मी बीए (विद्यापीठात प्रथम क्रमांक- सुवर्णपदक), एम.ए. (विद्यापीठात प्रथम क्रमांक-सुवर्णपदक), नेट, नेट-जेआरएफ, पीएचडी, योग्य मार्गाने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणे, NSS-District level best programme officer award (पालघर जिल्हा), दोन पुस्तकांचे संपादन, प्रसिद्ध ब्लॉगर, युट्युबर हे सर्व यश ग्रामीण भागात शिक्षण व आदिवासी भागात नोकरी करत
माझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या
नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या
२०१० साली माझे लग्न झाले. हळदीच्या वेळेस मी व माझ्या घरच्यांनी भटजींना बोलावले नव्हते. तरी ते आले व न सांगता हळदीची तयारी करू लागले. आम्ही त्यांना सांगितलं की, “आम्ही दुसऱ्या
आज माझे आजोबा (आईचे वडील) आम्हाला सोडून गेले. अनंतात विलीन झाले. ९० वर्षांचे होते. त्यांना सर्वजण ‘जिभाऊ’ म्हणायचे. ते महानुभाव संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांच्यासोबत गोष्टींचा खूप मोठा खजिना गेला. एकच गोष्टीचा मी व्हिडीओ बनवून ठेवू शकलो होतो.
१५-१६ वर्षांपूर्वी एकदा मी व माझे आजोबा सुरतहून अमळनेरला रात्रीच्या रेल्वेने येत होतो. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होती. आम्ही दरवाज्याच्या बाजूला उठबस करत रात्रभर प्रवास केला. झोपणे शक्य नव्हते. माझ्या आजोबांनी रात्रभर गोष्टी सांगून लोकांचेRead More
माझे एक वैशिष्ट्य राहिलेले आहे की, मला एखाद्या गोष्टीचा जेवढा त्रास होतो किंवा कुणीतरी मला त्रास देतं, माझे जेव्हा काहीतरी नुकसान होते, माझ्यासाठी परिस्थिती प्रतिकूल बनत जाते तेव्हा मला त्या गोष्टींचा उलट खूप फायदा होतो. कारण त्या गोष्टींनी
आज माझ्या youtube channel चे १००० Subscriber झाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक, नातेवाईक मित्र-मैत्रिणींचे त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, इतिहास, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मला अभ्यासांती,
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.
इतिहास- पार्श्वभूमी-
आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.
भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासूनRead More
२००५ पर्यंत मीही धार्मिक, आध्यात्मिक लोकांच्या प्रभावाखाली होतो. स्वाध्यायात जायचो. व्रती म्हणून काम करायचो. व्रती म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन स्वाध्याय केंद्र चालविणारी व्यक्ती. स्वाध्यायात असताना धार्मिक विषयावरची अनेक पुस्तकं वाचली. नोट्स काढल्या. प्रचार-प्रसाराचे कार्य केले. एकदा ५-६ दिवसांसाठी माउंट अबूला ‘ओम शांती’ वाल्यांच्या केंद्रात राहूनही आलो होतो. माझ्याकडे तेथील फोटोही आहेत. त्या काळात मी चिकित्सा करणाऱ्या, चर्चा घडवू पाहणाऱ्या पुरोगामी विचारांच्या लोकांच्या कार्यक्रमांना प्रताप महाविद्यालयात (अमळनेर, जि. जळगाव) हाणून पाडले होते. त्यासाठी प्रसंगी आक्रमक झालो होतो. हळूहळू काही गोष्टी कळत गेल्या. त्यासाठी मला
मित्रांनो, एकाग्रता म्हणजे काय? ती कशी वाढवावी? याबद्दल मला अनेक जण विचारतात. त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, एकाच विषयावर, वस्तूवर किंवा कामावर आपले मन, चित्त, लक्ष किंवा अंतःकरण केंद्रित करण्याची किंवा स्थिर करण्याची जी क्षमता/ शक्ती असते, तिला एकाग्रता असे म्हणतात.
ही जी क्षमता असते ती काहींची अतिशय कमी असते, तर काहींची जास्त. काही जण तासनतास एकाच विषयावर, कामावर मन एकाग्र करू शकतात. तर बरेच जण काही मिनिटही करू शकत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाचे चित्रपट, क्रिकेट यावर लक्ष केंद्रित होते, पण अभ्यासावर होत नाही.
तुम्हाला जर एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर त्यामुळे आयुष्यात खूप नुकसान होते. वाचलेले, ऐकलेले समजत नाही. समजले तर लक्षात राहत नाही किंवा नंतर आठवत नाही. अभ्यासात, प्रगतीत अडथळे निर्माण होतात. योजलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.
