राघववेळ (कादंबरी)- नामदेव कांबळे (थोडक्यात परिचय)

         ‘राघववेळ’ ही नामदेव कांबळे यांची पहिलीच कादंबरी. त्यांच्या या पहिल्याच साहित्यकृतीला १९९५ सालचे साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. या कादंबरीचे पुढे बंगाली भाषेत अनुवाद झालेला आहे. तर त्या अनुवादित कादंबरीलाही साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

         मांग समाजातील वालंबी व राघू या मायलेकांच्या संघर्षाची, कौशीच्या संसाराची कथा या कादंबरीत आलेली आहे. राघूचा समंजसपणा, शिक्षणासाठी त्याची चाललेली धडपड, त्याचा स्वाभिमानी स्वभाव, उंच Read More

रुबाब भाबी : काही आठवणी व इतर अनुभव

माझे आईवडील मुंबईत कांदिवलीतील लक्ष्मीनगर नावाच्या एका झोपडपट्टीत राहायचे. (माझे वडील तिथे ३५ वर्षे राहिले.) निसार माझ्याहून १३ दिवसांनी मोठा. मी लहान असताना त्याची आई रुबाब भाभी आमच्या दोघांची आंघोळ घालून द्यायची. तेलाने मस्त मालिश करून द्यायची. रुबाब भाबीचे सासरे माझ्या आई वडिलांना मुलामुलीसारखे मानायचे. त्यांची तिथे खूप जमीन होती. त्यापैकी एखाद दोन प्लॉट ते माझ्या

Read More

आर्थिक निकषावर आरक्षण : आक्षेप-


१) किती लोकं स्वत: ची खरी संपत्ती प्रामाणिकपणे जाहीर करतात?
२) कर भरणा-यांपेक्षा कर लपविणारे जास्त का आहेत?
३) अनेक जण त्यांच्याकडे भरपूर शेती असूनही ती कुटुंबातील अनेकांच्या नावावर करून स्वत: अल्पभुधारक असल्याचे दाखवितात.

Read More

अफू

लोकांना देवा-धर्माची एवढी अफू चारली गेलेली आहे आणि अलिकडे तिचे प्रमाण एवढे वाढविले जात आहे की, देवा-धर्माशिवाय आपलं काही खरं नाही, आपल्या आयुष्यातील संकटांवर आपण मात करू

Read More

हुस्न कि मलिका

तेरे हुस्न पे क्या लिखू
लब्ज डगमगा रहे हैं
तेरी हँसी सून के बागो में
कलियाँ खिल रही हैं.


चाँदसा मुखडा और
उसपे लहराते बाल
एे हुस्न की मलिका
तु है सच में कमाल.

Read More

कोऱ्या पानांपासून वह्या

आपण काय करू शकतो? – आम्ही दरवर्षी को-या कागदांपासून जवळपास ४०० पेक्षा जास्त वह्या शिवून त्या NSS साठी दत्तक घेतलेल्या गावातील शाळेत वाटत असतो. कोरी पानं कुठून उपलब्ध होतात? तर आपल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये जवळपास प्रत्येक विषयाचे प्रकल्प व इतर कामाच्या हजारो वह्या जमा झालेल्या असतात. ज्या एक किंवा दोन वर्षांनी रद्दी म्हणून विकल्या

Read More

श्रद्धा-अंधश्रद्धा

मंदिर डोंगराएवढं उंच असलं काय किंवा गुडघ्याएवढं असलं काय, भक्ती व श्रद्धेत काहीच फरक पडत नाही. तसंच दोन मिनिटे डोळे बंद करून देवाचे नाव घेतले काय किंवा सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत नाव घेत

Read More

आत्ता (कविता)- नामदेव ढसाळ

नामदेव ढसाळ हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव आहे. त्यांनी मराठी कवितेमध्ये मोलाची भर घातलेली आहे. अस्पृश्यांचे दारिद्र्य, दैन्य, शोषण, त्यांच्यातील जाणीव-जागृती, विद्रोह, नवसमाजाच्या निर्मितीसाठीचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या सर्वच कवितांमधून मांडलेले दिसून येते. 
नामदेव ढसाळ यांची ‘आत्ता’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी लावलेल्या ‘काव्यबंध’ या कसितासंग्रहात समाविष्ट आहे. ती अशी-

