मेडिकलमधील ओबीसींचे आरक्षण रद्द

केंद्राच्या १५℅ कोट्यातील मेडिकलच्या एकूण जागांमधील ओबीसींसाठी असलेले २७% आरक्षण बंद करून टाकले गेलेले आहे. त्यामुळे यापुढे दरवर्षी जवळपास ३००० पेक्षा जास्त OBC च्या जागा कायमस्वरूपी संपून गेलेल्या आहेत.

गेल्या २ वर्षात OBC च्या मेडिकलमधील ५५०० पेक्षा जास्त जागा OBC ना न देता त्या general

Read More

विद्यार्थ्यांना उद्देशून..।

विद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्राध्यापकांनी लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस वाया न घालवता अनेक वेबिनार अटेंड केले, अनेकांनी वेबिनार आयोजित केले. ७ किंवा १४ दिवसांचे online कोर्स केले, व्हिडिओ, PPT कसे बनवावेत, ते एडिट कसे करावेत, Google form वगैरेसारख्या कित्येक गोष्टी शिकून घेतल्या. Youtube, zoom वरून भरपूर ऐकलं, पुस्तकं वाचली, तुमच्यासाठी नोट्स तयार केल्या, अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार केले. Facebook live, zoom, google meet च्या माध्यमातून तुम्हाला, समाजाला संबोधित केले. Online अनेक उपक्रम राबविले.

अनेकांनी आपले पीएचडी, एमफिलचे अपूर्ण राहिलेले काम पुढे नेले. ज्यांनी आपले प्रबंध आधीच विद्यापीठाला सादर केले होते, त्यापैकी काहींनी ऑनलाइन पद्धतीने मौखिक परीक्षा (Viva) देऊन पीएचडी पदवी संपादित केली.

Youtube वरून खूप सारे tutorial बघून अनेक कौशल्ये आत्मसात केली.


आम्ही जेव्हा-जेव्हा फोनवर बोललो तेव्हा जास्त तुमच्याविषयीच बोललो, तुमचीच काळजी आम्हाला वाटत राहिली. स्वतःचा हा विकास आम्ही फक्त तुमच्यासाठीच करत राहतो. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाचा व देशाचा फायदाच होतो.

तुम्ही काय केले? आत्मपरीक्षण करा.

मित्रांनो, आयुष्यात पुढे जायचे असेल तर स्वस्थ बसून कसे चालणार बरं? तुम्हीच सांगा व तुम्हीच ठरवा.

आयुष्यात जिथून जे मिळेल, ते आत्मसात करत नवीन शिकत राहायला हवे. कालपेक्षा आज आपली थोडी का असेना समज, आकलन, बौद्धिक उंची वाढलेली असायला हवी. थांबून चालणारे कसे?

एक शिक्षक
(सर्व शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी वरील मत व्यक्त केले.)

नेट/ सेटच्या अभ्यासासाठी मी वापरलेली काही पुस्तके व माझे काही अनुभव

             मी जून २००७ मध्ये एम. ए. झालो. त्याच महिन्यात २९ जून रोजी झालेली नेट परीक्षा मी (नोव्हेंबरमध्ये निकाल) उत्तीर्ण झालो. त्यानंतर जून २००८ मध्ये झालेली नेट परीक्षा मी JRF सह उत्तीर्ण झालो. नंतर मी दोन वर्ष JRF व चार महिने SRF (फेलोशिप) घेतली. 

            डिसेंबर २०११ च्या आधी ही परीक्षा फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपाची नव्हती. पहिला व दुसरा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असायचा तर तिसरा पेपर लिहावा लागायचा. त्यात संकल्पना, दीर्घोत्तरी प्रश्न, ४० गुणांसाठी निबंध इ. स्वरूपाचे प्रश्न विचारले जायचे व २०० गुणांच्या पेपरसाठी फक्त अडीच तास वेळ दिलेली असायची. तेव्हा कमी वेळेत अतिशय अचूक उत्तरे लिहावी लागायची. Read More

नवीन, आधुनिक व विधायक समाजनिर्मितीसाठी संशोधनाची गरज

             मेंदूत नवीन विचार व कल्पनाच येत नसतील, तर नवीन संशोधन कसे होणार? संशोधनच नाही झाले तर आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, शस्त्रास्त्रे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरण संरक्षण, शहर नियोजन इ. इ. क्षेत्रांमध्ये नवीन भर पडून त्यावर आधारित उद्योग, व्यवसाय कसे निर्माण होणार? असे काही घडले नाही तर अनेकांच्या हाताला काम कसे मिळणार?

Read More

अभ्यास कसा करावा? (भाग-१)

        अभ्यास कसा करावा (भाग-१)

     मित्रांनो, एखाद्या विषयावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचे असेल तर आपल्याला त्या विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक  असते. प्रत्येक विषयात असंख्य मूर्त, अमूर्त अशा वस्तू, गोष्टी असतात. त्यांचे काहीएक स्वरूप, व्याप्ती व विस्तार असतो. त्याचे काटेकोरपणे आकलन करून घेतले, दोन वस्तू, गोष्टी यातील साम्य-भेद, सीमारेषा व्यवस्थित समजून घेतल्या तर आपली त्या विषयावर पकड निर्माण  होते.

