सनातन्यांची कारस्थाने

           नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या

Read More

हिंदू धर्म: विचार करण्याजोगे काही प्रश्न

                                 विचार करण्याजाेगे प्रश्न

१) हिंदू धर्म भारत व नेपाळ या मोजक्या देशांबाहेर का वाढू शकला नाही?

२) हिंदू धर्मातून जैन, बौद्ध, शिख, लिंगायत हे धर्म

Read More

माझ्या हळदीचा कार्यक्रम

          २०१० साली माझे लग्न झाले. हळदीच्या वेळेस मी व माझ्या घरच्यांनी भटजींना बोलावले नव्हते. तरी ते आले व न सांगता हळदीची तयारी करू लागले. आम्ही त्यांना सांगितलं की, “आम्ही दुसऱ्या

Read More

माझ्या महाविद्यालयाचा मराठी विभागाचा अहवाल (२०२१-२२)

मराठी विभाग अहवाल २०२१-२२

महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरुवात १४/०६/२०२१ रोजी झाली. पहिल्या आठवड्यापासूनच महाविद्यालयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे सुरू झाल्या.

                                                                   निकाल

एकूण परीक्षार्थी २९
उत्तीर्ण २४
अनुत्तीर्ण ०५
निकालाची टक्केवारी ८२.७५%

श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या

ओ श्रेणी

०१

ए + श्रेणी ०६
ए श्रेणी ०८
ब+ श्रेणी ०३
ब श्रेणी ०४
कश्रेणी ००
ड श्रेणी ०२

                                       गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी

अ. क्र. नाव गुण
कांचन परशुराम महाले

५५७+५०६=१०६३

निवृत्ती वळे ४८५+४६८=९६३
दिलीप थेतले ४२९+४७५=९०४

          विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व चांगल्या निकालासाठी मराठी विभागातील प्राध्यापक नेहमीच प्रयत्नशील असतात. या वर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने टाळेबंदी घोषित केल्याने महाविद्यालय नियमित सुरू होऊ शकले नाही. म्हणून या वर्षीदेखील Read More

ज्ञानाधिष्ठित समाजाची वाटचाल

शांतपणे वाचा।
समजून घ्या।
पटल्यास शेयर करा।

★ वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत हे सर्व संस्कृत भाषेत आहेत.

★ परंपरेने भारतातील बहुजनांना वाचन- लेखनाचा अर्थात शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.

★ त्यात संस्कृत भाषा ही पुन्हा ‘देववाणी’. म्हणजे

Read More

‘वाफ’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकातील कथा)

          ग्रामीण भागात बर्‍याचदा माणसांतील नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे एकमेकांमध्ये चढाओढ, स्पर्धा, एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती असते. यातून मग संघर्ष निर्माण होतो. ‘वाफ’ ही कथा गावातील संघर्ष, मारामारी, खून यावर आधारलेली आहे.

          ‘वाफ’ कथेची सुरुवात वामन पैलवानाचा मृत्यू व त्याची बातमी गावभर पसरल्यानंतर गावात जी खळबळ माजते, त्यापासून होते. वामन पैलवान हा एकाच वेळी दहा माणसांना पुरून उरला असता, अशा ताकदीचा गडी होता. तो अविवाहित होता. त्याची भाऊरावशी मैत्री होती. तो अनेकदा दिवसा व रात्रीसुद्धा भाऊरावकडेच राहायचा. त्यांचे जेवणही बऱ्याचदा त्याच्याकडेच असायचे. भाऊरावच्या बायकोने त्याला धर्माचा भाऊ मानलेले होते. भाऊरावचा देखील त्याच्यावर खूप विश्वास होता. म्हणून भाऊराव घरी Read More

‘सांड’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकातील कथा)

कथानक –           

  ‘सांड’ ही ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय केंद्रस्थानी असतो आणि शेतीसाठी गाय, बैल यांची खूप आवश्यकता असते. सांड म्हणजे गायीचा गोर्‍हा. देवाच्या किंवा धर्माच्या नावाने मोकळा सोडलेला बैल किंवा गायींना गाभण करण्यासाठी एखादागोर्‍हा शेतकामासाठी वापरला न जाता, त्याला न ठेचता तसेच ठेवले जाते, त्यांला ‘सांड’ असे म्हणतात. त्यांच्यापासून शेतकर्‍यांच्या घरी गायींपासून नवीन वासरू व गोर्‍हे जन्माला येणारे असतात. ते ताकदीचे  Read More

मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢

मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ६ तारखेला माझे आजोबा (आईचे वडील) वारले. आज माझी आजी (आईची आई) त्यांच्या पाठोपाठ गेली. साधारणतः ८६ वय होते. माझ्या आजीचे संपूर्ण आयुष्य हे गरिबी, कर्जबाजारीपणात व

Read More

धर्म (कथा)- रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट)

          ग्रामीण भागामध्ये राजकीय पक्ष, विविध देवदेवतांचे भक्त यामुळे गटतट निर्माण झालेले असतात. यांच्यात अनेकदा संघर्ष, मारामार्‍या, वादविवाद निर्माण होतात. त्याचा फटका गावातील इतर सामान्य लोकांनाही बसत असतो. ‘धर्म’ ही कथा एका गावातील दोन गटांमध्ये धार्मिक वादातून जो संघर्ष निर्माण होतो व त्यात तुकाराम लोहार नावाच्या व्यक्तीची लहान मुलगी बळी Read More

बहुजनांचे व भारताचे खरे कल्याण केव्हा होईल?

प्रिय बंधू-भगिनींनो,

               हिंदू धर्मातील शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, स्त्रिया अशा जवळपास ८५-९०% घटकांच्या गेल्या २००० वर्षातील आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा, संपत्ती संचय करण्याचा, राज्य मिळवण्याचा अधिकार मुस्लिमांनी नाकारलेला

Read More

एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?

एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?

              तुम्ही ‘काकस्पर्श’ हा चित्रपट पाहिलेला आहे का? एका बालविधवेचे दुःख, वेदना या चित्रपटामधून मांडलेल्या आहेत. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित

Read More

नेट/ नेट-जेआरएफ उत्तीर्ण विद्यार्थी

मी सुरू केलेल्या ग्रुपमधील (मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा, नेट/सेट)/ माझ्या संपर्कातील खालील विद्यार्थी १९/०२/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. ४ जण JRFसह

Read More

गं. बा. सरदार – परिचय

गंगाधर बाळकृष्ण सरदार (०२ ऑक्टो. १९०८ – ०१ डिसें.१९८८)


           महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व विचारवंत म्हणून सर्वपरिचित. शिक्षण- एम.ए., पीएच.डी. (मराठी). जन्म व प्राथमिक शिक्षण जव्हार, जि. पालघर. स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व तुरुंगवास. एसएनडीटी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्य. १९८० सालच्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

गं. बा. सरदार यांनी लिहिलेले ग्रंथ :

  • अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका (१९३७)
  • जोतीराव फुले (१९४४)
  • संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती (१९५०)

Read More

माझ्या आजोबांचे निधन

आज माझे आजोबा (आईचे वडील) आम्हाला सोडून गेले. अनंतात विलीन झाले. ९० वर्षांचे होते. त्यांना सर्वजण ‘जिभाऊ’ म्हणायचे. ते महानुभाव संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांच्यासोबत गोष्टींचा खूप मोठा खजिना गेला. एकच गोष्टीचा मी व्हिडीओ बनवून ठेवू शकलो होतो.

१५-१६ वर्षांपूर्वी एकदा मी व माझे आजोबा सुरतहून अमळनेरला रात्रीच्या रेल्वेने येत होतो. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होती. आम्ही दरवाज्याच्या बाजूला उठबस करत रात्रभर प्रवास केला. झोपणे शक्य नव्हते. माझ्या आजोबांनी रात्रभर गोष्टी सांगून लोकांचे Read More

सेट उत्तीर्ण विद्यार्थी

मी सुरू केलेल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट/ सेट)’ या ग्रुपमध्ये असलेल्या व सराव परीक्षा देणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी/ विद्यार्थिनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. (अजून काही जणांनी निकाल बघितलेला नाही. संख्या वाढू शकते.)

आपल्या ग्रुपमधील आतापर्यंत १९ जण सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निरोप आलेला आहे. अजून या ग्रुपमधील कुणी निकाल बघितला नसेल तर बघावा व तसे कळवावे.