Read More

कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर

कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर

(‘गिरणांगण’ या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वार्षिकांकात वर्ष २००९-२०१० मध्ये प्रकाशित झालेला लेख)

मराठी साहित्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखनाने वैश्विक पातळीवर नेणाऱ्या आणि मराठीला तिसरे मानाचे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणाऱ्या विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे दि. १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. अवघ्या महाराष्ट्राने हे अटळ दुःख ‘माझ्या मन बन दगड…’ असे म्हणून सहन केले. त्यांच्या निधनाने मराठी काव्य क्षेत्रातील / साहित्यक्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला.

 

विंदांनी कविता, बालकविता या प्रकारांव्यतिरिक्त लघुनिबंध, समीक्षा, अनुवाद या प्रकारांतही लेखन करून मोलाची भर घातली. आपल्या ‘बहुपेडी’ व्यक्तिमत्वाने त्यांनी या साहित्यप्रकारांवर अमीट ठसा उमटविला. मात्र कवी म्हणूनच त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या आशयातील विविधता, नाविण्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा चेहरा – मोहरा बदलून टाकला. बालकवितांच्या माध्यमातून ते अवघ्या महाराष्ट्राच्या मुलांचे ‘आजोबा’ बनले. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना ‘संन्यासी कवी’, ‘ध्रुवताऱ्यासारखा अढळ प्रकाश देणारा’, ‘मराठी Read More

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यांना माझे उत्तर…

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे व त्यांच्या नावाच्या आधी कित्येक उपाध्या लावणारे व इतरांनाही

Read More

ग्रामीण साहित्याचे स्वरूप

ग्रामीण साहित्याचे स्वरूप

        माझ्या ब्लॉगवरील या आधीच्या ‘ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा’ या लेखामध्ये ग्रामीण साहित्याच्या विविध प्रेरणांचे विवेचन केलेले आहे, त्या प्रेरणांमधून ग्रामीण साहित्य निर्माण झालेले आहे. ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाचा विचार करता, कालखंडानुसार ग्रामीण साहित्याच्या स्वरूपात फरक दिसून येतो. 

        १९२० च्या आधीच्या ग्रामीण साहित्यावर आपल्याला महात्मा फुले व त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव दिसून येतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे वैचारिक ग्रंथ व ‘अखंडा’मधून (कविता) ग्रामीण भागातील शेतकरी व इतर शूद्र वर्गाच्या शोषणाची मीमांसा केली. खेड्यापाड्यातील काबाडकष्ट करणाऱ्या Read More

आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन

आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन

 

प्रस्तावना-

          भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असा देश आहे. भारतात आजही काही मोजक्या भाषांमधूनच लेखन केले जाते. तर १६०० पेक्षा जास्त बोली या फक्त बोलल्या जातात. म्हणजे त्या लिपीबद्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्यात लिखित साहित्य हे खूप कमी आहे किंवा जे आहे ते अगदी अलीकडे म्हणजे २५-३० वर्षांत या समूहातील नवशिक्षित वर्गाकडून लिहिले गेलेले आहे. परंतु आज त्या बोलींमध्ये जे मौखिक साहित्य उपलब्ध होते ते अतिशय मुबलक असे आहे. हे मौखिक साहित्य नेमके केव्हा निर्माण झाले हे आज कुणीही सांगू शकत नाही. परंतु पिढ्यानपिढ्यांपासून ते चालत आलेले आहे. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत.

