, प्रगतीत अडथळे निर्माण होतात. योजलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.
तेव्हा ही एकाग्रता कशी वाढवायची? याचे काही उपाय किंवा मी केलेले काही प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
मित्रांनो, मी वर्गात अनेकदा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो असतो की, तुम्ही किती वेळ अभ्यास करतात? विद्यार्थी बऱ्याचदा स्वतःहून काहीच उत्तर देत नाहीत. मग मी स्वतःहून विचारतो की, दररोज न चुकता दिवसातून ३ तास किती जण अभ्यास करतात? कोणीच हात वर करत नाही. मग मी २ तास, १ तास, अर्धा तास, १५ मिनिटे, एक मिनिट असं मुलांना विचारत जातो. माझ्या अनेकदा असे लक्षात आलेले आहे की, अनेक मुलं दिवसात एक मिनिटही अभ्यास करत नाहीत. अशी मुलं PSI/ STI यासारख्या परीक्षांमध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. PSI/ STI कशाला परंतु साधे पोलीस, तलाठीही होऊ शकत नाहीत. कारण आज प्रत्येक परीक्षांमध्ये स्पर्धां एवढी वाढलेली आहे की, आपल्याला दररोज न चुकता किमान ५-६ तास अभ्यास Read More
भाषा हे ज्ञान मिळविण्याचे, आत्मसात करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. त्यामुळे लहान मुलांच्या भाषाविकासाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.
एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणे, म्हणजे ती भाषा तिच्या सर्व अंगभूत सामर्थ्यासह बोलता, लिहिता व वाचता येणे होय.
दोस्तों, इस लेख के माध्यम से मै आपको गणपति का सही अर्थ बता रहा हूँ. मै सबके धार्मिक भावनाओ का सन्मान करता हुँ. लेकिन एक अभ्यासक के नाते अनुसंधान से जो सच सामने आता है, उसे बताना भी जरूरी होता है. इसलिए मै ये कहे रहा हुँ.
गणपति वर्तमान राष्ट्रपति और सभापति के जैसा
मला जीवनाचा खराखुरा आंनद घ्यायचाय
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो
मला सर्वांवर अगदी सारखंच प्रेम करायचंय
प्रिय मित्रांनो,
येत्या १९ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्रातील पहिले पराक्रमी व कर्तबगार महापुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती आपण सर्वजण उत्साहात साजरी करणार आहोत. या दिवशी आपण मोटरसायकलला झेंडा लावून रॅल्या काढतो,
भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की,
अस्मिता तीव्र, टोकदार
मेंदू छोटा
समस्यांना कसा राहिल
बरं मग तोटा!
© Copyright
गणपती हे आताचे राष्ट्रपती, सभापती यांसारखेच एक पद होते. ती व्यक्ती नव्हती. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा प्रमुख. सभापती म्हणजे सभेचा प्रमुख. त्याचप्रमाणे गणपती म्हणजे गणांचा प्रमुख. समुहाचा, समुदायाचा प्रमुख.
‘गण’ म्हणजे लाेकं, समुह, समुदाय (अनेकनचनी रूप). शब्दकोशांमध्ये तपासून पहा, ‘गण’ या शब्दाचा हाच अर्थ दिलेला आहे. तर पती म्हणजे प्रमुख (नवरा नव्हे).
नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या आभाळभर मन:पूर्वक शुभेच्छा!
आजचा हा दिवस संपूर्ण जगात खूपच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात नोकरी करतो. या ठिकाणी ९ ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये जव्हार शहरात जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा, गौरी, ढोल व इतर नृत्य सादर करतात. अतिशय आनंदाचा व उत्साहाचा हा दिवस असतो. आजच्या दिवशी आदिवासी बांधव धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या आदिवासी समाजाशी संबंधित त्या त्या ठिकाणच्या देवदेवतांच्या पूजा-अर्चा करतात.
