लोकशाही

लोकशाही व्यवस्थेत तात्त्विकदृष्ट्या सर्वजण समान असतात. व्यावहारिकदृष्ट्या मात्र खूप विषमता व भेदाभेद असतो. ही विषमता व भेदाभेद जसजसा कमी होत जाईल, तसतशी लोकशाही सुदृढ व सामान्यांसाठी फायदेशीर ठरत जाईल. परंतु त्यासाठी सामान्य लोकांनी लोकशाही

Read More

१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदारवर्गाची आर्थिक परिस्थिती

प्रस्तावना :

स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये जमीनदार हा अतिशय सधन असा वर्ग होता. ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्येच्या मानाने या जमीनदारांची लोकसंख्या अतिशय कमी होती. म्हणजे एका गावात एक किंवा दोन घरे असायची. या वर्गाकडे मुबलक प्रमाणात शेती होती. शेती हे त्यांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन होते. याव्यतिरिक्त काही जमीनदारांकडे शेतसारा वसुलीचे अधिकार होते. त्यामुळे जवळपास संपूर्ण गाव, गावातील लोकं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर अवलंबून असायचे. त्यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे असायचे. मोठमोठी घरे, वाडे, दागदागिने, महाग, किमती कपडे, दळणवळणासाठी घोडे, बैलांची सारवट गाडी यांचा वापर ते करत. जमीनदार हा वर्ग ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणाच होता. कारण गावातील बहुतांश लोकं जमीनदारांच्या शेतावर राबून, प्रसंगी त्यांच्याचकडून कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह भागवित.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने जमीनदारी निर्मूलनाचा (कुळकायदा) केला. या कायद्याचा जमीनदारांच्या उत्पन्नाच्या साधनांवर, आर्थिक स्थितीवर, त्यांच्या राहणीमानावर खूप मोठा व दूरगामी परिणाम घडून आला. जमीनदारांची शेतजमीन जे शेतकरी, कुळं कसायचे, कुळकायद्याने ती शेती त्यांच्या मालकीची झाली. तसेच जमीनदारांकडची अतिरिक्त शेतजमीन काढून घेण्यात आली आणि ती भूमिहीनांमध्ये वाटण्यात आली. शेती हेच या जमीनदारांचे उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे व प्रभावी साधन असल्याने नंतरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली. अनेक जमीनदारांकडे त्या-त्या भागातील शेतसारा वसुलीचा अधिकार होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा तयार करण्यात आल्याने त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे आणखी एक साधन कमी झाले. या अशा अनेक कारणांमुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जमीनदार कर्जबाजारी आणि आर्थिकदृष्ट्या बेजार झाले. १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये या वर्गाचे, त्यांच्या आर्थिक स्थितीचे, राहणीमानाचे, पडझडीचे चित्रण पुढीलप्रमाणे आलेले आहे.

  • मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदारांची आर्थिक परिस्थिती :

Read More

शिक्षण क्षेत्रातील नारबा

                                        शिक्षण क्षेत्रातील नारबा

            आपल्याकडील शिक्षण क्षेत्राकडे सहज नजर टाकली तर आपल्याला जिल्हापरिषदेच्या शाळा सोडल्या तर जिकडेतिकडे माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये ही खाजगी संस्थांचालकांचीच दिसून येतात. याव्यतिरिक्त अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या केजी, नर्सरीपासूनच्या खाजगी शाळांचेही जणू पेव फुटलेले आहे.

           या संस्थांमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित, तासिका तत्त्वावर वर्षानुवर्षे काम करणारे असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या शिक्षकांना, प्राध्यापकांना २०००, ५०००, १०००० किंवा अपवादात्मक ठिकाणी या पेक्षा थोडे जास्त मासिक वेतन दिले जाते. त्यात परत मे महिन्यात ब्रेक दिला जातो. म्हणजे त्या महिन्याचे वेतन दिले जात नाही. काही ठिकाणी तर सहा महिन्यांमधून, वर्षातून एकदा थोडेफार ‘मानधन’ दिले जाते. त्यांच्याकडून त्या-त्या शैक्षणिक संस्थेत वाट्टेल ते काम करून घेतले जाते. अनेकदा त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर राजकीय कामांसाठीही वापर करून घेतला जातो. शाळा-महाविद्यालय अनुदानित असेल तर आपण एक ना एक दिवस पर्मनंट होऊ, या आशेने हे बिच्चारे कोणतेही काम टाळत नाहीत. आपल्यावर वरिष्ठांची, पदाधिकाऱ्यांची, संस्थाचालकांची खप्पा मर्जी होऊ नये, म्हणून ते अतिशय काळजी घेतात.