तेव्हा ही एकाग्रता कशी वाढवायची? याचे काही उपाय किंवा मी केलेले काही प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
मित्रांनो, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यवसायाला सुरुवात करत असतो. आपल्यापैकी काही लगेच तर काही अनेक वर्ष संघर्ष करून का असेना पण नोकरी मिळवतात व इमाने-इतबारे (!) आपली नोकरी करत राहतात. आपापले काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांकडून, मित्रांकडून गाव, शहर व परिसरातील लोकांकडून अनेक गोष्टी आपण कळत-नकळतपणे शिकत असतो. अनेक खाजगी व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही कार्यशाळा, चर्चासत्रे, गट संमेलने, सभा, परिषदा या अनिवार्य केलेल्या असतात. अनिवार्य असल्यामुळे नाईलाजाने आपण त्या करून घेत असतो. आयोजकही कामकाजाचा भाग म्हणून सोपस्कार पार पाडत असतात. वैयक्तिक व्यवसाय, उद्योगधंदे करणाऱ्यांना तर आपल्या इथे अशा कार्यशाळा व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होतेच असे नाही. आपणही पुढे-पुढे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जातो. जे रूटीन आहे ते चालू ठेवतो.
शिक्षण घेत असतानाही अनेक विद्यार्थी अशा कार्यशाळा अथवा शिबिरांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांच्या आयोजनामध्येRead More
दि. १८ जुलै रोजी मला अध्यापनाच्या क्षेत्रात येऊन १२ वर्षे पूर्ण झाली. कालच्याच दिवशी २००८ साली मी जळगावच्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात रुजू झालो होतो. त्यानंतर मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ज्युनियर रिसर्च फेलो व नंतर सिनियर रिसर्च फेलो म्हणून काम केले. गेल्या साडे आठ वर्षांपासून जव्हार येथे अध्यापन करीत आहे.Read More
मी जून २००७ मध्ये एम. ए. झालो. त्याच महिन्यात २९ जून रोजी झालेली नेट परीक्षा मी (नोव्हेंबरमध्ये निकाल) उत्तीर्ण झालो. त्यानंतर जून २००८ मध्ये झालेली नेट परीक्षा मी JRF सह उत्तीर्ण झालो. नंतर मी दोन वर्ष JRF व चार महिने SRF (फेलोशिप) घेतली.
डिसेंबर २०११ च्या आधी ही परीक्षा फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपाची नव्हती. पहिला व दुसरा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असायचा तर तिसरा पेपर लिहावा लागायचा. त्यात संकल्पना, दीर्घोत्तरी प्रश्न, ४० गुणांसाठी निबंध इ. स्वरूपाचे प्रश्न विचारले जायचे व २०० गुणांच्या पेपरसाठी फक्त अडीच तास वेळ दिलेली असायची. तेव्हा कमी वेळेत अतिशय अचूक उत्तरे लिहावी लागायची. Read More
गोपाळ गणेश आगरकर यांची त्यांच्या हयातीत प्रेतयात्रा काढली होती, म. फुलेंना मारण्यासाठी रामोशी धाडले होते, तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली होती, नंतर त्यांना सदेह वैकुंठीही पाठवले, म. गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्याच झाल्यात. आंबेडकरांचा कित्येक वेळेस अपमान झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. (अशी असंख्य उदाहरणे देता येतील). किती मन दुखवले असेल या महापुरुषांनी त्या काळातील लोकांचे! त्याशिवाय बिच्चाऱ्या लोकांनी असे केले असेलका?
आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर दुसरा कुणीतरी आपल्याला कायमचा सुखी करेल, ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. सुख हे एक भ्रम आहे. तुम्ही जितके त्याच्या मागे पळाल, तितके दुःख पदरात पडेल. सुख तुमच्या आत आहे. तुमच्या मनात. ते तिथेच शोधा. तुम्हाला ते एकदाचे सापडले म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी सुखी झालात असेही नव्हे. त्याला तुम्ही चिमटीत पकडून ठेवू शकत नाही. ते निसटल्यावर तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा शोधत राहावे लागेल. पण त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.
मित्रांनो, एखाद्या विषयावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचे असेल तर आपल्याला त्या विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक विषयात असंख्य मूर्त, अमूर्त अशा वस्तू, गोष्टी असतात. त्यांचे काहीएक स्वरूप, व्याप्ती व विस्तार असतो. त्याचे काटेकोरपणे आकलन करून घेतले, दोन वस्तू, गोष्टी यातील साम्य-भेद, सीमारेषा व्यवस्थित समजून घेतल्या तर आपली त्या विषयावर पकड निर्माण होते.