असे असले तरी, Read More
मित्रांनो, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यवसायाला सुरुवात करत असतो. आपल्यापैकी काही लगेच तर काही अनेक वर्ष संघर्ष करून का असेना पण नोकरी मिळवतात व इमाने-इतबारे (!) आपली नोकरी करत राहतात. आपापले काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांकडून, मित्रांकडून गाव, शहर व परिसरातील लोकांकडून अनेक गोष्टी आपण कळत-नकळतपणे शिकत असतो. अनेक खाजगी व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही कार्यशाळा, चर्चासत्रे, गट संमेलने, सभा, परिषदा या अनिवार्य केलेल्या असतात. अनिवार्य असल्यामुळे नाईलाजाने आपण त्या करून घेत असतो. आयोजकही कामकाजाचा भाग म्हणून सोपस्कार पार पाडत असतात. वैयक्तिक व्यवसाय, उद्योगधंदे करणाऱ्यांना तर आपल्या इथे अशा कार्यशाळा व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होतेच असे नाही. आपणही पुढे-पुढे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जातो. जे रूटीन आहे ते चालू ठेवतो.
शिक्षण घेत असतानाही अनेक विद्यार्थी अशा कार्यशाळा अथवा शिबिरांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांच्या आयोजनामध्ये Read More
बरेच जण म्हणतात की, वाचन करणे चांगले असते. वाचनाचे अमुक-तमुक फायदे असतात. बरोबरच आहे. वाचनाचे खरंच खूप फायदे आहेत. परंतु, त्याच्यासोबत काय वाचायचे, कोणती पुस्तके वाचायची हेही कळायला पाहिजे. आमच्या ‘साहित्य आणि समाज’ या TYBA च्या विषयाच्या एका पुस्तकात ‘हजारो वर्षे समाजाचे मन एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात असते’, असे एक वाक्य आहे. अगदी खरं आहे ते. कारण बहुतांश
Read Moreआयुष्य सुंदर वाटतं
जीवन जगल्यासारखं वाटतं Read More
माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-
भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर वाचा, ऐका. कारण हे तुमच्या व तुमच्या पुढील पिढ्यांच्या तसेच देशाच्या भवितव्याशी निगडित आहे. सरकार हे धोरण इतक्या घाईत आणण्याचा प्रयत्न करत आहे की,
Read Moreमी दुःखाची नाते जोडले
दोस्ती कायमची केली
व्याजाने घेतलेले आहे
ओठांवरचे हास्यही
दु:खाला पचवत नाही
दि. १८ जुलै रोजी मला अध्यापनाच्या क्षेत्रात येऊन १२ वर्षे पूर्ण झाली. कालच्याच दिवशी २००८ साली मी जळगावच्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात रुजू झालो होतो. त्यानंतर मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ज्युनियर रिसर्च फेलो व नंतर सिनियर रिसर्च फेलो म्हणून काम केले. गेल्या साडे आठ वर्षांपासून जव्हार येथे अध्यापन करीत आहे. Read More
भाषा हे ज्ञान आत्मसात करण्याचे सर्वात महत्वाचे साधन, माध्यम आहे. त्यामुळे हे साधन चांगल्या पद्धतीने वापरता येणे, या माध्यमावर आपले प्रभुत्व असणे हे खूप गरजेचे असते. कोणतीही भाषा लहानपणी जेवढ्या सहज व लवकर शिकता येते. तेवढी नंतर जमत नाही. मोठं झाल्यावर भाषाशिक्षणासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात.
अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण शहरांपासून तर अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेले आहे. मात्र इंग्रजी
केंद्राच्या १५℅ कोट्यातील मेडिकलच्या एकूण जागांमधील ओबीसींसाठी असलेले २७% आरक्षण बंद करून टाकले गेलेले आहे. त्यामुळे यापुढे दरवर्षी जवळपास ३००० पेक्षा जास्त OBC च्या जागा कायमस्वरूपी संपून गेलेल्या आहेत.
गेल्या २ वर्षात OBC च्या मेडिकलमधील ५५०० पेक्षा जास्त जागा OBC ना न देता त्या general
Read Moreलोकशाही राज्यात दबावगट नावाची एक संकल्पना असते. आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक असे विविध क्षेत्रातील दबावगट असतात. औद्योगिक क्षेत्रातील लोकं असेच दबाव टाकून त्यांना योग्य व अनुकूल निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडतात. बौद्धिक क्षेत्रातील लोकांचाही दबावगट असतो. पण राज्यकर्ती मंडळी वैचारिकदृष्ट्या कमकुवत असली
Read Moreविद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्राध्यापकांनी लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस वाया न घालवता अनेक वेबिनार अटेंड केले, अनेकांनी वेबिनार आयोजित केले. ७ किंवा १४ दिवसांचे online कोर्स केले, व्हिडिओ, PPT कसे बनवावेत, ते एडिट कसे करावेत, Google form वगैरेसारख्या कित्येक गोष्टी शिकून घेतल्या. Youtube, zoom वरून भरपूर ऐकलं, पुस्तकं वाचली, तुमच्यासाठी नोट्स तयार केल्या, अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार केले. Facebook live, zoom, google meet च्या माध्यमातून तुम्हाला, समाजाला संबोधित केले. Online अनेक उपक्रम राबविले.