           या असंख्य  संकल्पना  स्पष्ट  करून  घेण्यासाठी, त्यांचे नियमित वाचन होणे, त्या नियमितपणे  नजरेखालून जाणे, त्यावर  विचार, चर्चा, चिंतन, मनन होणे गरजेचे असते. त्यासाठी त्या जर एकाच  संदर्भ  पुस्तकात  मिळत असतील, तर अशी  पुस्तके संग्रही ठेवून त्यांचे  अध्ययन  करायला हवे. मात्र एखाद्या विषयात असे  संदर्भग्रंथ उपलब्ध  नसतील तर आपण स्वतः एक मोठी २०० पेजेस वही घेऊन त्या वहीत सुवाच्च अक्षरांत त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करून त्यात जिथे-जिथे संज्ञा, संकल्पना स्पष्ट केलेल्या आढळतील. त्या या वहीवर लिहून घ्यायला हव्यात.

      फायदे- Read More

विवाहपूर्व समुपदेशन

मी राष्ट्रीय सेवा योजना विभागात (NSS) जून २०१२ ते ऑक्टोबर २०१८ अशी साडे सहा वर्ष कार्यक्रम अधिकारी (Program Officer) म्हणून काम केलेले आहे. या काळात महाविद्यालयाचे ६ तर एक राज्यस्तरीय व एक जिल्हास्तरीय  असे ७-७ दिवसांचे ८ श्रमदान शिबिर आयोजित करण्याची संधी मला मिळाली. आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागात ३०० विद्यार्थी असल्याने आमच्याकडे ३ कार्यक्रम अधिकारी असतात. या श्रमदान शिबिरांमध्ये व्याख्यानाच्या सत्रांमध्ये आम्ही या काळात ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करायचो. मुलांसाठी पुरुष डॉक्टर तर मुलींसाठी स्त्री डॉक्टर असे एकाच वेळी वेगवेगळे मार्गदर्शनपर सत्र आम्ही घ्यायचो. जव्हारच्या सरकारी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रामदास मराड हे अतिशय सोप्या भाषेतून मुलांच्या शंकांचे निरसन करायचे. त्यांच्यासोबत दरवर्षी वेगवेगळ्या महिला डॉक्टर असायच्या. त्या मुलींना वेगळ्या खोलीत मार्गदर्शन करायच्या. सुरुवातीला मुलं व मुली

Read More

उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना – तरुणांना आवाहन

विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षा केव्हा होतील, हे आज आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. तुमच्या परीक्षा जेव्हा होतील, तेव्हा होतील किंवा न होवोत, तुम्ही तुमचा अभ्यास थांबवता कामा नये. उलट मी असे म्हणेन की, या लॉकडाऊनच्या निवांत अशा काळामध्ये तुम्ही

Read More

नेट/सेटच्या विद्यार्थ्यांसाठी (भाग १)

नेट-सेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही परीक्षा पास होऊन प्रमाणपत्र पदरात पाडून घ्यायला हवे.

Read More

कोरोना आणि एकांत

कोरोना आणि एकांत


          मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाने सर्व जगभर थैमान घातलेले आहे. या विषाणूपासून होणाऱ्या आजारामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेले असून लाखोंना याची लागण झालेली आहे. या विषाणूवर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध सापडले नसल्याने याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला बाहेरच्या सर्वांशी प्रत्यक्ष संपर्क तोडून, सर्व कामधंदे सोडून घरात बसणे भाग आहे. अशा पद्धतीने रिकामे घरात बसणे अनेकांना असह्य होत असल्याने बरेच जण बाहेर पडणे चुकीचे आहे, हे माहित असताना देखील एखादा फेरफटका मारून येत आहेत. आज मात्र आपल्याला सक्तीचे घरात बसून राहावे लागणार आहे. एवढेच नाही तर पुढे कदाचित अनेक दिवस आपल्याला घरात बसून काढावे लागतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

          मित्रांनो, आपण सर्वच जण (आजच्या घडीला जगभरातील ४०० कोटींपेक्षा जास्त लोकं) या सक्तीच्या एकांताला

Read More

परीक्षांना सामोरे जाताना… (विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त)

दरवर्षी असंख्य विद्यार्थी विविध परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना अपयश येत असते. तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले यश मिळत नाही. याचा अर्थ त्यांना परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा फॉर्म्युला माहित नसतो, असे म्हणावे लागेल. तेव्हा या यशाचा फॉर्म्युला मी आज आपणासमोर मांडणार आहे.

जगातील कोणत्याही परीक्षेला सामोरे जायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या पुढीलप्रमाणे-

Read More