१) प्रमोदिनी देशमुख (मुंबई)
२) तनुजा ढेरे (मुंबई)
३) गितल बच्छाव (सटाणा)
४) राजेंद्र घाटाळ (जव्हार)

Read More

सूत्रसंचालन (एक नमुना)

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०१८-१९

सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम!

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. आजच्या या समारंभात गेल्या वर्षभरात

Read More

आनंदाचे डोही, आनंद तरंग – बुद्धविचारांच्या संग

             माझे एक वैशिष्ट्य राहिलेले आहे की, मला एखाद्या गोष्टीचा जेवढा त्रास होतो किंवा कुणीतरी मला त्रास देतं, माझे जेव्हा काहीतरी नुकसान होते, माझ्यासाठी परिस्थिती प्रतिकूल बनत जाते तेव्हा मला त्या गोष्टींचा उलट खूप फायदा होतो. कारण त्या गोष्टींनी

Read More

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार कसा थांबणार?

           छत्तीसगड व इतर काही राज्यांमध्ये त्या त्या राज्याच्या लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक प्राध्यापकांची सर्वच्या सर्व पदे भरली जातात. म्हणून तिथे

Read More

नरेंद मोदी व मी…

नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी तसा फार प्रयत्नही केला नाही. कारण

Read More

नवीन शैक्षणिक धोरण घातक आहे

(२६ जुलै, २०१९ रोजी लिहिले आहे.)

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर

Read More

दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप

दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप

                दलित साहित्याच्या निर्मितीच्या मुळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार व तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध लढे दिले, ज्यात महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, धर्मांतराची घोषणा व प्रत्यक्ष धर्मांतर, ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’मधील लिखाण, राज्यघटनेचे लेखन, गोलमेज परिषदेतील सहभाग व राखीव जागांची तरतूद यामुळे दलित समाजामध्ये आत्मभान, नवचैतन्य, लढवय्येपणा निर्माण झाला. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा बदलल्या. ते आपल्या

हक्कांप्रती जागृत झाले. आपल्यावर हजारो वर्ष होत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली. या अन्यायाविरुद्ध स्वाभाविक चीड, संताप त्यांच्यात निर्माण होऊ लागला. आधी तो व्यक्त करणे शक्य नव्हते, आता ते प्रत्यक्ष जगण्यातून व साहित्याच्या माध्यमातून ते व्यक्त करू लागले. म्हणून दलित साहित्यात आपल्याला चीड, संताप, विद्रोह, नकार, वेदना, इ. गोष्टी दिसून येतात. दुसर्‍या कोणत्याही साहित्यप्रवाहात आपल्याला या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत.

Read More

समकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना 

समकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना 

    समकालीन हा कालवाचक शब्द आहे. ‘सम’ म्हणजे समान, समांतर, सोबत. जे साहित्य आपल्या काळाबरोबर, काळासोबत असते, त्या काळाच्या समांतर असते. ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळातील समाजाचे

Read More

मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य

मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य

    मराठीमध्ये स्त्रियांनी तसे विपुल प्रमाणात साहित्यलेखन केलेले असले तरी ते सर्व स्त्रीवादी साहित्यात मोडत नाही. त्यापैकी बरेचसे साहित्य हे पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांवर देखील प्रभाव असल्यामुळे किंवा त्यांची एकूणच जडणघडण पुरुषप्रधान संस्कृतीतच झालेली असल्यामुळे पती किंवा प्रियकराविषयी प्रेम, पुरुषशरणता, स्वत:कडे

Read More

स्त्रीवाद, स्त्रीवादी साहित्य : संकल्पना

    जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क

Read More

मानवाची आधुनिक काळातील वाटचाल

मानवाचा आधुनिक काळापासूनचा सुधारणेचा इतिहास हा धर्मसत्तेविरूद्धच्या संघर्षाचा व धर्मसुधारणेचा इतिहास आहे. युरोपात या प्रक्रियेला चौदाव्या – पंधराव्या शतकापासून तर आपल्याकडे

Read More

नेट/ सेट पास झाल्यावर डोनेशन द्यावे लागते का?

खालील व्हाट्सअप चर्चा पूर्ण वाचा.

[25/06, 1:06 PM] +91 93701 57488: सर नेट पास झाल्यावर एकनाथ सारखी आम्हालाही डोनेशन द्यावे लागेल का?