          महाराष्ट्रातील आधीच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका आहे. या तालुक्यात ‘क’ ठाकूर, ‘म’ ठाकूर, Read More

ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा

          कोणत्याही प्रकारच्या साहित्याच्या निर्मितीमागे काही ना काही प्रेरणा या असतातच. त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही. मम्मटाने सांगितलेल्या प्रेरणा आपल्याला सर्वांनाच माहित आहेत. तशाच ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागेही काही प्रेरणा आहेत. त्या पुढील प्रमाणे –

१) ‘ग्रामीणते’चा शोध घेणे –

          ग्रामीण साहित्याचे वेगळेपण हे त्याच्या ‘ग्रामीणते’त आहे. ग्रामीणतेची ही जी जाणीव आहे, तिचा शोध घेणे व ती व्यक्त करणे ही ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागील एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रचार प्रसारामुळे  शिकलेली पहिली पिढी निर्माण झाली.  या पिढीच्या असे लक्षात आले की, आतापर्यंत ग्रामीण म्हणून जे साहित्य लिहिले गेलेले आहे किंवा एकूणच जे मराठी साहित्य आहे, यात ग्रामीण भागाचे, तेथील लोकांच्या जगण्याचे त्यांच्या सुख-दुखांचे वास्तव चित्रण आलेले नाही. ग्रामीण Read More

घरभाडे करारपत्राचा नमुना

(मी माझ्या लग्नानंतर आतापर्यंत जव्हार, जळगाव व नाशिकला मिळून ९ भाड्याच्या घरांमध्ये राहिलो. त्यापैकी जव्हार व नाशिकला मी हा नमुना वापरला. जो मला माझ्या एका ज्येष्ठ सहकार्‍यांकडून मिळालेला होता. सरकारी करारनाम्यांमध्ये प्रमाण लेखनाच्या किती चुका असतात, हे आपणास ठाऊक आहे. यात मी त्या दुरुस्त केलेल्या आहेत. हा नमुना सर्वांसाठी इथे देत आहे.)

 

लिव्ह अँड लायसेन्स करारनामा

(अकरा महिन्याच्या तत्वावर)

लिव्ह ऍन्ड लायसेन्स करारनामा आज दि………………… रोजी, ………………… या दिवशी नाशिक मुक्कामी लिहून देतो की,

श्री. घर मालकाचे नाव,

वय वर्षे ………….., धंदा-………….,                                                                          लिहून घेणार

भाड्याने द्यायच्या घराचा पत्ता                                                                             (लायसेन्सॉर)

…………………………………………….

……………………………………………

यांसी

श्री. भाडेकरुचे नाव,

उ. व. 34, धंदा – नोकरी,                                                                            लिहून देणार

भाडेकरुचा पत्ता                                                                                        (लायसेन्सी)

……………………………………………..

…………………………………………….

 

कारणे लिव्ह अँड लायसेन्स करारनामा लिहून देतो ऐसा जे की:

1) मिळकतीचे वर्णन :

……………………………………………………………………………………………….... सदर मिळकतीमधील लाईट व नळ कनेक्शनसह.

 

2) वर कलम 1 मध्ये वर्णन केलेली मिळकत ही तुमच्या नावे व मालकीची असून ती तुम्ही मला 11 महिन्यांसाठी राहण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स करारनाम्याने द्यावी, अशी मी तुम्हास विनंती केल्याने व माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही मला सदर मिळकत खालील अटी व शर्तीवर देत आहात.

 

अटी व शर्ती:

Read More

‘आदिवासी समाजाची सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानासाठी मी काढलेल्या नोट्स

          ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.

            इतिहास- पार्श्वभूमी-

            आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.

          भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More

Few words for students

खूप-खूप अभ्यास कर,
मोठा हो. आत्मविश्वासाने
स्वाभिमानी जीवनाची
पायाभरणी कर.

कठोर ज्ञानसाधना कर,
ज्ञानवंत, बुद्धिवंत हो!

संकटांतून तावून-सुलाखून निघशील Read More

मी कसा बदलत गेलो?

२००५ पर्यंत मीही धार्मिक, आध्यात्मिक लोकांच्या प्रभावाखाली होतो. स्वाध्यायात जायचो. व्रती म्हणून काम करायचो. व्रती म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन स्वाध्याय केंद्र चालविणारी व्यक्ती. स्वाध्यायात असताना धार्मिक विषयावरची अनेक पुस्तकं वाचली. नोट्स काढल्या. प्रचार-प्रसाराचे कार्य केले. एकदा ५-६ दिवसांसाठी माउंट अबूला ‘ओम शांती’ वाल्यांच्या केंद्रात राहूनही आलो होतो. माझ्याकडे तेथील फोटोही आहेत. त्या काळात मी चिकित्सा करणाऱ्या, चर्चा घडवू पाहणाऱ्या पुरोगामी विचारांच्या लोकांच्या कार्यक्रमांना प्रताप महाविद्यालयात (अमळनेर, जि. जळगाव) हाणून पाडले होते. त्यासाठी प्रसंगी आक्रमक झालो होतो. हळूहळू काही गोष्टी कळत गेल्या. त्यासाठी मला

Read More

‘डोह’ कथेचा परिचय

डोह

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

काम ही मानवी जीवनातील अतिशय प्रबळ अशी प्रेरणा आहे. तिच्यावर मानवी मनाचे नियंत्रण राहिले तर ठीक. अन्यथा तिने मानवी मन, मेंदू व शरीराचा ताबा घेतला तर ती माणसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ‘डोह’ ही कथा याच आशयसूत्रावर आधारलेली आहे.

‘डोह’ या कथेत मदारी हे एकमेव महत्त्वाचे पात्र आहे. त्याची आई, अम्मा, पुढे जिचे निधन झालेले आहे अशी एक सुंदर स्त्री या दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा असून त्या गौण आहेत. या कथेतील मदारी हा नाग व नागिणीचा खेळ दाखवून त्याचा व त्याच्या अम्माचा उदरनिर्वाह भागवतो. तो अतिशय आडदांड व राकट शरीराचा तरुण आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन हा खेळ दाखवायचा. पुंगी वाजवून तो नाग व नागिनीचे मैथुन घडवून आणायचा. लोकं व तो स्वतः ते मैथुन बघायचे. ते मैथुन बघून त्याची वासनेची अतृप्त व सूप्त भूक उफाळून यायची. परंतु तिचा निचरा करणे शक्य नसल्याने तो ती दडपून टाकायचा. नुकत्याच मैथुन क्रीडा संपवलेल्या नागाचा वास त्याच्या देहातील सुप्त वासनेवर जाऊन आदळला की, त्याच्या संवेदना सळसळू लागायच्या. नागाच्या डोळ्यात त्याला पौरुषत्व जाणवायचे.

Read More

‘झूल’ या कथेचा परिचय

झूल

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘झूल’ ही कथा भाऊराव मास्तरसारखी काही स्वार्थी व बेरकी लोकं ग्रामीण भागातील अडाणी, धार्मिक, देवभोळ्या लोकांच्या मानसिकतेचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेतात, यावर आधारलेली आहे.

या कथेत गौतमबुवा म्हणून एक व्यक्तिरेखा आहे. गौतमबुवाला लग्नाच्या आधीपासून देवधर्माचे वेड होते. तो फक्त जेवायला घरी यायचा. दिवस उगवला की गावाच्या बाजूला असलेल्या नागझिरीच्या टेकडीवर जाऊन मारुतीच्या देवळासमोर जाऊन दिवसभर बसून राहायचा. लग्नाआधी तो आठ-आठ दिवस घरी यायचा नाही. शेवटी त्याला संसारात/ ऐहिक जीवनात रमविण्यासाठी त्याचे आई-वडील त्याचे लग्न लावून देतात. पण तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही. लग्नाला तीन वर्षे होतात तरीही तो बायकोला कोणतेही सुख देत नाही. दिवसभर मंदिरासमोर बसून राहतो. रात्री घरी आल्यावर जेवून शांतपणे झोपून जातो. ती कधी त्याच्या जवळ आली व त्याला झोपेतून जागे केले तर थंडपणे स्वतः ला तिच्यापासून सोडवून घेतो. पुढे तो दाढी-मिशा वाढवतो. भगवे कपडे घालू लागतो. पायात वाहना न वापरता अनवाणी पायांनी हिंडू लागतो. लोक त्याला गौतमबुवा म्हणू लागतात. तो देखील निस्वार्थीपणाने लोकांचे पडेल ते काम करू लागतो. दरवर्षी पायी पंढरपूरला जात राहतो. त्याला संसारात रस नसतोच. कुठल्याही बंधनात त्याला अडकायचे नसते.