             आजूबाजूची परिस्थिती बघितल्यावर आपल्यासारख्याच कित्येक वर्ष काम करणार्‍यांना वगळून पर्मनंट जागेसाठी ऐनवेळेस दुसऱ्याला घेतले गेले हे ऐकल्यावर, प्रत्यक्ष पाहिल्यावर यांच्यात नैराश्य येत जाते. त्यांच्या मनातही भीती, असुरक्षितता निर्माण होत जाते. त्यापैकी अनेकांचे लग्न झालेले असते. अनेक जण गरिबीच्या परिस्थितीतून आलेले असतात. कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी असते. कर्जबाजारी असतात. आज ना उद्या आपल्या कष्टाचे, प्रामाणिकपणाचे, आपण संस्थेसाठी केलेल्या कामाचे चीज Read More

बाबासाहेबांना बुद्धी देवाने दिली!

बाबासाहेबांना बुद्धी देवाने दिली!


           खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या चांगल्या संपर्कातील एक व्यक्ती मला बऱ्याचदा अमुक तमुक बाबांबद्दलचे मेसेज पाठवायची. ती व्यक्ती आरक्षण घेऊन नोकरीला लागलेली होती. त्या व्यक्तीच्या घरात अनेक जण नोकरीला होते. त्या व्यक्तीला मी हक्काने बोलू शकत असल्याने एकदा मी त्या व्यक्तीला विचारले की,

            “तुला नोकरी या बाबांमुळे मिळाली की दुसऱ्या कुणामुळे? तुझे जीवनमान कुणामुळे सुधारले? तुझी, तुझ्या कुटुंबाची एवढी प्रगती कुणामुळे घडून आली?”

            मग ती व्यक्ती मला गंमतीने म्हणाली की, “मला माहित होतं की तू असे मेसेज पाठविल्याने उत्तर देशील.”

           मी म्हटलं, ” विषयानंतर करू नको. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे”.

Read More

बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन (विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी…)

बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्फ भीमराव रामजी आंबेडकर हे जगातील सार्वकालीन थोर विद्वान, अभ्यासक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे ज्ञान त्यांनी त्यांच्या स्वतःच्या करिअर व विकासापुरतेच सीमित ठेवले नाही. तर भारतातील ५००० वर्षांची शोषणाची, गुलामीची परंपरा मोडून काढण्यासाठी, येथील सामान्य माणसाला सामाजिक गुलामीतून, शोषणातून मुक्त करण्यासाठी, त्याच्या जगण्याला पशुपातळीवरून मानवी पातळीवर आणून अर्थ प्राप्त करून देण्यासाठी वापरले. अशा या महामानवाच्या विद्यार्थी जीवनाबद्दल खूप कमी जणांना अचूक माहित असते. तेव्हा ते माहीत व्हावे व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, त्यांनीही ते वाचून कार्यप्रवृत्त व्हावे, म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे एकूणच विद्यार्थीजीवन आपल्यासमोर मांडत आहे.

            बाबासाहेबांचे नाव भीमराव असले तरी लहानपणी त्यांना सर्वजण भिवा म्हणत. ती एकूण १४ भावंडे होती. बाबासाहेब सर्वात लहान होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला. त्यांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार होते. पण सुभेदार असूनही त्यांनी लष्करातील मुला-मुलींसाठी दिवसाच्या शाळा व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळांमध्ये १४ वर्षे हेडमास्तरकी केलेली असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व उमगलेले होते. म्हणून त्यांनी भिवाच्या शिक्षणाकडे, अभ्यासाकडे खूप लक्ष दिले. भिवा १-२ वर्षांचा असताना त्यांचे वडील निवृत्त झाले. त्यांना नोकरी करत असताना अल्पसे वेतन होते. निवृत्तींनंतर ते कोकणातील काप दापोली येथे स्थायिक होण्यासाठी आले. परंतु तेथे दापोली येथील नगर परिषदेच्या शाळेमध्ये अस्पृश्य मुलांना प्रवेश नाकारण्यात आल्याने मुलांच्या शिक्षणासाठी ते १८९४-९५ च्या सुमारास मुंबई व नंतर सातारा येथे स्थलांतरित झाले.

Read More

नेट/सेटच्या विद्यार्थ्यांसाठी (भाग १)

नेट-सेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही परीक्षा पास होऊन प्रमाणपत्र पदरात पाडून घ्यायला हवे.