[25/06, 1:07 PM] डॉ. राहुल पाटील: आधी फोकस नेट सेटवर करा. ते पास झाल्यावर बोलू. अनेक संधी असतात.

[25/06, 1:13 PM] डॉ. राहुल पाटील: एकनाथने अनेक शक्यतांचा शोध घ्यायला हवा होता. नंतर तो तसे काही शोधताना दिसत नाही.

Read More

मंडल आयोग व परिणाम

१३ ऑगस्ट १९९० – तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू करून हिंदू, मुस्लिम व इतर धर्मातील ३७४३ जातींना (भारतातील ५२℅ लोकसंख्या) ओबीसी सवर्गांतर्गत आरक्षण देऊन

Read More

विद्यार्थ्यांसाठी २४ टिप्स

               ह्या सूचना मी नेट/ सेटच्या  विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेल्या आहेत. त्यांचे संकलन इथे केलेले आहे. ज्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशाच आहेत. म्हणून काळजीपूर्वक वाचा. त्यावर चिंतन, मनन करा व अंमलात आणा.

१) फार वेळ सोशल मीडियावर राहिल्यानेही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यात अडचणी येतात.

२) परीक्षेतील यशाचे पहिले सूत्र- त्या-त्या परीक्षेचा

Read More

मराठी विषयातील करियरच्या विविध संधी –

          मित्रांनो, पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषय घेऊन भाषा, साहित्य यांचा अभ्यास करून लेखन, भाषण, श्रवण व इतर कौशल्ये आत्मसात करून खरे तर करियरच्या असंख्य संधी आहेत. त्यापैकी काहींची माहिती मी या ब्लॉगमधून आपल्याला देणार आहे. 

 

१) स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विषय –

         पीएसआय, एसटीआय या पदांसाठीच्या मुख्य परीक्षेत एकूण २५ टक्के अभ्यासक्रम हा मराठी व्याकरणाचा असतो. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, क्लार्क, मंत्रालय सहाय्यक या व इतर अनेक पदांसाठी जी परीक्षा होते, त्या प्रत्येक परीक्षेत मराठी विषय असतो. एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांमध्ये मराठी विषय असतो. यूपीएससीला तुम्ही मराठी विषय निवडून त्याचे २ पेपर देऊ शकतात. त्याला बीए, एमए या स्तरावरचा अभ्यास असतो. म्हणून मराठी विषय हा अतिशय उपयुक्त आहे. 

 

२) भाषांतरकार म्हणून संधी – Read More

भगवद्गीता : थोडं चिंतन (एका पोस्टवरील प्रतिक्रिया…)

          गीता ही मूळ महाभारताचा भाग नाहीये. असे अभ्यासक मानतात. ती खूप नंतर लिहून महाभारतात युद्धाच्या प्रसंगाच्या आधी जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिच्यातील तत्त्वज्ञान हे महाभारताचा जो कोणता काळ असेल, त्या काळाचे तत्त्वज्ञान नसावे. गीतेत कर्मयोग, सांख्य, ज्ञानयोग असे ज्याला जे हवे आहे असे Read More

मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी-

मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी – मी धर्माला नव्हे तर धर्माच्या नावाने चाललेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, राजकारण,

Read More

‘हिंदू’ शब्दाच्या अनुषंगाने चिंतन…

   ‘हिंदू’ हा शब्द पर्शियन लोकांनी सिंधू नदीपलीकडे राहणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या तत्कालीन पूर्वजांना वापरला. ते सिंधू नदीच्या पश्चिमेकडे राहायचे व आपण पूर्वेकडे. त्यांच्या दृष्टीने इकडे राहणारे वैदिक-अवैदिक, आर्य-अनार्य, ब्राह्मण, बौद्ध, Read More

१००० Subscriber पूर्ण झाल्याबद्दल आभार…!

         आज माझ्या youtube channel चे १००० Subscriber झाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक, नातेवाईक मित्र-मैत्रिणींचे त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.

           सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, इतिहास, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मला अभ्यासांती,

Read More

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

(१९६० ते ७५ या कालखंडातील)

             भारतीय समाजात पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्रियांचे स्थान हे दुय्यम दर्जाचे आहे. स्त्री ही उच्च जातीतील असो की कनिष्ठ, सुशिक्षित असो की अशिक्षित तिची अवस्था अतिशय वाईट असलेली दिसून येते. समाजामध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होताना दिसून येते. त्यांना उपभोग्य वस्तू समजले जाते. त्यांच्याकडे वासनेने, कामभावनेने पाहिले जाते. त्यांना निर्णयस्वातंत्र्य नसते. आर्थिक स्वातंत्र्य नसते. कुटुंब व्यवस्था, सामाजिक रूढी-परंपरा, प्रथा, चालीरिती, पुरुषांचा दृष्टिकोन, सामाजिक संघर्ष यामुळे त्यांच्या दु:खात अधिक भर पडलेली दिसून येते. मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये स्त्रियांचे जे चित्रण आलेले आहे, त्यात आपणास हे पहावयास मिळते.

  • नवर्‍यावर प्रचंड प्रेम, भक्तिभाव, जोडीदाराशी एकनिष्ठ स्त्रिया-

Read More

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये चित्रित जातिव्यवस्था, अस्पृश्यता व धर्मांधता : एक अभ्यास

(प्रस्तुत शोधनिबंधामध्ये मराठी व हिंदीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्‍यांच्या आधारे मांडणी केलेली आहे.)
  • प्रस्तावना :
          जात, जातीवरून श्रमविभागणी, अस्पृश्यता, विटाळ, शिवाशिव, विविध धर्मातील लोकांमध्ये परस्पर सहकार्य, प्रसंगी संघर्ष हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. भारतात काही जाती उच्च, तर काही कनिष्ठ किंवा खालच्या मानल्या जातात. त्यानुसार त्यांना कमी-जास्त प्रतिष्ठा मिळत असते. खालच्या जातींना तर प्रतिष्ठाच नसते. उच्च जातीतील लोकांकडून नियमितपणे त्यांचे शारीरिक, आर्थिक, लैंगिक शोषण चालू असते. यासंदर्भात डॉ. बन्सीधर यांचे
“कुछ पुरातन सामाजिक संदर्भ आज भी गांवो की जिंदगी के लिए नासूर बनकर वहां की यातनाओ में वृद्धि कर रहे हैं। इनमें सबसे पहले आती है वर्णभेद और जाति प्रथा कि समस्या। ब्राह्मण तथा अन्य उच्च वर्ग के लोग आज भी निचली जातियों के साथ वैसा ही क्रुरतापूर्ण – अमानुषिक व्यवहार कर रहे हैं जैसा कि वे शताब्दियों पहले किया करते थे। हमारी ग्रामव्यवस्था में आज भी जमींदार है, महाजन हैं तथा इसके साथ अन्य कई शोषक शक्तियां वहां सक्रिय हैं, जो हमेशा निचले वर्गो को दबाये रखने मे विश्वास करती हैं।”१,
हे मत महत्वपूर्ण आहे. याचे प्रत्यंतर आपल्याला मराठी व हिंदीतील जवळपास सर्वच ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळते. 
मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमधील जातिव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे, धर्मांधतेचे चित्रण :

Read More

बरं झालं आपण विज्ञान युगात जन्माला आलो!

बरं झालं, आपण विज्ञानयुगात जन्माला आलो! कोरोना कशापासून होत आहे, त्याच्यापासून संरक्षण कसे करावे, आजार झालाच तर तर काय करावे हे तरी

Read More

स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

           स्त्रियांचे शोषण करणार्‍या, त्यांना दुय्यम लेखणार्‍या, त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असंख्य प्रथा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. मात्र एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या प्रभावामुळे भारतीयांमध्ये काही प्रमाणात जागृती निर्माण होऊ लागली. पाश्चात्य शिक्षण, प्रबोधन यामुळे भारतातील

Read More

स्त्रियांच्या शोषणाची पार्श्वभूमी

    जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क 

Read More

‘संतसूर्य तुकाराम’ –  आनंद यादव (थोडक्यात परिचय)

                  
‘संतसूर्य तुकाराम’ ही  आनंद यादव यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर आघात करणारी, परंतु तुकारामांचे अवघे आयुष्य अगदी वास्तववादी व मानसशास्त्रीय, सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणारी एक उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांच्या बालपणापासून ते वैकुंठगमनापर्यंतच्या

Read More