Read More

‘एक हिरवे पान’ या कथेचा परिचय

एक हिरवे पान

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘एक हिरवे पान’ ही कथा प्रत्येक माणसाला जगताना कुणाच्यातरी आधाराची गरज असते, या विषयावर आधारलेली आहे. या कथेमध्ये दुल्लू मियाँ, बिसमिल्ला, वैदा या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या तिघांचेही वैवाहिक जीवन या ना त्या कारणाने उद्ध्वस्त झालेले असल्याने ते कुणाचा ना कुणाचा आधार शोधत राहतात.

दुल्लू हा साधारणतः पन्नाशीच्या पुढचा व्यक्ती आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्याला वैदा नावाची एक मुलगी आहे. ती लग्नाच्या वयाची आहे. त्याची आई लालबी ही खूप म्हातारी असते. मुलीचे लग्न व आईचे निधन झाल्यावर आपल्यासोबत कोण राहणार?, आपल्याला कुणाचा आधार उरणार? याची चिंता त्याला सतावत राहते. आपल्याला म्हातारपणात कुणाची तरी साथ राहावी, म्हणून तो बिसमिल्ला नावाच्या मुलीशी लग्न करून घेतो. ती त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असते. तिला आई-वडील नव्हते. तिचे लग्न झालेले असते. पण नवऱ्याचे निधन झाल्यानंतर तिचे सासू-सासरे तिला घरातून बाहेर काढतात. तेव्हा दुल्लू तिच्याशी पाट लावून घेतो व तिला आश्रय देतो. त्यांच्या लग्नाला सहा महिने होत नाहीत, तेवढ्यात ती एका मुलीला जन्म देते. दुल्लूला हे माहित असते की, ती मुलगी आपल्यापासून झालेली नाहीये. तरीही तो बिसमिल्लाला एक शब्दही बोलत नाही. उलट बाळंतपणात तिची खूप काळजी घेतो. तिचे सर्व आवरतो. तिच्यासाठी मेव्याचे लाडू बांधतो व दररोज स्वतः तिला एक-एक लाडू खाऊ घालतो. दोन महिने तिला पाण्यात हातही घालू देत नाही.

Read More

‘चुंभळ’ कथेचा परिचय

चुंभळ

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘चुंभळ’ ही कथा भिकी नावाच्या एका मांग जातीच्या विधवा स्त्रीची आपल्या मुलांची काळजी व त्यांच्याकडूनची अपेक्षा व शेवटी तिचा होणारा अपेक्षाभंग यावर आधारलेली आहे.

भिकी ही मांगवाड्यात राहणारी एक विधवा स्त्री आहे. तिला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव वच्छी व मुलाचे नाव कोसा असे आहे. वच्छी ही लग्नाच्या वयाची असून कोसा हा साधारणतः १५-१६ वर्षांचा असावा. तिच्या नवर्‍याचे नाव बिसन असे होते. तो लग्नसराईत वाजंत्री वाजवायला जायचा. त्याला सैनी हे वाद्य खूप सुंदर वाजता यायचे, हे भिकीच्या बिसनविषयीच्या आठवणींमधून आपल्या लक्षात येते. याव्यतिरिक्त तो म्हशी भादरायचे काम करायचा. हेच काम करताना पाटलाच्या म्हशीने पोटात शिंग खूपसल्यामुळे त्याचा मृत्यू घडून आलेला होता. एकदा तो पाटलाच्या म्हशी भादरायला गेलेला होता. म्हशी भादरत असताना एका म्हशीच्या मानेजवळ वस्तरा लागून ती जखमी होते. जखमेतून रक्त येऊ लागते. त्यामुळे म्हैस बिथरते व दावं तोडून शिंग उगारून बिसनवर धावून जाते. म्हशीला बिथरलेलं बघून पाटलाची माणसं पळून जातात. बिसनही पळून जाण्याच्या बेतात असतो. पण तो भिंतीवर आढळतो. म्हैस त्याला शिंगावर उचलून पुन्हा एकदा भिंतीवर फेकते. म्हशीचे एक शिंग त्याच्या पोटात घुसते आणि तिने त्याच्या छातीवर पाय ठेवल्याने त्याच्या छातीच्या बरगड्या मोडतात. त्याच्या पोटातला कोथळा बाहेर निघतो. त्यातच तो मरण पावतो.

