विचार

‘विचार’ बंदिस्त झालेत

छोट्या-छोट्या तळ्यांमध्ये

अडवले गेलेत

छोट्या- मोठ्या तटबंद्यांमध्ये

 

कालवे काढून विचारांचे पाणी

‘विशिष्ट’ दिशेनेच वळवलं गेलंय.

 

हे पाणी जितकं वाहतं राहिल

विविध प्रवाह, धारा 

जितक्या प्रमाणात सामावून घेईल

तितकं ते व्यापक, संथ, शांत होईल.

 (२०.११.२०१६)


© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *