शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदलाची गरज आहे.
१) सर्वांना सर्व प्रकारचे गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण २) शिक्षक व प्राध्यापकांच्या १०० टक्के रिक्त जागा भरती.
३) शिक्षक व प्राध्यापकांची डोनेशन व वशिलामुक्त
भरती प्रक्रिया.
४) शिक्षणावर ६% खर्च.
५) सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये पक्की इमारत, ग्रंथालय, शौचालये इत्यादी प्राथमिक सोयी सुविधांची उपलब्धता.
६) शिक्षकांना कोणतेही शिक्षणबाह्य कामे देता कामा नयेत.
७) शिक्षकांवर कोणताही राजकीय दबाव असता कामा नये.
८) शिक्षणात, अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश.
९) शिक्षणक्षेत्रात धर्मांधता, कट्टरता, अंधश्रद्धा, कर्मकांडे पसरवणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, अधिकारी, राजकीय व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद.
- डॉ. राहुल पाटील
शंभर टक्के प्राध्यापक पद भरणे गरजेचे आहे