या असंख्य संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी, त्यांचे नियमित वाचन होणे, त्या नियमितपणे नजरेखालून जाणे, त्यावर विचार, चर्चा, चिंतन, मनन होणे गरजेचे असते. त्यासाठी त्या जर एकाच संदर्भ पुस्तकात मिळत असतील, तर अशी पुस्तके संग्रही ठेवून त्यांचे अध्ययन करायला हवे. मात्र एखाद्या विषयात असे संदर्भग्रंथ उपलब्ध नसतील तर आपण स्वतः एक मोठी २०० पेजेस वही घेऊन त्या वहीत सुवाच्च अक्षरांत त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करून त्यात जिथे-जिथे संज्ञा, संकल्पना स्पष्ट केलेल्या आढळतील. त्या या वहीवर लिहून घ्यायला हव्यात.
वाचन करणाऱ्यांबद्दल बऱ्याचदा लोकं असं म्हणत असतात की, “तो ना, तो नेहमी पुस्तकातच डोकं घालून बसलेला असतो. काय असतं एवढं पुस्तकात, कुणास ठाऊक!”
खरंच, काय असतं पुस्तकात एवढं? काय असतं?
मित्रांनो, पुस्तकात भूत, भविष्य, वर्तमान असतं. काळाचा एक विस्तीर्ण व व्यापक असा पट पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा राहतो. पुस्तकांमध्ये विविध स्वभावाची, विविध प्रवृत्तीची माणसं आपल्याला भेटतात. तशी ती आपल्या भोवती असतातच. पण पुस्तकांमधून अशी असंख्य माणसं त्यांच्या स्वभावधर्मासकट आतून-बाहेरून ती जशी आहेत, अगदी तशीच आपल्यासमोर प्रकट होतात. त्यापैकी काही वर्तमानातील असतात, तर काही भूतकाळातील. काही काल्पनिक असतात, तर काही Read More
मी राष्ट्रीय सेवा योजना विभागात (NSS) जून २०१२ तेऑक्टोबर २०१८ अशी साडे सहा वर्ष कार्यक्रम अधिकारी (Program Officer) म्हणून काम केलेले आहे. या काळात महाविद्यालयाचे ६ तर एक राज्यस्तरीय व एक जिल्हास्तरीय असे ७-७ दिवसांचे ८ श्रमदान शिबिर आयोजित करण्याची संधी मला मिळाली. आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागात ३०० विद्यार्थी असल्याने आमच्याकडे ३ कार्यक्रम अधिकारी असतात. या श्रमदान शिबिरांमध्ये व्याख्यानाच्या सत्रांमध्ये आम्ही या काळात ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करायचो. मुलांसाठी पुरुष डॉक्टर तर मुलींसाठी स्त्री डॉक्टर असे एकाच वेळी वेगवेगळे मार्गदर्शनपर सत्र आम्ही घ्यायचो. जव्हारच्या सरकारी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रामदास मराड हे अतिशय सोप्या भाषेतून मुलांच्या शंकांचे निरसन करायचे. त्यांच्यासोबत दरवर्षी वेगवेगळ्या महिला डॉक्टर असायच्या. त्या मुलींना वेगळ्या खोलीत मार्गदर्शन करायच्या. सुरुवातीला मुलं व मुली
बहुजन समाजात जन्माला आलो. बहुजन समाजात लहानाचा मोठा झालो. प्रचंड कष्ट करून जिद्दीने चांगले उच्च शिक्षण घेतले. पीएचडी पदवीसाठी संशोधन करतानाही मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्यांचा अभ्यास करून काहीएक प्रमाणात ग्रामीणांच्या म्हणजेच बहुजनांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला. (जो आजही चालू आहे व पुढेही चालू राहणार.) बहुजन समाजाच्या जगण्यात विधायक व सकारात्मक बदल घडवून आणणार्या विचारधारा व संत, महापुरुषांच्या विचारांशी संवादी राहून आतापर्यंत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत राहिलो. बहुजन समाजाच्या सर्व क्षेत्रातील मागासलेपणाची कारणे वेगळी शोधण्याची आवश्यकता भासली नाही. कारण आपले
आपल्याकडील शिक्षण क्षेत्राकडे सहज नजर टाकली तर आपल्याला जिल्हापरिषदेच्या शाळा सोडल्या तर जिकडेतिकडे माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये ही खाजगी संस्थांचालकांचीच दिसून येतात. याव्यतिरिक्त अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या केजी, नर्सरीपासूनच्या खाजगी शाळांचेही जणू पेव फुटलेले आहे.