Read More

एकाग्रता कशी वाढवावी?

              मित्रांनो, एकाग्रता म्हणजे काय? ती कशी वाढवावी? याबद्दल मला अनेक जण विचारतात. त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो, एकाच विषयावर, वस्तूवर किंवा कामावर आपले मन, चित्त, लक्ष किंवा अंतःकरण केंद्रित करण्याची किंवा स्थिर करण्याची जी क्षमता/ शक्ती असते, तिला एकाग्रता असे म्हणतात.

             ही जी क्षमता असते ती काहींची अतिशय कमी असते, तर काहींची जास्त. काही जण तासनतास एकाच विषयावर, कामावर मन एकाग्र करू शकतात. तर बरेच जण काही मिनिटही करू शकत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाचे चित्रपट, क्रिकेट यावर लक्ष केंद्रित होते, पण अभ्यासावर होत नाही.  

            तुम्हाला जर एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर त्यामुळे आयुष्यात खूप नुकसान होते. वाचलेले, ऐकलेले समजत नाही. समजले तर लक्षात राहत नाही किंवा नंतर आठवत नाही. अभ्यासात, प्रगतीत अडथळे निर्माण होतात. योजलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.

               तेव्हा ही एकाग्रता कशी वाढवायची? याचे काही उपाय किंवा मी केलेले काही प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. 

Read More

अभ्यास किती वेळ करावा?

मित्रांनो, मी वर्गात अनेकदा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो असतो की, तुम्ही किती वेळ अभ्यास करतात? विद्यार्थी बऱ्याचदा स्वतःहून काहीच उत्तर देत नाहीत. मग मी स्वतःहून विचारतो की, दररोज न चुकता दिवसातून ३ तास किती जण अभ्यास करतात? कोणीच हात वर करत नाही. मग मी २ तास, १ तास, अर्धा तास, १५ मिनिटे, एक मिनिट असं मुलांना विचारत जातो. माझ्या अनेकदा असे लक्षात आलेले आहे की, अनेक मुलं दिवसात एक मिनिटही अभ्यास करत नाहीत. अशी मुलं PSI/ STI यासारख्या परीक्षांमध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. PSI/ STI कशाला परंतु साधे पोलीस, तलाठीही होऊ शकत नाहीत. कारण आज प्रत्येक परीक्षांमध्ये स्पर्धां एवढी वाढलेली आहे की, आपल्याला दररोज न चुकता किमान ५-६ तास अभ्यास Read More

लहान मुलांचा भाषिक विकास कसा साधाल?

         भाषा हे ज्ञान मिळविण्याचे, आत्मसात करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. त्यामुळे लहान मुलांच्या भाषाविकासाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.

एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणे, म्हणजे ती भाषा तिच्या सर्व अंगभूत सामर्थ्यासह बोलता, लिहिता व वाचता येणे होय.

Read More

‘गणपति’ का मतलब

दोस्तों, इस लेख के माध्यम से मै आपको गणपति का सही अर्थ बता रहा हूँ. मै सबके धार्मिक भावनाओ का सन्मान करता हुँ. लेकिन एक अभ्यासक के नाते अनुसंधान से जो सच सामने आता है, उसे बताना भी जरूरी होता है. इसलिए मै ये कहे रहा हुँ.

  गणपति वर्तमान राष्ट्रपति और सभापति के जैसा

Read More

शिवजयंतीनिमित्त

          प्रिय मित्रांनो, 
       येत्या १९ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्रातील पहिले पराक्रमी व कर्तबगार महापुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती आपण सर्वजण उत्साहात साजरी करणार आहोत. या दिवशी आपण मोटरसायकलला झेंडा लावून रॅल्या काढतो,

Read More

माझे मत वाया गेले!