Read More

‘कोसला’चे अभिवाचन

            ‘कोसला’ ही मराठीतील एक श्रेष्ठ दर्जाची कादंबरी. १९६३ साली भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ती लिहिली. ‘कोसला’चा समकालीन व नंतरच्या पिढीवर खूप मोठा प्रभाव पडला.
            ‘कोसला’ प्रत्यक्ष ऐकणे हा एक ग्रेट अनुभव आहे. मी एम. ए. करत असताना ‘कोसला’चे अभिवाचन आकाशवाणीवर प्रसारित होत होते. त्यावेळी मी मित्राचा छोटा रेडिओ मिळवून तो कॉलेजमध्ये न्यायचो. कारण कॉलेजची वेळ व ‘कोसला’च्या प्रसारणाची वेळ ही एकच

भाषेचा शोध (ज्ञानक्षेत्रातील क्रांती)

मानवजातीची आज जी प्रगती घडून आलेली आहे. ती काही अचानक व एका रात्रीत घडून आलेली नाही. गेल्या लाखो वर्षात हळूहळू एक एक टप्पा गाठत, पायर्‍या चढत माणूस आज इथवर येऊन पोहचलेला आहे. त्याच्या या विकासामध्ये अनेक शोध कारणीभूत ठरलेले आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या शोधांची ओळख आपणास करून देणार आहे. आजचे हे मानवी जग कसे घडलेले आहे, तयार झालेले आहे, हे आपणास कळावे. हा उद्देश या लेखनामागे आहे.

आजच्या या लेखात मी आपणाला मानवाच्या विकासामध्ये अतिशय क्रांतिकारक ठरलेल्या भाषेच्या शोधाविषयी सांगणार आहे.

भाषेचा शोध:

भाषेच्या शोधाने मानवजातीला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे केले. या शोधात मानवाला कोणत्याही शरीरबाह्य भौतिक गोष्टींची मदत घ्यावी लागली नाही. मानवप्राण्याच्या बुद्धीत हळूहळू होत गेलेले विकास, त्याचवेळेत त्याच्या नाक, कान, घसा, कंठ, जीभ, दातांची रचना इ. (वागिंद्रियांमध्ये) अवयवांमध्ये झालेले बदल व हळूहळू होत गेलेल्या उत्क्रांतीमुळे भाषेची निर्मिती व्हायला मदत झाली.

निसर्गातील प्राणी, पक्षी, इतर सजीव, निर्जीव घटक यांच्या आवाज व ध्वनीच्या निरीक्षणातून व नंतर अनुकरणातून मनुष्य

Read More

कोरोना व मानवजातीचे अपराध

कोरोना व मानवजातीचे अपराध

मानवजातीसमोर आज कोरोना नामक विषाणूचे खूप मोठे संकट उभे ठाकलेले आहे. किंबहुना, हा मानवाचे अस्तित्वच नष्ट करतो की काय? अशी शंका, असा यक्षप्रश्न आज मानवजातीसमोर आ वासून उभा राहिलेला आहे. आतापर्यंत अशा अनेक आजारांना, विषाणूंना पुरून उरणारा मानव आजच्या प्रगत विज्ञानाच्या युगातही एका विषाणूसमोर अक्षरशः हतबल झालेला दिसून येत आहे.

सर्व जगात, आज मी हे लिहीत आहे त्या दिवसापर्यंत जवळपास ४०००० लोकांचा जीव या विषाणूने घेतलेला आहे. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, चीन, सिंगापूर, जपान अशा प्रगत-अतिप्रगत देशांनी या विषाणूसमोर, त्यापासून होणार्‍या आजारासमोर गुडघे टेकलेले दिसून येत आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून प्रतिबंध करू शकणारी लस अथवा त्याच्यापासून व्यक्ती बाधित झाल्यावर त्याला बरे करण्यासाठी नेमके, अचूक (Proper) औषध शोधून त्याला आवर घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ

Read More

मी

कधीकधी माझ्याचकडे मी

तटस्थपणे बघतो 

माझ्यातच मला

कधीही न भेटलेला

दुसराच ‘मी’ गवसतो 

 

त्याच्याशीच गप्पा मारण्यात

वेळ माझा निघून जातो

Read More

‘द्ध’ की ‘ध्द’?