अनेकांनी आपले पीएचडी, एमफिलचे अपूर्ण राहिलेले काम पुढे नेले. ज्यांनी आपले प्रबंध आधीच विद्यापीठाला सादर केले होते, त्यापैकी काहींनी ऑनलाइन पद्धतीने मौखिक परीक्षा (Viva) देऊन पीएचडी पदवी संपादित केली.
Youtube वरून खूप सारे tutorial बघून अनेक कौशल्ये आत्मसात केली.
आम्ही जेव्हा-जेव्हा फोनवर बोललो तेव्हा जास्त तुमच्याविषयीच बोललो, तुमचीच काळजी आम्हाला वाटत राहिली. स्वतःचा हा विकास आम्ही फक्त तुमच्यासाठीच करत राहतो. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाचा व देशाचा फायदाच होतो.
तुम्ही काय केले? आत्मपरीक्षण करा.
मित्रांनो, आयुष्यात पुढे जायचे असेल तर स्वस्थ बसून कसे चालणार बरं? तुम्हीच सांगा व तुम्हीच ठरवा.
आयुष्यात जिथून जे मिळेल, ते आत्मसात करत नवीन शिकत राहायला हवे. कालपेक्षा आज आपली थोडी का असेना समज, आकलन, बौद्धिक उंची वाढलेली असायला हवी. थांबून चालणारे कसे?
एक शिक्षक
(सर्व शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी वरील मत व्यक्त केले.)
आज SYBA च्या वर्गात फळ्यावर’ संसद, लोकसभा / राज्यसभा, विधानसभा / विधानपरिषद असे शब्द लिहिले. भारतीय संसदेत काय येतं, असे विचारले. ३०-३५ मुलांपैकी कुणालाच सांगता आलं नाही. त्यानंतर तुम्ही ज्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून देतात ते वरीलपैकी कोणत्या सभागृहात जाऊन बसतात , असे विचारले. नाही सांगता आले. नाही सांगता आले.
मागच्या वर्षी NSS मधील प्रवेशासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काेणत्याही ५
Read Moreमी जून २००७ मध्ये एम. ए. झालो. त्याच महिन्यात २९ जून रोजी झालेली नेट परीक्षा मी (नोव्हेंबरमध्ये निकाल) उत्तीर्ण झालो. त्यानंतर जून २००८ मध्ये झालेली नेट परीक्षा मी JRF सह उत्तीर्ण झालो. नंतर मी दोन वर्ष JRF व चार महिने SRF (फेलोशिप) घेतली.
डिसेंबर २०११ च्या आधी ही परीक्षा फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपाची नव्हती. पहिला व दुसरा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असायचा तर तिसरा पेपर लिहावा लागायचा. त्यात संकल्पना, दीर्घोत्तरी प्रश्न, ४० गुणांसाठी निबंध इ. स्वरूपाचे प्रश्न विचारले जायचे व २०० गुणांच्या पेपरसाठी फक्त अडीच तास वेळ दिलेली असायची. तेव्हा कमी वेळेत अतिशय अचूक उत्तरे लिहावी लागायची. Read More
घटनाक्रमाकडे जरा लक्ष द्या-
३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.
फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखो लोकं एकत्र केले गेले.
१६ मार्चपर्यंत अख्या भारतातील शाळा, महाविद्यालये सुरू होती.
१९ मार्चला जनता कर्फ्युची घोषणा
२२ मार्चला जनता कर्फ्यूचा फार्स पार पडला.
२३ तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन सुरू होते.
२३ तारखेला मध्यप्रदेशात शपथ घेतली.
२४ तारखेला बहुमत सिद्ध केले.