 

भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की,

Read More

‘गणपती’चे वास्तव

 गणपती हे आताचे राष्ट्रपती, सभापती यांसारखेच एक पद होते. ती व्यक्ती नव्हती. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा प्रमुख. सभापती म्हणजे सभेचा प्रमुख. त्याचप्रमाणे गणपती म्हणजे गणांचा प्रमुख. समुहाचा, समुदायाचा प्रमुख.
 
         ‘गण’ म्हणजे लाेकं, समुह, समुदाय (अनेकनचनी रूप). शब्दकोशांमध्ये तपासून पहा, ‘गण’ या शब्दाचा हाच अर्थ दिलेला आहे. तर पती म्हणजे प्रमुख (नवरा नव्हे).  

Read More

जागतिक आदिवासी दिन : पार्श्वभूमी, महत्त्व व थोडं चिंतन…

नमस्कार मित्रांनो,

             सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या आभाळभर मन:पूर्वक शुभेच्छा!

          आजचा हा दिवस संपूर्ण जगात खूपच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात नोकरी करतो. या ठिकाणी ९ ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये जव्हार शहरात जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा, गौरी, ढोल व इतर नृत्य सादर करतात. अतिशय आनंदाचा व उत्साहाचा हा दिवस असतो. आजच्या दिवशी आदिवासी बांधव धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या आदिवासी समाजाशी संबंधित त्या त्या ठिकाणच्या देवदेवतांच्या पूजा-अर्चा करतात.

          असे असले तरी, Read More

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिबिरे आणि कार्यशाळांचे महत्त्व (शिक्षक, पालक, विद्यार्थी व सर्वांसाठी उपयुक्त…)

              मित्रांनो, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यवसायाला सुरुवात करत असतो. आपल्यापैकी काही लगेच तर काही अनेक वर्ष संघर्ष करून का असेना पण नोकरी मिळवतात व इमाने-इतबारे (!) आपली नोकरी करत राहतात. आपापले काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांकडून, मित्रांकडून गाव, शहर व परिसरातील लोकांकडून अनेक गोष्टी आपण कळत-नकळतपणे शिकत असतो. अनेक खाजगी व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही कार्यशाळा, चर्चासत्रे, गट संमेलने, सभा, परिषदा या अनिवार्य केलेल्या असतात. अनिवार्य असल्यामुळे नाईलाजाने आपण त्या करून घेत असतो. आयोजकही कामकाजाचा भाग म्हणून सोपस्कार पार पाडत असतात. वैयक्तिक व्यवसाय, उद्योगधंदे करणाऱ्यांना तर आपल्या इथे अशा कार्यशाळा व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होतेच असे नाही. आपणही पुढे-पुढे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जातो. जे रूटीन आहे ते चालू ठेवतो.

           शिक्षण घेत असतानाही अनेक विद्यार्थी अशा कार्यशाळा अथवा शिबिरांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांच्या आयोजनामध्ये Read More

काय वाचावे?

बरेच जण म्हणतात की, वाचन करणे चांगले असते. वाचनाचे अमुक-तमुक फायदे असतात. बरोबरच आहे. वाचनाचे खरंच खूप फायदे आहेत. परंतु, त्याच्यासोबत काय वाचायचे, कोणती पुस्तके वाचायची हेही कळायला पाहिजे. आमच्या ‘साहित्य आणि समाज’ या TYBA च्या विषयाच्या एका पुस्तकात ‘हजारो वर्षे समाजाचे मन एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात असते’, असे एक वाक्य आहे. अगदी खरं आहे ते. कारण बहुतांश

Read More

नवीन शैक्षणिक धोरण

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर वाचा, ऐका. कारण हे तुमच्या व तुमच्या पुढील पिढ्यांच्या तसेच देशाच्या भवितव्याशी निगडित आहे. सरकार हे धोरण इतक्या घाईत आणण्याचा प्रयत्न करत आहे की,

Read More