आपल्या मराठी व हिंदी भाषेत ‘द्ध’ हे जोडाक्षर
शुद्ध,
युद्ध,
विरुद्ध,
समृद्धी,
प्रसिद्ध,
प्रसिद्धी,
प्रतिबद्ध,
वृद्धी,
बुद्ध,
रिद्धी,
सिद्धी,
सिद्ध
अशा अनेक शब्दांमध्ये येते.

मात्र बरेच जण हे शब्द

Read More

माझे मत वाया गेले!

माझे मत वाया गेले!

            भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की, ‘तुमचे मत वाया गेले की सत्कारणी लागले’. म्हणजे तुम्ही ज्यांना मत दिले तो निवडून आला की नाही. यावरून त्यांना कळते की समोरच्याने कुणाला मतदान केले.

Read More

आठवणी

कुणीतरी आयुष्यात येतं

येतं आणि निघून जातं

आठवणींना का सोबत नेत नाही

त्या का मागे सोडून जातं?

 

माणसं त्रास देत नाहीत Read More

कोरोना आणि एकांत

कोरोना आणि एकांत


          मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाने सर्व जगभर थैमान घातलेले आहे. या विषाणूपासून होणाऱ्या आजारामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेले असून लाखोंना याची लागण झालेली आहे. या विषाणूवर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध सापडले नसल्याने याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला बाहेरच्या सर्वांशी प्रत्यक्ष संपर्क तोडून, सर्व कामधंदे सोडून घरात बसणे भाग आहे. अशा पद्धतीने रिकामे घरात बसणे अनेकांना असह्य होत असल्याने बरेच जण बाहेर पडणे चुकीचे आहे, हे माहित असताना देखील एखादा फेरफटका मारून येत आहेत. आज मात्र आपल्याला सक्तीचे घरात बसून राहावे लागणार आहे. एवढेच नाही तर पुढे कदाचित अनेक दिवस आपल्याला घरात बसून काढावे लागतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

          मित्रांनो, आपण सर्वच जण (आजच्या घडीला जगभरातील ४०० कोटींपेक्षा जास्त लोकं) या सक्तीच्या एकांताला

Read More

तौलनिक साहित्याभ्यास – १ (माझ्या पीएचडीच्या प्रबंधातून)

तुलना करणे ही मानवाची स्वाभाविक अशी प्रवृत्ती आहे. आपण नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, प्रकट वा अप्रकट तुलना करीत असतो. तुलना करताना एकापेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता असते. अशा एकापेक्षा अधिक गोष्टींमधून एकाची निवड करावयाची असेल तर तुलना ही आपोआपच आपल्याकडून होत असते. तर कधी-कधी ती आपण जाणिवपूर्वक करत असतो. आपण आपले विचार, मूल्य ठरवितानाही तुलना करूनच आपल्या स्वभावानुरूप ठरवित असतो.

साहित्याचा विचार करताना तुलनेला अत्यंत

Read More

कोजागिरीचा चंद्रमा

🌝कोजागिरीचा चंद्रमा🌝

 

कोजागिरीचा चंद्रमा

मला वेगळाच भासला

तोही एकटा, मीही एकटा

डोळे भरून मी त्याला पाहताना

तो मला खुणावताना दिसला.

कोजागिरीचा चंद्रमा…–१–

Read More

बस एवढंच…बाकी काही नाही

बस एवढंच…बाकी काही नाही

 

काही क्षण पकडून ठेवावेसे वाटतात चिमटीत

पण  जातात निसटून  क्षणार्धात…

आणि  शिरतो आपण दुसर्‍या  क्षणांमध्ये

आपल्याही नकळत…

Read More

माय (जात्यावरचे गाणे)

साधारणतः १४-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा माझी आई जात्यावर काम करत असताना अहिराणी बोलीत काही ओव्या गुणगुणत होती. त्या मी लिहून घेतल्या व त्यांच्या खाली काही ओव्या मी जुळवल्या होत्या.

आई म्हणत असलेल्या ओव्या खालीलप्रमाणे-

माय

माय माय करू माय नदीतली शाऊ

मायनी दिधा जन्म चार बहिणी दोन भाऊ ।।१।।

माय माय करू माय सोनानी परात

मायना बिगर चित लागेना घरात ।।२।।

ट्रॉयमधील तत्त्वज्ञान

प्रिय मित्रांनो,

   ‘ट्रॉय’ हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट आहे. तो होमरच्या ‘इलियड’ या महाकाव्यवर आधारलेला आहे. या चित्रपटाला ऑस्करसह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या चित्रपटातील अखिलिस या पात्राच्या तोंडी आलेली पुढील वाक्ये मला खूप आवडतात- Read More