या संस्थांमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित, तासिका तत्त्वावर वर्षानुवर्षे काम करणारे असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या शिक्षकांना, प्राध्यापकांना २०००, ५०००, १०००० किंवा अपवादात्मक ठिकाणी या पेक्षा थोडे जास्त मासिक वेतन दिले जाते. त्यात परत मे महिन्यात ब्रेक दिला जातो. म्हणजे त्या महिन्याचे वेतन दिले जात नाही. काही ठिकाणी तर सहा महिन्यांमधून, वर्षातून एकदा थोडेफार ‘मानधन’ दिले जाते. त्यांच्याकडून त्या-त्या शैक्षणिक संस्थेत वाट्टेल ते काम करून घेतले जाते. अनेकदा त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर राजकीय कामांसाठीही वापर करून घेतला जातो. शाळा-महाविद्यालय अनुदानित असेल तर आपण एक ना एक दिवस पर्मनंट होऊ, या आशेने हे बिच्चारे कोणतेही काम टाळत नाहीत. आपल्यावर वरिष्ठांची, पदाधिकाऱ्यांची, संस्थाचालकांची खप्पा मर्जी होऊ नये, म्हणून ते अतिशय काळजी घेतात.
आजूबाजूची परिस्थिती बघितल्यावर आपल्यासारख्याच कित्येक वर्ष काम करणार्यांना वगळून पर्मनंट जागेसाठी ऐनवेळेस दुसऱ्याला घेतले गेले हे ऐकल्यावर, प्रत्यक्ष पाहिल्यावर यांच्यात नैराश्य येत जाते. त्यांच्या मनातही भीती, असुरक्षितता निर्माण होत जाते. त्यापैकी अनेकांचे लग्न झालेले असते. अनेक जण गरिबीच्या परिस्थितीतून आलेले असतात. कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी असते. कर्जबाजारी असतात. आज ना उद्या आपल्या कष्टाचे, प्रामाणिकपणाचे, आपण संस्थेसाठी केलेल्या कामाचे चीजRead More
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या चांगल्या संपर्कातील एक व्यक्ती मला बऱ्याचदा अमुक तमुक बाबांबद्दलचे मेसेज पाठवायची. ती व्यक्ती आरक्षण घेऊन नोकरीला लागलेली होती. त्या व्यक्तीच्या घरात अनेक जण नोकरीला होते. त्या व्यक्तीला मी हक्काने बोलू शकत असल्याने एकदा मी त्या व्यक्तीला विचारले की,
“तुला नोकरी या बाबांमुळे मिळाली की दुसऱ्या कुणामुळे? तुझे जीवनमान कुणामुळे सुधारले? तुझी, तुझ्या कुटुंबाची एवढी प्रगती कुणामुळे घडून आली?”
मग ती व्यक्ती मला गंमतीने म्हणाली की, “मला माहित होतं की तू असे मेसेज पाठविल्याने उत्तर देशील.”
मी म्हटलं, ” विषयानंतर करू नको. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे”.
‘कोसला’ ही मराठीतील एक श्रेष्ठ दर्जाची कादंबरी. १९६३ साली भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ती लिहिली. ‘कोसला’चा समकालीन व नंतरच्या पिढीवर खूप मोठा प्रभाव पडला.
‘कोसला’ प्रत्यक्ष ऐकणे हा एक ग्रेट अनुभव आहे. मी एम. ए. करत असताना ‘कोसला’चे अभिवाचन आकाशवाणीवर प्रसारित होत होते. त्यावेळी मी मित्राचा छोटा रेडिओ मिळवून तो कॉलेजमध्ये न्यायचो. कारण कॉलेजची वेळ व ‘कोसला’च्या प्रसारणाची वेळ ही एकच
दि. १२ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या दरम्यान मुर्टी, ता. बारामती येथे चित्रपट निर्मिती कार्यशाळेत (निवासी) सहभागी झालो होतो. अक्षर मानव या संघटनेनेnही कार्यशाळा आयोजित केली होती. ७ दिवसांच्या कार्यशाळेसाठी सहभागी व्यक्तींकडून १०,०००/- रु. शुल्क घेण्यात आले होते. तर अक्षर मानव संघटनेच्या आजीव सदस्यांना ३०००/- सूट देण्यात आली होती.
चित्रपट या माध्यमाविषयी समज निर्माण व्हावी, पटकथा, चित्रिकरण, संपादन, दिग्दर्शन, गीतरचना इ. इ. गोष्टींची, विविध तंत्रांची माहिती व्हावी व माझ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काही संधी मिळू शकते का? याचा शोध घ्यावा, या उद्देशाने मी या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. या कार्यशाळेतRead More